शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
2
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
3
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
4
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
5
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
6
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
7
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
8
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
9
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
10
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
11
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
12
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
13
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
14
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
15
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
16
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
17
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
18
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
19
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 21:46 IST

School Holiday on 20 August: राज्यात पुढील २४ तासासाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड या पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबई - मागील २ दिवसांपासून मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ग्रामीण भागात नद्यांमधील पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने पूराची परिस्थिती उद्भवली आहे. त्यातच राज्य शासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांना आपापल्या पातळीवर खबरदारीचे उपाय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यात ठाणे, रायगड, सातारामध्ये प्रशासनाने २० ऑगस्टलाही शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

ठाण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संदीप माने यांनी आदेश काढले आहेत. त्यात म्हटलंय की, ठाणे जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू असून अंबरनाथ येथील उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. जिल्ह्यातील बारवी, तानसा धरणे १०० टक्के क्षमतेने भरल्याने दरवाजे उघडलेले असून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. २० ऑगस्टला सकाळी ३.९७ मीटर इतक्या उंचीच्या लाटा समुद्रात येणार असल्याने ठाणे जिल्ह्यात अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीचा परिणाम विद्यार्थ्यांवर होऊ नये म्हणून २० ऑगस्टला ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. 

तर सातारा जिल्ह्यातही पावसाचे थैमान वाढले आहे. प्रशासनाकडून जिल्ह्याला २ दिवसांचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सहा तालुक्यात पाटण, जावळी, वाई, कराड, महाबळेश्वर, सातारा याठिकाणी २ दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. कोरेगाव, खटाव, माण आणि फलटण येथे पावसाचे प्रमाण कमी आहे. मात्र त्याठिकाणीही पावसाची परिस्थिती पाहून सुट्टी देण्याचे अधिकार गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती सातारा शिक्षणाधिकारी अनिस नायकवाडी यांनी दिली. 

दरम्यान, रायगड जिल्ह्यामध्येही अतिवृष्टी होत असून हवामान खात्याने रायगड जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा दिला आहे. त्यामुळे पनवेल महापालिका हद्दीतील सर्व शाळा महाविद्यालयांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही शाळा महाविद्यालयांना २० ऑगस्टला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातही मिरज, वाळवा, शिराळा, पलुस तालुक्यासह महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांना २० आणि २१ ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

५ जिल्ह्यांना रेड अलर्ट

राज्यात पुढील २४ तासासाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड या पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली जिल्ह्यासह कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या अंदाजानुसार आपत्कालीन परिस्थितीत सर्व जिल्हा प्रशासनांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

टॅग्स :RainपाऊसMumbai Rain Updateमुंबईचा पाऊसSchoolशाळाweatherहवामान अंदाजHolidayसुट्टी