शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

संजय राऊतांवर मनसेचा पलटवार; संयुक्त महाराष्ट्राला विरोध करणाऱ्यांसोबत जाणं हे तुमचं महाराष्ट्र प्रेम का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2024 12:33 IST

संजय राऊतांनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेला आता मनसेकडून प्रत्युत्तर देत आम्ही तुमच्यासारखी दुतोंडी भूमिका घेतली नाही असं म्हटलं आहे. 

मुंबई - मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बोचरी टीका केली त्यावरून आता मनसेनेही राऊतांवर पलटवार केला आहे. मोदी-शाहांसोबत सत्तेत वाटेकरी असताना ते महाराष्ट्र दुश्मन नव्हते मात्र आम्ही लोकसभेला पाठिंबा दिला म्हणून दुश्मन, ज्या काँग्रेसनं संयुक्त महाराष्ट्राला विरोध केला आणि १०६ हुताम्यांना ठार केले त्या काँग्रेससोबत जाणं महाराष्ट्र प्रेम का? असा सवाल मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी संजय राऊतांना विचारला आहे. 

गजानन काळे म्हणाले की, चोमडे राऊत आणि त्यांचे पक्ष प्रमुख नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या बरोबर राज्यात आणि दिल्ली सरकारमध्ये वाटेकरी होते, त्यावेळी ते महाराष्ट्राचे दुश्मन नव्हते मात्र आम्ही पाठिंबा दिला तर दुश्मन!!! काय लॉजिक आहे ?. ज्या काँग्रेसने संयुक्त महाराष्ट्राला विरोध केला आणि १०६ हुतात्म्यांना ठार मारले त्या काँग्रेस बरोबर जाणे म्हणजे महाराष्ट्र प्रेम का? असे अनेक दाखले देता येईल. तूर्तास मुख्यमंत्री पदासाठी दिल्ली चरणी नतमस्तक होऊन ही अजून सिग्नल न आल्यामुळे राऊत नैराश्यात आहेत आणि त्यांचे पक्ष प्रमुख कोमात अशी टीका त्यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवर केली आहे.

तर शिवसेना उबाठा हा पक्ष अपंगांचा पक्ष आहे. जो आयुष्यभर लोकांच्या कुबड्या घेऊन चालला. २०१४, २०१९ यांनी मोदी-शाहांची कुबडी घेतली. २०१९ नंतर यांना पवारांच्या आणि काँग्रेसच्या कुबड्या लागल्या. त्यामुळे या लोकांना चालणं काय हेच माहिती नाही. स्वत:च्या पायावर त्यांना चालता येत नाही. महाराष्ट्राच्या हिताची भूमिका आहे की नाही हे ठरवणारा संजय राऊत कोण? तुम्हाला कुणी अधिकार दिला. ज्यांनी आयुष्यभर पवारांची धुणी भांडी केली त्यांनी आमच्यावर बोलू नये. आमचे शत्रूही आम्ही महाराष्ट्रद्वेषी, मराठीद्वेषी आहोत असं बोलणार नाही. ज्या लोकांनी केम छो वरळी, जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा केले हे आम्हाला मराठी प्रेम, महाराष्ट्र प्रेम शिकवणार? जोपर्यंत तुम्ही मोदी-शाहांसोबत होतो तोपर्यंत तुम्ही महाराष्ट्र प्रेमी होता आणि आता महाराष्ट्रद्वेषी, या लोकांसारखी दुतोंडी भूमिका आम्ही कधीही घेतली नाही असं सांगत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांना फटकारलं आहे.  

काय म्हणाले होते संजय राऊत?

राज ठाकरे कोणत्या पक्षासोबत आहेत? ते मोदी-शाहांसोबत आहेत. जे महाराष्ट्राचे दुश्मन आहेत त्यांच्यासोबत ते कायम राहिलेत. ज्यांनी बाळासाहेबांचा पक्ष फोडला त्या पक्षासोबत एकनाथ शिंदेंसोबत राज ठाकरे आहेत. राज ठाकरेंच्या विधानांना गांभीर्याने घेऊ नका. त्यांची गंभीरता संपली आहे. त्यांच्या काळात काय झाले हे बोलण्याचा अधिकार राज ठाकरेंना नाही. राज ठाकरेंची दिशाच अजून स्पष्ट नाही. ते महाराष्ट्राच्या बाजूने आहेत की महाराष्टाच्याविरोधात जे आहेत त्यांच्या बाजूने आहेत? राज ठाकरेंची भूमिका नेहमी जे महाराष्ट्राविरोधात षडयंत्र करतात त्यांना साथ देण्याचं काम ते करतात. त्यांच्यावर जास्त बोलणार नाही असं सांगत संजय राऊतांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेसmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४