शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेना 'अटल' मार्ग धरणार?; सगळ्यांना घेऊन पुढे जाण्याचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 12:37 IST

Maharashtra Election Result 2019: शिवसेनेकडून इतर मार्गांचा विचार सुरू

मुंबई: मुख्यमंत्रिपदाबद्दल समझौता होणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल्यानं नाराज झालेल्या शिवसेनेनं आता इतर पर्यायांचा गंभीरपणे विचार सुरू केला आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि इतरांच्या मदतीनं बहुमताचा आकडा गाठून शिवसेना स्वत:चा मुख्यमंत्री करू शकेल, याबद्दल पक्ष 'प्रचंड आशावादी' आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 'सामना'मधील एका लेखात यावर भाष्य केलं आहे. राज्यात 5 मार्गांनी सत्ता स्थापन होऊ शकते, असं त्यांनी म्हटलं आहे. मात्र यातील 'अटल' मार्गावर त्यांनी विशेष भर दिला आहे.भाजपा विश्वासदर्शक ठरावात अपयशी ठरल्यावर दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेना सरकार स्थापनेचा दावा करू शकेल. राष्ट्रवादी (54), काँग्रेस (44) आणि इतरांच्या मदतीनं बहुमताचा आकडा 170 पर्यंत जाईल. शिवसेना स्वत:चा मुख्यमंत्री करू शकेल व सरकार चालवण्याचं साहस त्यांना करावं लागेल. त्यासाठी तीन स्वतंत्र विचारांच्या पक्षांना समान किमान सामंजस्याचा कार्यक्रम तयार करून पुढे जावे लागेल. अटलबिहारी वाजपेयींनी जसं सरकार दिल्लीत चालवलं तसं सगळ्यांना धरून पुढे जावं लागेल. त्यात महाराष्ट्राचं हित आहे, असं राऊत यांनी लेखात म्हटलं आहे.विशेष म्हणजे राऊत यांनी त्यांच्या लेखात आणखी चार शक्यता दिल्या आहेत. मात्र त्या यशस्वी होण्याबद्दल त्यांनीच साशंकता व्यक्त केली आहे. यातील पहिली शक्यता म्हणजे सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपा सत्ता स्थापनेचा दावा करू शकते. मात्र त्यांना आणखी 40 आमदारांचा पाठिंबा लागेल. तसं शक्य झाली नाही तर विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी त्यांचं सरकार कोसळेल. सत्ता स्थापनेच्या दुसऱ्या शक्यतेत राऊत यांनी 2014 मधील पॅटर्नचा उल्लेख केला आहे. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यानं भाजपा विश्वासदर्शक ठराव जिंकू शकते. मात्र 2014 सारखी चूक यंदा पवार करणार नाहीत. कारण पवारांना भाजपाविरोधात यश मिळालं आहे. ते भाजपासोबत गेल्यास त्यांच्या यशाची माती होईल, असं राऊत यांनी लिहिलं आहे.भाजपा, शिवसेना नाइलाजास्तव एकत्र येतील, अशी आणखी एक शक्यता त्यांनी वर्तवली आहे. मात्र यासाठी भाजपाला शिवसेनेच्या मागण्यांवर विचार करावा लागेल. मुख्यमंत्रिपदाची विभागणी करावी लागेल. मात्र अहंकारामुळे ते शक्य नाही, असं म्हणत राऊत यांनी हा पर्यायावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ईडी, पोलीस, पैसा, धाक यांचा वापर करून इतर पक्षांचे आमदार फोडून भाजपास सरकार बनवावे लागेल, असा एक पर्याय त्यांनी लेखात नमूद केला आहे. मात्र पक्षांतर करणाऱ्यांची काय अवस्था होते, असं म्हणत राऊत यांनी भाजपाला सूचक इशारा दिला आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपा