शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

"केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान"; 'त्या' विधानावर मंत्री नितेश राणे म्हणाले, "मी वस्तुस्थिती मांडली"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 15:08 IST

पुण्यात केरळबाबत केलेल्या वक्तव्यावरुन मंत्री नितेश राणे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

Nitesh Rane: मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण चांगले तापले आहे. केरळ हा मिनी पाकिस्तान आहे, त्यामुळेच राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियंका गांधी तेथे विजयी होतात, असे लोक त्यांना खासदार बनवण्यासाठी मतदान करतात, असं विधान नितेश राणेंनी केले. त्यांच्या विरोधात काँग्रेस नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दुसरीकडे, मंत्री नितेश राणे यांनी आपण  वस्तुस्थितीच्या आधारावर बोललो असल्याचे म्हटलं आहे.

सलग तिसऱ्यांदा निवडून आलेल्या नितेश राणे यांना महाराष्ट्र सरकारमध्ये मस्त्य आणि बंदर खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र आता नितेश राणे यांनी केलेल्या एका वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान आहे. प्रियांका गांधी त्यांच्यामुळे खासदार झाल्याचे वक्तव्य नितेश राणेंनी केले. त्यांच्या या वक्तव्यावरुन आता रोष व्यक्त केला जातोय. मात्र आपण फक्त वस्तुस्थिती मांडल्याचे नितेश राणेंनी म्हटलं.

"केरळ हा आपल्या देशाचा एक भाग आहे. पण हिंदूंची कमी होत चाललेल्या लोकसंख्येची प्रत्येकाने काळजी करायला हवी. हिंदूंचे ख्रिश्चन आणि मुस्लिमांमध्ये धर्मांतर करणे ही तिथे रोजची गोष्ट बनली आहे. लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्येही वाढ होत आहे. मी तिथल्या परिस्थितीची तुलना पाकिस्तानातील हिंदूंना दिल्या जाणाऱ्या वागणुकीशी करत होतो. केरळमध्येही अशीच परिस्थिती उद्भवली तर त्याचा विचार करायला हवा. आमचे हिंदु राष्ट्र हे हिंदु राष्ट्रच राहावे अशी आमची इच्छा आहे आणि हिंदूंचे सर्व प्रकारे रक्षण झाले पाहिजे. मी फक्त वस्तुस्थिती मांडत होतो जेणेकरून सर्वांना कळेल की परिस्थिती काय आहे. मी जे काही बोललो ते वस्तुस्थितीवर आधारित आहे," असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, रविवारी पुण्यातील सासवड येथे शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मंत्री नितेश राणे उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधीवर निशाणा साधला. "हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना मला सल्ला द्यायचा आहे की तुम्ही एकटे नाही. आम्ही सरकार म्हणून तुमच्या सोबत आहोत. राज्यात भगवादारी मुख्यमंत्री म्हणून तिथे आहेत. त्यामुळे हिंदुत्ववादी विचाराच्या कार्यकर्त्याला काही घाबरायची गरज नाही. हिंदू धर्माच्या विरोधात जर कोणी बेकायदेशीर वागणार असेल तर आम्ही त्यांना सोडणार नाही. मंत्री असल्याने आता बंधन आलेत," असं नितेश राणे म्हणाले.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे KeralaकेरळBJPभाजपाcongressकाँग्रेस