शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

Maharashtra Politics: “हनुमान चालीसाचा आवाज मातोश्रीत उद्धव ठाकरेंच्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे”: रवी राणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 16:02 IST

Maharashtra News: उद्धव ठाकरे हनुमान चालीसा पठण करत नाहीत तोवर त्यांची परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत राहील हे नक्की आहे, अशी टीका रवी राणा यांनी केली.

Maharashtra Politics: अवघ्या देशभरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या निमित्ताने आमदार रवी राणा यांनी मिरवणुकीचे आयोजन केले होते. यावेळी रवी राणा यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. हनुमान चालीसाचा आवाज मातोश्रीपर्यंत, उद्धव ठाकरेंच्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे, असे सांगत रवी राणा यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला. 

हनुमान जयंतीनिमित्त अमरावतीत नवनीत राणा आणि रवी राणा दाम्पत्याच्या पुढाकारातून सामुहिक हनुमान चालिसा पठणाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तुमच्या रक्तात हिंदूत्व असले पाहिजे. तुमच्या मनामनात हिंदुत्व असले पाहिजे. आमच्या हनुमान चालिसाच्या कार्यक्रमाला सर्वांनी यावे, असे आवाहन करत, हनुमान चालीसाचा आवाज मातोश्रीपर्यंत, उद्धव ठाकरेंच्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे. उद्धव ठाकरे जोवर हनुमान चालीसा पठण करत नाहीत तोवर त्यांची परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत राहील हे नक्की आहे, असा दावाही रवी राणा यांनी केला आहे. 

केवळ निवडणूक डोळ्यासमोर हे सगळे करू नका

ज्या मुख्यमंत्र्यांनी प्रभू श्रीरामाचा, भगवान हनुमानाचा विरोध केला. ज्या सरकारने हनुमान चालीसा म्हणणाऱ्या एका महिला खासदाराला तुरुंगात टाकले, ही गोष्ट महाराष्ट्राची जनता कधीच विसरणार नाही. हनुमान जयंतीच्या मिरवणुकीबाबत राणा म्हणाले की, त्यांनीदेखील मिरवणूक काढली पाहिजे. पण मनापासून काढावी, केवळ निवडणूक डोळ्यासमोर हे सगळे करू नका, असा टोला रवी राणा यांनी लगावला. तसेच ज्यांनी प्रभू श्रीरामाचा, भगवान हनुमंताचा अवमान केला, हनुमान चालीसा वाचण्यावरून खासदार नवनीत राणा आणि माझ्यावर राजद्रोह दाखल केला, आम्हाला तुरुंगात टाकले, ते लोक धार्मिक सोंग करून हिंदू मतदारांचं लक्ष वेधून घेत आहेत. परंतु हिंदूंना यांचा खरा चेहरा माहिती आहे, असे रवी राणा म्हणाले. 

दरम्यान, महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेवरून खासदार नवनीत राणा यांनी ठाकरे गटावर टीका केली होती. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आता भाईजान उद्धव ठाकरे असे संबोधले पाहिजे. ३३ महिने मुख्यमंत्री असताना औरंगाबादचे नाव ते संभाजीनगर करू शकले नाही. ३३ महिन्याच्या सरकारमध्ये अमरावती दंगा झाला, तेव्हा का वेदना झाल्या नाहीत, अशी विचारणा करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची लायकी नाही.  ज्यांनी फेसबुकच्या माध्यमातून सरकार चालवली ते काय पंतप्रधानांवर टीका करणार. पंतप्रधानांवर टीका करणे योग्य नाही, त्याला उत्तर देण्यासाठी देशाची आणि महाराष्ट्राचे लोक सक्षम आहेत, अशी घणाघाती टीका नवनीत राणा यांनी केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Ravi Ranaरवी राणाUddhav Thackerayउद्धव ठाकरेHanuman Jayantiहनुमान जयंती