शहरं
Join us  
Trending Stories
1
डोबिवली MIDC मधून शिंदे सेनेचे लोक किती हप्ते गोळा करतात?; ...हे एकदा तपासून बघा; संजय राऊतांचा थेट आरोप 
2
संघर्ष वाढणार? ओबीसी नेत्याकडूनही अंतरवाली सराटीतच आमरण उपोषणाची घोषणा
3
Rahul Gandhi : "मी पंतप्रधान मोदींसारखा देव नाही"; राहुल गांधी अडकले धर्मसंकटात, म्हणाले...
4
युक्रेनने केलेल्या हल्ल्यात दोन भारतीयांचा मृत्यू; रशियन लष्करात झाले होते भरती
5
८ वर्षाच्या लेकीचा जीव वाचवण्यासाठी अहमदनगरचा शिवराम बनणार जमीर शेख, काय घडलं? 
6
Uddhav Thackeray मला सरकारच्या नव्हे तर देशाच्या भवितव्याची काळजी; उद्धव ठाकरेंचा भाजपावर घणाघात
7
अजित पवार धर्मसंकटात? राज्यसभेसाठी उमेदवार ठरेना; दिल्लीचं तिकीट मुलाला, पत्नीला, की...?
8
शपथविधी झाला, खातेवाटप आटोपलं, आता या तारखेपासून सुरू होणार लोकसभेचं अधिवेशन
9
"संपूर्ण देशाच्या भावनांचा 'सत्यानाश' केलाय", वसीम अक्रम पाकिस्तानी संघावर संतापला!
10
रात्री झोपताना फोन उशीजवळ ठेवणं पडू शकतं महागात?; जाणून घ्या, किती असावं अंतर?
11
राम मंदिराची अभेद्य सुरक्षा; अयोध्येत बनणार NSG हब, ब्लॅक कॅट कमांडो तैनात होणार!
12
पाकिस्तानी चॉकलेट, हरभरे, शस्त्रास्त्रे अन्...; कठुआमध्ये हाहाकार माजवण्यासाठी दहशतवाद्यांनी काय-काय आणलं होतं
13
USA vs IND : "भारत मजबूत संघ असला तरी...", अमेरिकन शिलेदाराचा टीम इंडियाला इशारा 
14
पुरेसे बहुमत असताना अजितदादांना सोबत का घेतलं? RSS ने भाजपला सुनावलं
15
Ramayan: कुंभकर्ण वर्षातून दोनदाच उठायचा; हा त्याच्यासाठी शाप होता की वरदान? वाचा!
16
Sargun Mehta : "Kiss केल्याने मुलं होतात..."; अभिनेत्रीला कॉलेजमध्ये रोमान्सची वाटायची खूप भीती
17
'प्रत्येकाचं घर चाललं पाहिजे'; मानधन कमी करण्यास कार्तिक आर्यनने दर्शवली तयारी, कारण...
18
रील, ४० हजार फॉलोअर्स अन् अफेअर... ५ मुलांची आई बॉयफ्रेंडसह फरार; म्हणते, नवऱ्याला कंटाळली
19
'विक्रम'वीर झाम्पा! ऑस्ट्रेलियन स्टार खेळाडूनं इतिहास रचला; असं करणारा पहिला खेळाडू ठरला
20
"राग येणं स्वाभाविक पण.."; कंगनाला कानशिलात लगावणाऱ्या महिलेला चिराग पासवान यांचा सल्ला

"जालन्यातील घटनेनंतर पोलीस हतबल, सरकार त्यांच्या पाठिशी आहे हा विश्वास देणं गरजेचे"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 12:45 PM

अंतरवाली सराटी इथं पोलिसांवर अमानुषपणे दगडफेक झाली. ७० पोलीस रुग्णालयात दाखल झाले. हिंमत असेल तर महिला पोलिसांना विचारा असं भुजबळ म्हणाले.

पुणे - जालनात पोलिसांवर हल्ले झाले, महिला पोलीस हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या मग आमचे काय घेऊन बसलात? पोलीस हतबल झाल्यासारखे वाटतात. पोलीस जखमी झाल्यानंतरही काही कारवाई नाही. पोलिसांना सध्या विश्वास देणे गरजेचे आहे. सरकार पोलिसांच्या पाठिशी आहे असं म्हणत मंत्री छगन भुजबळांनी गृह विभागाचं आणि पोलीस अधीक्षक यासाठी जबाबदार असल्याचे म्हटलं. 

मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, बीडमध्ये घरे जाळपोळ करण्यापर्यंत मजल गेली. अंतरवाली सराटी इथं पोलिसांवर अमानुषपणे दगडफेक झाली. ७० पोलीस रुग्णालयात दाखल झाले. हिंमत असेल तर महिला पोलिसांना विचारा तुमच्यासोबत कशी वागणूक झाली त्यानंतर पोलिसांनी लाठीहल्ला केलेला आहे. पहिली बाजू जनतेसमोर आली नाही.त्याला पोलीस अधीक्षक आणि गृह विभागही जबाबदार आहे. मी गृहमंत्र्यांशी बोललो, पोलिसांचे मनोबल खच्चीकरण होईल असं करू नका. पोलिसांना विश्वास दिला पाहिजे हे मी सांगितले. मी सर्वपक्षीय बैठकीतही हे बोललो. बीडवेळी पोलीस हतबल का झाले याबाबत चौकशी करून माहिती समोर आणावी अशी मागणी त्यांनी केली. 

तसेच सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे द्या ही मागणी आम्ही मान्य करणार नाही. मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे परंतु ओबीसी कोट्यातून नाही. राज्य सरकारने आर्थिक, शैक्षणिक परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण देऊ शकते. मराठ्यांना वेगळे आरक्षण द्या. कुणी विरोध केला? सरसकट कुणबीच प्रमाणपत्र द्या याला विरोध आहे. ते होता कामा नये अशी स्पष्ट भूमिका मंत्री छगन भुजबळ यांनी मांडली आहे. मराठवाड्यातील निजामकालीन नोंदी असतील तर ते कुणबी होतील. परंतु काही ठिकाणी पूर्वी टाकाने लिहिले जायचे तिथे आता पेनाने कुणबी लिहिले जातेय त्याला विरोध आहे. अशी काही कागदे आम्ही दाखवली आहे. जो मुळात कुणबी आहे त्याला प्रमाणपत्रे द्या. आता खोडाखोडी करून कुणबी नोंदी दाखवल्या जातायेत. आरक्षण मिळून २७-२८ वर्ष झाली. जे खरोखरच कुणबी आहेत त्यांनी प्रमाणपत्रे मिळवली आहेत. आता अनेक प्रमाणपत्रावर कुणबी नोंदी लिहिल्या जात आहेत असा आरोप भुजबळांनी केला. 

माझा विरोध झुंडशाहीला

बीड पेटवलं कुणी हे का शोधत नाही? भुजबळांनी एक दगड, टायर तरी जाळला का? ज्यांनी जाळले त्याला पकडल्यानंतर आरोपींना सोडा अशी मागणी ते करतायेत. जो अन्याय झाला त्याला तोंड फोडायचे काम मी केले. मी जबाबदारीनं कागदपत्रासह जाहीर सभेत बोलतोय.  मराठा समाजाला माझा अजिबात विरोध नाही. वेगळे आरक्षण द्यायला विरोध नाही. ज्यावेळी तसा कायदा आला तेव्हा मी समर्थन दिले आहे. माझा विरोध झुंडशाहीला आहे. परवा एका मुलाखतीत पोलिसांनीच एकमेकांना मारल्याचे बोलले गेले. बीडमध्ये शासकीय अधिकाऱ्यांनीही घरे जाळली असं सांगितले. यावर कुणी काय बोलणार आहे की नाही? असा सवाल भुजबळांनी केला आहे. 

२-४ लोकांना घाबरून बसणार का?

स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पु्ण्यातील विश्रामगृहात येऊन विरोध केला, त्यावर प्रतिक्रिया देताना भुजबळ म्हणाले की, मला छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आजही फार आदर आहे. ज्या गादीवर ते बसलेत त्यांच्यासाठी अख्खा महाराष्ट्र आपला आहे. या राज्यात जो घटक आहे त्याला सर्वांना समान न्याय द्या असं त्यांनी म्हटलं पाहिजे. अशा २-४ लोकांनी विरोध केला म्हणून घाबरून बसणार का? असंही भुजबळ म्हणाले. 

मी पक्षाविरोधात बोललो नाही

प्रत्येकाला आपापल्या समाजाबद्दल बोलण्याचा अधिकार आहे असं अजित पवार म्हणाले आहेत. मी कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही. मी ओबीसी समाजाच्या व्यासपीठावर समाजाची बाजू मांडतो. त्या व्यासपीठावर सगळ्याच पक्षाचे नेते असतात असंही छगन भुजबळांनी स्पष्ट केले.  

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळMaratha Reservationमराठा आरक्षणPoliceपोलिसManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील