राज्याच्या अनेक भागात सध्या हवामानात बदल झाला असून, पुढील आठवडाभर अंशतः ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. विशेषतः दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे शेतकऱ्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या दक्षिण भागात दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता आहे. या हवामान बदलाचा सर्वाधिक फटका ३० आणि ३१ मार्च दरम्यान बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली. या कालावधीत खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जना, वेगवान वारे आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. तर, ३१ मार्चलाही काही भागांत पावसाचा जोर कायम राहील.
मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन
राज्यात रब्बी हंगामातील पिकांची काढणी अंतिम टप्प्यात असतानाच निसर्गाचा हा लहरीपणा चिंतेचा विषय ठरत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत शेतकऱ्यांना सतर्क केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, "शेतकऱ्यांनी हवामानाच्या अद्ययावत अंदाजाकडे सातत्याने लक्ष द्यावे. काढणी केलेली रब्बी पिके सुरक्षित ठिकाणी हलवावीत आणि कृषी विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी."
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना
- कापणी केलेले धान्य सुरक्षित ठिकाणी साठवावे किंवा ताडपत्रीने झाकून ठेवावे.- बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेला माल भिजणार नाही, याची दक्षता घ्यावी.
Web Summary : Maharashtra faces unseasonal rain; farmers are urged to protect harvested crops. South Maharashtra and Marathwada are likely to experience thunderstorms. Chief Minister Fadnavis advises vigilance and following agricultural department guidelines during this critical harvest period.
Web Summary : महाराष्ट्र में बेमौसम बारिश का खतरा मंडरा रहा है; किसानों को काटी गई फसलों को बचाने की सलाह दी जाती है। दक्षिण महाराष्ट्र और मराठवाड़ा में गरज के साथ बारिश होने की संभावना है। मुख्यमंत्री फडणवीस ने इस महत्वपूर्ण फसल अवधि के दौरान सतर्क रहने और कृषि विभाग के दिशानिर्देशों का पालन करने की सलाह दी है।