शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेना 'अटल' मार्ग धरणार?; सगळ्यांना घेऊन पुढे जाण्याचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 12:37 IST

Maharashtra Election Result 2019: शिवसेनेकडून इतर मार्गांचा विचार सुरू

मुंबई: मुख्यमंत्रिपदाबद्दल समझौता होणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल्यानं नाराज झालेल्या शिवसेनेनं आता इतर पर्यायांचा गंभीरपणे विचार सुरू केला आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि इतरांच्या मदतीनं बहुमताचा आकडा गाठून शिवसेना स्वत:चा मुख्यमंत्री करू शकेल, याबद्दल पक्ष 'प्रचंड आशावादी' आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 'सामना'मधील एका लेखात यावर भाष्य केलं आहे. राज्यात 5 मार्गांनी सत्ता स्थापन होऊ शकते, असं त्यांनी म्हटलं आहे. मात्र यातील 'अटल' मार्गावर त्यांनी विशेष भर दिला आहे.भाजपा विश्वासदर्शक ठरावात अपयशी ठरल्यावर दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेना सरकार स्थापनेचा दावा करू शकेल. राष्ट्रवादी (54), काँग्रेस (44) आणि इतरांच्या मदतीनं बहुमताचा आकडा 170 पर्यंत जाईल. शिवसेना स्वत:चा मुख्यमंत्री करू शकेल व सरकार चालवण्याचं साहस त्यांना करावं लागेल. त्यासाठी तीन स्वतंत्र विचारांच्या पक्षांना समान किमान सामंजस्याचा कार्यक्रम तयार करून पुढे जावे लागेल. अटलबिहारी वाजपेयींनी जसं सरकार दिल्लीत चालवलं तसं सगळ्यांना धरून पुढे जावं लागेल. त्यात महाराष्ट्राचं हित आहे, असं राऊत यांनी लेखात म्हटलं आहे.विशेष म्हणजे राऊत यांनी त्यांच्या लेखात आणखी चार शक्यता दिल्या आहेत. मात्र त्या यशस्वी होण्याबद्दल त्यांनीच साशंकता व्यक्त केली आहे. यातील पहिली शक्यता म्हणजे सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपा सत्ता स्थापनेचा दावा करू शकते. मात्र त्यांना आणखी 40 आमदारांचा पाठिंबा लागेल. तसं शक्य झाली नाही तर विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी त्यांचं सरकार कोसळेल. सत्ता स्थापनेच्या दुसऱ्या शक्यतेत राऊत यांनी 2014 मधील पॅटर्नचा उल्लेख केला आहे. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यानं भाजपा विश्वासदर्शक ठराव जिंकू शकते. मात्र 2014 सारखी चूक यंदा पवार करणार नाहीत. कारण पवारांना भाजपाविरोधात यश मिळालं आहे. ते भाजपासोबत गेल्यास त्यांच्या यशाची माती होईल, असं राऊत यांनी लिहिलं आहे.भाजपा, शिवसेना नाइलाजास्तव एकत्र येतील, अशी आणखी एक शक्यता त्यांनी वर्तवली आहे. मात्र यासाठी भाजपाला शिवसेनेच्या मागण्यांवर विचार करावा लागेल. मुख्यमंत्रिपदाची विभागणी करावी लागेल. मात्र अहंकारामुळे ते शक्य नाही, असं म्हणत राऊत यांनी हा पर्यायावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ईडी, पोलीस, पैसा, धाक यांचा वापर करून इतर पक्षांचे आमदार फोडून भाजपास सरकार बनवावे लागेल, असा एक पर्याय त्यांनी लेखात नमूद केला आहे. मात्र पक्षांतर करणाऱ्यांची काय अवस्था होते, असं म्हणत राऊत यांनी भाजपाला सूचक इशारा दिला आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपा