शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
4
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
5
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
6
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
7
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
8
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
9
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
10
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
11
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
12
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
13
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
14
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
15
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
16
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
17
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
18
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
19
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
20
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा

Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 12:32 IST

Maharashtra Rain News: १९ बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद ४,८८५ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

कोल्हापूर/नागपूर/अकोला : गेले महिनाभर राज्यात मान्सून पावसाचा जोर असून जवळ जवळ ९५ टक्के महाराष्ट्र पाणीदार झाला आहे. धरणातील जलसाठ्यात वाढ झाली असून धरणातून विसर्ग सोडण्यात येत आहे. विदर्भाला मात्र यंदाच्या पावसाने अद्याप हुलकावणी दिली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे विभागातील धरणातील पाणीसाठा ३७ टक्के तर कोकणातील धरणातील पाणीसाठा ४४ टक्के झाला आहे. नाशिक विभागात ४० टक्के पाणीसाठा असून मराठवाडा व अमरावती विभागात अनुक्रमे ३६ व ३७ टक्के पाणीसाठा आहे. 

नागपूर विभागात मात्र सर्वांत कमी ३० टक्के साठा आहे. अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील धरणातून विसर्ग सोडण्यात येत असून त्यामुळे जायकवाडी धरणाची पातळी ३१ टक्के झाली आहे. 

कोकणातील कोयना, कृष्णा पंचगंगा नद्या दुथडी भरून वाहात असून तारळी, धोम व कोयना, कन्हेर, उरमोडी, वीर धरणांच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण गतवर्षी मायनसमध्ये होते त्यामध्ये सध्या तब्बल ७३ टक्के एवढा पाणीसाठा झाला आहे. 

गेल्या महिनाभरात या धरणात ४० टक्के पाणीसाठा झाला असून धरणातून विसर्ग करण्यात येत आहे. पुण्याच्या खडकवासला धरणात ६४ टक्के तर घोड धरणात ८० टक्के पाणीसाठा झाला आहे.

पंचगंगा नदीच्या पातळीत दिवसभरात अडीच फुटांची वाढ कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पातळीत दिवसभरात अडीच फुटांची वाढ झाली. धरण क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत आहे. सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पाणीपातळीत वाढ होत आहे.

१९ बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद ४,८८५ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने भोगावती, पंचगंगेच्या पातळीत वाढ होत आहे. पंचगंगेची पाणीपातळी २९ फुटांपर्यंत पोहोचली होती.

मराठवाड्यातील धरणांमध्ये  मांजरा २७ टक्के, येलदरी ५० टक्के, अमदुरा ६३ टक्के, निम्न दुधना ३७ टक्के, खुलगापूर ५३ टक्के, भुसणी २९ टक्के, शिवणी ५० टक्के, निम्न तेरणा७० टक्के, सीना कोळेगाव  ३१ टक्के, निम्न मनार ५१ टक्के , विष्णुपुरी २३ टक्के पाणीसाठा झाला आहे.

सांगली-साताऱ्यात जोरदार, कोयना धरण ३३ टक्के भरले

सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रातील निवळे, पाथरपुंज, चांदोली येथे अतिवृष्टी सुरू असल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सातारा जिल्ह्यात २४ तासांत नवजा येथे सर्वाधिक १०२ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणात सुमारे ३५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. यामुळे धरण ३३ टक्के भरले आहे. 

पावसाअभावी विदर्भात ८० टक्के पेरण्या रखडल्या  

विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत पावसाची प्रतीक्षा वाढत आहे. जूनचा तिसरा आठवडा संपत आला तरी समाधानकारक पाऊस नाही. त्यामुळे ८० टक्के पेरण्या रखडल्या आहेत. ज्यांनी पावसाच्या आशेने पेरण्या सुरू केल्या त्यांना बियाण्याच्या नुकसानापोटी आर्थिक फटका बसण्याची चिंता आहे. 

अकोला जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गंभीर 

अकोला जिल्ह्यात पाणीटंचाई दिवसेंदिवस तीव्र होत आहे. प्रशासनाकडून खासगी विहिरींच्या अधिग्रहणाचा आधार घेतला जात आहे. पावसाअभावी काटेपूर्णा धरणातील साठा केवळ १३.९ टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे अकोला शहरात टंचाईचे गंभीर चटके बसत आहेत.

निम्मा जून संपला तरी तापमान कमी होईना  

निम्मा जून महिना संपला तरी विदर्भातील तापमान कमी होईना.  शनिवारी नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अकोला, जिल्ह्यांच्या तापमानात वाढ झालेली दिसून आली.  नागपूरमध्ये कमाल तापमान  ३७.८ अंश होते. आता २४ पासून जोरदार पावसाचा अंदाज आहे.

टॅग्स :Rainपाऊसweatherहवामान अंदाजVidarbhaविदर्भMaharashtraमहाराष्ट्र