शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Vidhan sabha 2019 : आघाडीचं ठरलं; काँग्रेस १४७, राष्ट्रवादी १२४ जागांवर लढणार

By अतुल कुलकर्णी | Updated: October 3, 2019 06:46 IST

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आता १४७ जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस १२४ जागा लढवणार आहे.

- अतुल कुलकर्णीमुंबई : विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आता १४७ जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस १२४ जागा लढवणार आहे. काँग्रेसने समाजवादी पक्षाला भिवंडी पूर्व, औरंगाबाद पूर्व आणि मानखुर्द हे तीन मतदारसंघ देण्याचे मान्य केल्यामुळे अबू आझमी आघाडीत सहभागी झाले. जागावाटपाचा तिढा सुटला असला तरी सीपीआयएम, सीपीआय, जनता दल यांच्या जागांबाबत वाद कायम आहे.शेकापचे नेते जयंत पाटील यांनी पेण, उरण, पनवेल, अलिबाग व रोहा या जागी फक्त राष्ट्रवादीसोबत आघाडी व काँग्रेसने आपले उमेदवार उभे करून मैत्रीपूर्ण लढाई करायची, अशी अट घातली आहे. शेकापला आघाडीत सहभागी करून घेण्याची अट मान्य करण्यात आली. आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी १२५ म्हणजेच २५० जागा लढवणार होते. तर ३८ जागा मित्रपक्षांना दिल्या जाणार होत्या. मात्र मित्रपक्षांकडून मागणी कमी आली. त्यामुळे आयत्यावेळी काही मतदारसंघ बदलून घेत मित्रपक्षासह काँग्रेसने १५६ जागा लढविण्याचा निर्णय घेतला. यातील ९ जागा मित्रपक्षांना सोडण्यात येणार आहेत. त्यात ३ जागा समाजवादी पक्षाला तर उर्वरित ६ जागा रिपाइं कवाडे गट आणि रिपाइं गवई गट यांना दिल्या जातील. त्यामुळे काँग्रेसकडे १४७ जागा उरतील.राष्ट्रवादी आता मित्रपक्षांसह १३२ जागा लढविणार आहे. राष्ट्रवादीच्या कोट्यातूनच राजू शेट्टी यांच्या स्वाभिमान शेतकरी संघटनेसह अन्य मित्रपक्षांना ८ जागा देण्यात येणार आहेत. बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष आघाडीसोबत अचलपूर आणि मुंबई अशा २ जागा लढेल. त्यामुळे राष्ट्रवादीकडे १२४ जागा असतील. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी शिरोळमधून लढतील.माणिकराव कोकाटे राष्ट्रवादीतनाशिक जिल्हयातील भाजपाचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी आपल्या समर्थकांसह बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. कोकाटे यांना सिन्नर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस