शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राचे पाणी गुजरातला देणार नाही - मुख्यमंत्री

By admin | Updated: July 18, 2015 00:15 IST

महाराष्ट्राच्या हक्काच्या पाण्यातला एकही थेंब गुजरातला जाऊ देणार नाही, असे ठोस आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिले.

मुंबई : महाराष्ट्राच्या हक्काच्या पाण्यातला एकही थेंब गुजरातला जाऊ देणार नाही, असे ठोस आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिले. तसेच दमणगंगा-पिंजाड नदीजोड प्रकल्पातील पाणी महाराष्ट्रालाच मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री म्हणाले, राज्याचे पाणी बाहेर सोडले गेले होते, ते आम्ही परत आणले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला जाणार नाही. विरोधकांनी राजकारण करू नये. विरोधकांची मते जाणून याप्रकरणी राज्य सरकार विचार करेल आणि यात दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. दमणगंगा-पिंजाळ व तापी-नारपार या नद्यांचे पाणी गुजरातला वळविणयाबाबतचे वृत्त खोटे असून नर्मदा जोड प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प केंद्र सरकार मान्यता देणार आहे. कारण केंद्रीय जलसंधारण मंत्र्यांच्या अध्यक्शतेखाली मे २०१५ मध्ये नदीजोड प्रकल्पासाठीच्या विशेष समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रीय प्रकल्पांतर्गत नादीजोड प्रकल्प राबून मुंबईस पाणी द्यावे. तसेच दमणगंगा-पिंजाळ व तापी-नारपार नर्मदा हे नदीजोड प्रकल्पासाठी २ हजार ६७५ कोटी रूपयांचा निधी खर्च होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करण्यात यावे, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. नार-पार-तापी नर्मदा खोर्यातील सर्वसाधारण २०० मीटर उंचीच्या टप्प्यातील आर्थिक व तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य नदीजोड योजनांद्वारो गोदावरी व तापी खोऱ्यात वळविण्याचे प्रस्तावित आहे. त्याचबरोबर उर्वरित उपलब्ध पाण्यापैकी महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रातील जास्तीत जास्त पाणी बोगद्याद्वारे वळवून महाराष्ट्रात कसे वापरात आणता येईल, याप्रकरणीचा अभ्यास राष्ट्रीय जलविकास अभिकरण यांनी करावी, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार उत्तर महाराष्ट्रातील नार-पार योजनेंतर्गत नर्मदा नदीतून महाराष्ट्राच्या वाट्याला येणारे ७५ टक्के पाणी मुंबईसाठी वापरण्यात येणार असून वैतरणातून मुंबईला दिले जाणारे पाणी गोदावरीला दिले जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)