शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

Maharashtra Politics: “हनुमान चालीसाचा आवाज मातोश्रीत उद्धव ठाकरेंच्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे”: रवी राणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 16:02 IST

Maharashtra News: उद्धव ठाकरे हनुमान चालीसा पठण करत नाहीत तोवर त्यांची परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत राहील हे नक्की आहे, अशी टीका रवी राणा यांनी केली.

Maharashtra Politics: अवघ्या देशभरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या निमित्ताने आमदार रवी राणा यांनी मिरवणुकीचे आयोजन केले होते. यावेळी रवी राणा यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. हनुमान चालीसाचा आवाज मातोश्रीपर्यंत, उद्धव ठाकरेंच्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे, असे सांगत रवी राणा यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला. 

हनुमान जयंतीनिमित्त अमरावतीत नवनीत राणा आणि रवी राणा दाम्पत्याच्या पुढाकारातून सामुहिक हनुमान चालिसा पठणाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तुमच्या रक्तात हिंदूत्व असले पाहिजे. तुमच्या मनामनात हिंदुत्व असले पाहिजे. आमच्या हनुमान चालिसाच्या कार्यक्रमाला सर्वांनी यावे, असे आवाहन करत, हनुमान चालीसाचा आवाज मातोश्रीपर्यंत, उद्धव ठाकरेंच्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे. उद्धव ठाकरे जोवर हनुमान चालीसा पठण करत नाहीत तोवर त्यांची परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत राहील हे नक्की आहे, असा दावाही रवी राणा यांनी केला आहे. 

केवळ निवडणूक डोळ्यासमोर हे सगळे करू नका

ज्या मुख्यमंत्र्यांनी प्रभू श्रीरामाचा, भगवान हनुमानाचा विरोध केला. ज्या सरकारने हनुमान चालीसा म्हणणाऱ्या एका महिला खासदाराला तुरुंगात टाकले, ही गोष्ट महाराष्ट्राची जनता कधीच विसरणार नाही. हनुमान जयंतीच्या मिरवणुकीबाबत राणा म्हणाले की, त्यांनीदेखील मिरवणूक काढली पाहिजे. पण मनापासून काढावी, केवळ निवडणूक डोळ्यासमोर हे सगळे करू नका, असा टोला रवी राणा यांनी लगावला. तसेच ज्यांनी प्रभू श्रीरामाचा, भगवान हनुमंताचा अवमान केला, हनुमान चालीसा वाचण्यावरून खासदार नवनीत राणा आणि माझ्यावर राजद्रोह दाखल केला, आम्हाला तुरुंगात टाकले, ते लोक धार्मिक सोंग करून हिंदू मतदारांचं लक्ष वेधून घेत आहेत. परंतु हिंदूंना यांचा खरा चेहरा माहिती आहे, असे रवी राणा म्हणाले. 

दरम्यान, महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेवरून खासदार नवनीत राणा यांनी ठाकरे गटावर टीका केली होती. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आता भाईजान उद्धव ठाकरे असे संबोधले पाहिजे. ३३ महिने मुख्यमंत्री असताना औरंगाबादचे नाव ते संभाजीनगर करू शकले नाही. ३३ महिन्याच्या सरकारमध्ये अमरावती दंगा झाला, तेव्हा का वेदना झाल्या नाहीत, अशी विचारणा करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची लायकी नाही.  ज्यांनी फेसबुकच्या माध्यमातून सरकार चालवली ते काय पंतप्रधानांवर टीका करणार. पंतप्रधानांवर टीका करणे योग्य नाही, त्याला उत्तर देण्यासाठी देशाची आणि महाराष्ट्राचे लोक सक्षम आहेत, अशी घणाघाती टीका नवनीत राणा यांनी केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Ravi Ranaरवी राणाUddhav Thackerayउद्धव ठाकरेHanuman Jayantiहनुमान जयंती