शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

“जागा न मिळाल्याने रामदास आठवले हे राज ठाकरेंबद्दल बोलले असतील”; मनसे नेत्याचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2024 12:49 PM

MNS Vs Ramdas Athawale: राज ठाकरे धगधगता निखारा आहेत. रामदास आठवलेंची प्रेरणा घेऊन चार ओळी लिहिल्या आहेत, त्या त्यांनाच समर्पित करतो, असे सांगत मनसे नेत्याने खोचक टोला लगावला.

MNS Vs Ramdas Athawale:महायुतीतील जागावाटपाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठकांचे सत्र सुरू आहे. यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत सहभागी होणार की नाही, याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. राज ठाकरेंना काही प्रस्ताव दिले असून, त्यावर चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. राज ठाकरे यांच्या महायुतीतील समावेशाबाबत बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी टीका केली होती. या टीकेला मनसेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. 

राज ठाकरे स्वतंत्र लढण्यातच त्यांचा फायदा आहे. त्यांना घेऊन भाजपाचा फायदा होणार नाही. मी असताना राज ठाकरेंची आवश्यकता नाही, असे माझे मत आहे. राज ठाकरे महाराष्ट्रातील लोकप्रिय नेते आहेत. परंतु, ते महायुतीत येणार नाहीत. ते आले तरी त्यांना घेऊ नये असे माझे मत आहे, असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले होते. तसेच लोकसभेसाठी आम्हाला दोन जागा मिळाव्यात, यासाठी रामदास आठवले आग्रही होते. परंतु, रामदास आठवलेंना जागा मिळण्याची शक्यता मावळली असल्याचे बोलले जात आहे. यानंतर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी रामदास आठवलेंना प्रत्युत्तर दिले.

जागा न मिळाल्याने रामदास आठवले हे राज ठाकरेंबद्दल बोलले असतील

मूळात राज ठाकरे यांना त्या विषयात का घेतले, हे माहिती नाही. रामदास आठवले हे शीघ्र कवी आहेत. रामदास आठवले यांच्याकडून प्रेरणा घेऊन चार ओळी लिहिल्या आहेत. या चार ओळी मी प्रथमच लिहिल्या आहेत. त्या रामदास आठवले यांना समर्पित करतो, असे सांगत, “अहो, आठवले साहेब, आपण बसलात भाजपाच्या ओसरीवर आणि राज साहेबांना घरात घ्यायचे नाही, हा सल्ला देता वरचेवर”, असा उपहासात्मक टोला प्रकाश महाजन यांनी रामदास आठवले यांना लगावला. 

राज ठाकरे कडवट हिंदुत्ववादी, धगधगता निखारा

रामदास आठवले यांना एकही जागा मिळाली नाही, त्या तणावातून ते राज ठाकरे यांच्याबद्दल बोलले असतील. राज ठाकरे यांना स्वतःचे मत आहे, स्वतःचे वलय आहे, राजकारणात त्यांच्याविषयी आकर्षण आहे. राज ठाकरे कडवट हिंदुत्ववादी आहेत. धर्मावर आले तर ते हिंदूंसाठी आहेत. मराठीवर आले तर मराठी माणसांसाठी आहेत. राज ठाकरे यांच्यासारखा धगधगता निखारा पदरात बांधून घेण्याची हिंमत फार कमी लोकांमध्ये आहे. त्यामुळे अन्य छोट्या मित्र पक्षांची किंवा मित्र पक्षातील नेत्यांची तुलना राज ठाकरे यांच्याशी होऊ शकत नाही, असे प्रकाश महाजन यांनी सांगितले.

दरम्यान, महायुतीत सहभागी झाल्यास राज ठाकरे यांना एक ते दोन जागांचा प्रस्ताव दिला असून, महायुतीतील एका पक्षाच्या चिन्हावर लढावे, असे सुचवले आहे. मात्र, असा प्रस्ताव राज ठाकरेंनी फेटाळल्याची चर्चा आहे. यावर बोलताना प्रकाश महाजन म्हणाले की, दुसऱ्याच्या चिन्हावर लढण्याचा ठराव राज ठाकरे यांनी फेटाळला असेल, तर ते माझे नेते आहेत, याचा मला सार्थ अभिमान आहे. कोणताही स्वाभिमानी नेता आपले चिन्ह सोडून दुसऱ्याच्या चिन्हावर निवडणूक लढवत नाही. राज ठाकरे यांनी हा बाणेदारपणा दाखवला असेल, तर मला त्यांचा अभिमान आहे, असे महाजन यांनी नमूद केले. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेMahayutiमहायुतीRamdas Athawaleरामदास आठवलेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४