Maharashtra Heavy Rain Forecast: अनेक वर्षांनंतर वेळेआधीच दाखल झालेल्या मान्सूनने मोठी विश्रांती घेतली. मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, पुढील काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईसह कोकण आणि मध्य व पश्चिम महाराष्ट्रात अतिमुसळधार ते मुसळधार पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पुढील काही दिवसांत हवामान कसे असेल याबद्दलचे अंदाज प्रसिद्ध केले आहेत. मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारपासून म्हणजे १३ जूनपासून राज्यातील काही भागात पावसाचा जोर वाढेल.
कोकणातील जिल्ह्यांना रेड अलर्ट
हवामान विभागाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या दोन जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. १३ जून रोजी मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, पश्चिम घाट, सांगली, कोल्हापूर या भागातही अतिमुळधार पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोकणात पावसाचा जोर कायम राहणार
हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकणातील तीन जिल्ह्यात पावसाचा जोर १४ जून रोजीही कायम राहील. १४ जून रोजी रायगड आणि रत्नागिरी अतिमुसळधार पाऊस पडेल. तर वाऱ्याचा वेगही प्रतितास ५० ते ६० किती इतका असेल.
वाचा >>इन्कम टॅक्स भरणाऱ्या बहिणींना नाही मिळणार लाडक्या बहीण योजनेचा लाभ? बहिणी शासनाच्या 'रडार'
पुणे, पश्चिम घाट, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग या भागातही अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मराठवाडा विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस
मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाचा जोर कायम राहील असेही हवामान विभागाने म्हटले आहे.