शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

Vidhan Sabha 2019: मुंबईसह कोकणात भाजपवर सेना भारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 03:35 IST

राष्ट्रवादीला फटका; छोट्या पक्षांची कोंडी

- विनायक पात्रुडकरमुंबई : मुंबई- ठाणे, कोकणातील संख्याबळात सध्या शिवसेना मोठा भाऊ असली, तरी तळकोकणात नारायण राणे यांना भाजप किती बळ देते आणि गणेश नाईक यांच्या प्रवेशाचा ठाणे, रायगड, पालघरमध्ये किती प्रभाव पडतो, यावर भाजपचे मोठेपण ठरेल.मुंबईत भायखळा, मागाठाणे, मालाड, वडाळ््याच्या जागांवरून युतीत वाद असले, तरी सध्याची शिवसेनेची मवाळ भूमिका पाहता ते सुटू शकतील. काँग्रेसमधील अंतर्गत वाद, धुगधुगी कायम असलेली राष्ट्रवादी, समाजवादी पक्षाने गमावलेला जनाधार, वंचित-एमआयएमच्या ताकदीचे विभाजन यामुळे युतीपुढे मोठे आव्हान नाही. मनसेचे इंजिन भोंगा वाजवण्याच्या तयारीत असले, तरी त्यांनी स्वत:वर मर्यादा घालून घेतल्याने ते युतीचे किती नुकसान करतील, यावरच लढतीचे चित्र ठरेल.युतीच्या मेगाभरतीत राष्ट्रवादीचे पांडुरंग बरोरा (शहापूर), अवधूत तटकरे (श्रीवर्धन), भास्कर जाधव (गुहागर) शिवसेनेत; तर संदीप नाईक (ऐरोली) भाजपमध्ये दाखल झाले. उल्हासनगरात कुमार आयलानी- ओमी कलानी या भाजप नेत्यांत टोकाचे वाद आहेत. ज्योती कलानींचे राजकारण सोयीचे बनले आहे. मीरा-भार्इंदरमध्ये युतीतून विस्तव जात नाही. त्यामुळे तेथे युती होऊनही धुसफूस कायम राहील. कळवा-मुंब्रा येथे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना यावेळी तगडे आव्हान देण्याची व्यूहरचना सुरू आहे. ते पाहता सध्या ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादीपुढे अस्तित्वाचे आव्हान आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गात भाजपचा एकही आमदार नाही. भास्कर जाधव यांच्या सेना प्रवेशामुळे गुहागरचा दावाही विरला. भाजपमुळे राज्यसभेत गेलेले नारायण राणे यांनी आपला पक्ष भाजपत विलीन करण्याचा निर्णय घेतला, तरी कणकवलीत नितेश यांचा मार्ग निर्वेध नसेल. रायगडमध्ये फक्त एक आमदार असलेल्या भाजपची भिस्त विद्यमान पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईक यांच्यावर आहे. पालघरमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या तीनपैकी एक आमदार फोडून शिवसेनेने त्यांच्या कोंडीला सुरूवात केली आहे. एन्काऊंटरफेम प्रदीप शर्मा यांच्या शिवसेना प्रवेशानंतर नालासोपाऱ्याची लढतही कडवी बनते आहे.प्रचारात मुद्दे काय?मेट्रो कारशेडच्या जमिनीचा वाद, कोस्टल रोड, कोळीवाडे- धारावी, बीडीडी चाळी, अभ्युदयनगर, भेडीबाजारचा पुनर्विकास मुंबईच्या प्रचारात केंद्रस्थानी येईल.मेट्रो, एमएमआरडीएचे रखडलेले प्रकल्प, समृद्धी-बडोदा महामार्ग, फ्रेट कॉरिडॉरचे भू संपादन, जुन्या इमारतींचा पुनर्विकास, क्लस्टरमुळे निर्माण झालेले प्रश्न ठाणे जिल्ह्यात तीव्र आहेत.कोकणातील रायगड-रत्नागिरी जिल्ह्यात तेलशुद्ध्किरण प्रकल्प येणार की जाणार, पर्यटनाचा विकास, नवनगराची उभारणी, रोजगाराच्या अपुºया संधी चर्चेत राहण्याची चिन्हे आहेत.मुंबईसह कोकट पट्ट्यातील सध्याचे बलाबलएकूण जागा- ७५भाजप-२६शिवसेना-२८काँग्रेस-०६राष्ट्रवादी-०८इतर-०७

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस