शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

Vidhan sabha 2019 : आघाडीचं ठरलं; काँग्रेस १४७, राष्ट्रवादी १२४ जागांवर लढणार

By अतुल कुलकर्णी | Updated: October 3, 2019 06:46 IST

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आता १४७ जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस १२४ जागा लढवणार आहे.

- अतुल कुलकर्णीमुंबई : विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आता १४७ जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस १२४ जागा लढवणार आहे. काँग्रेसने समाजवादी पक्षाला भिवंडी पूर्व, औरंगाबाद पूर्व आणि मानखुर्द हे तीन मतदारसंघ देण्याचे मान्य केल्यामुळे अबू आझमी आघाडीत सहभागी झाले. जागावाटपाचा तिढा सुटला असला तरी सीपीआयएम, सीपीआय, जनता दल यांच्या जागांबाबत वाद कायम आहे.शेकापचे नेते जयंत पाटील यांनी पेण, उरण, पनवेल, अलिबाग व रोहा या जागी फक्त राष्ट्रवादीसोबत आघाडी व काँग्रेसने आपले उमेदवार उभे करून मैत्रीपूर्ण लढाई करायची, अशी अट घातली आहे. शेकापला आघाडीत सहभागी करून घेण्याची अट मान्य करण्यात आली. आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी १२५ म्हणजेच २५० जागा लढवणार होते. तर ३८ जागा मित्रपक्षांना दिल्या जाणार होत्या. मात्र मित्रपक्षांकडून मागणी कमी आली. त्यामुळे आयत्यावेळी काही मतदारसंघ बदलून घेत मित्रपक्षासह काँग्रेसने १५६ जागा लढविण्याचा निर्णय घेतला. यातील ९ जागा मित्रपक्षांना सोडण्यात येणार आहेत. त्यात ३ जागा समाजवादी पक्षाला तर उर्वरित ६ जागा रिपाइं कवाडे गट आणि रिपाइं गवई गट यांना दिल्या जातील. त्यामुळे काँग्रेसकडे १४७ जागा उरतील.राष्ट्रवादी आता मित्रपक्षांसह १३२ जागा लढविणार आहे. राष्ट्रवादीच्या कोट्यातूनच राजू शेट्टी यांच्या स्वाभिमान शेतकरी संघटनेसह अन्य मित्रपक्षांना ८ जागा देण्यात येणार आहेत. बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष आघाडीसोबत अचलपूर आणि मुंबई अशा २ जागा लढेल. त्यामुळे राष्ट्रवादीकडे १२४ जागा असतील. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी शिरोळमधून लढतील.माणिकराव कोकाटे राष्ट्रवादीतनाशिक जिल्हयातील भाजपाचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी आपल्या समर्थकांसह बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. कोकाटे यांना सिन्नर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस