शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

"केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान"; 'त्या' विधानावर मंत्री नितेश राणे म्हणाले, "मी वस्तुस्थिती मांडली"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 15:08 IST

पुण्यात केरळबाबत केलेल्या वक्तव्यावरुन मंत्री नितेश राणे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

Nitesh Rane: मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण चांगले तापले आहे. केरळ हा मिनी पाकिस्तान आहे, त्यामुळेच राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियंका गांधी तेथे विजयी होतात, असे लोक त्यांना खासदार बनवण्यासाठी मतदान करतात, असं विधान नितेश राणेंनी केले. त्यांच्या विरोधात काँग्रेस नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दुसरीकडे, मंत्री नितेश राणे यांनी आपण  वस्तुस्थितीच्या आधारावर बोललो असल्याचे म्हटलं आहे.

सलग तिसऱ्यांदा निवडून आलेल्या नितेश राणे यांना महाराष्ट्र सरकारमध्ये मस्त्य आणि बंदर खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र आता नितेश राणे यांनी केलेल्या एका वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान आहे. प्रियांका गांधी त्यांच्यामुळे खासदार झाल्याचे वक्तव्य नितेश राणेंनी केले. त्यांच्या या वक्तव्यावरुन आता रोष व्यक्त केला जातोय. मात्र आपण फक्त वस्तुस्थिती मांडल्याचे नितेश राणेंनी म्हटलं.

"केरळ हा आपल्या देशाचा एक भाग आहे. पण हिंदूंची कमी होत चाललेल्या लोकसंख्येची प्रत्येकाने काळजी करायला हवी. हिंदूंचे ख्रिश्चन आणि मुस्लिमांमध्ये धर्मांतर करणे ही तिथे रोजची गोष्ट बनली आहे. लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्येही वाढ होत आहे. मी तिथल्या परिस्थितीची तुलना पाकिस्तानातील हिंदूंना दिल्या जाणाऱ्या वागणुकीशी करत होतो. केरळमध्येही अशीच परिस्थिती उद्भवली तर त्याचा विचार करायला हवा. आमचे हिंदु राष्ट्र हे हिंदु राष्ट्रच राहावे अशी आमची इच्छा आहे आणि हिंदूंचे सर्व प्रकारे रक्षण झाले पाहिजे. मी फक्त वस्तुस्थिती मांडत होतो जेणेकरून सर्वांना कळेल की परिस्थिती काय आहे. मी जे काही बोललो ते वस्तुस्थितीवर आधारित आहे," असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, रविवारी पुण्यातील सासवड येथे शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मंत्री नितेश राणे उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधीवर निशाणा साधला. "हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना मला सल्ला द्यायचा आहे की तुम्ही एकटे नाही. आम्ही सरकार म्हणून तुमच्या सोबत आहोत. राज्यात भगवादारी मुख्यमंत्री म्हणून तिथे आहेत. त्यामुळे हिंदुत्ववादी विचाराच्या कार्यकर्त्याला काही घाबरायची गरज नाही. हिंदू धर्माच्या विरोधात जर कोणी बेकायदेशीर वागणार असेल तर आम्ही त्यांना सोडणार नाही. मंत्री असल्याने आता बंधन आलेत," असं नितेश राणे म्हणाले.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे KeralaकेरळBJPभाजपाcongressकाँग्रेस