शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Maharashtra Rain Live Updates : राज्यात सर्वत्र पावसाचा जोर कायम राहणार; मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 13:03 IST

मुंबई - आजपासून मुंबईत पावसाने पुन्हा एकदा जोर धरण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. विदर्भात निर्माण झालेला कमी ...

31 Aug, 21 02:53 PM

हायवेखाली दीड ते दोन फूट साचलं पाणी

31 Aug, 21 02:26 PM

मालाड पूर्वेच्या कुरार गावातील आंबेडकर नगरमध्ये काही घरांवर दगड आणि पावसाचे पाणी, १०० रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविले.
 

31 Aug, 21 02:03 PM

मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस; रस्ते वाहतुकीला फटका

31 Aug, 21 01:07 PM

जाणून घ्या महाराष्ट्रात किती आणि कुठे कुठे पाऊस पडेल


 

31 Aug, 21 01:02 PM

आज दिवसभरात राज्यात सर्वत्र पावसाचा जोर कायम राहणार आहे. उत्तर कोकणात (मुंबई) पावसाचे प्रमाण अधिक राहील
 

31 Aug, 21 12:45 PM

मुंबई शहराच्या तुलनेत पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगर येथे अधिक पावसाची नोंद झाली आहे.
 

31 Aug, 21 12:36 PM

चाळीसगाव ग्रामीण भागातील नागरिकांना शाळांमध्ये हलविले

चाळीसगाव शहराला महापुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. परिस्थिती गंभीर झाली आहे.प्रशासनाने नदीकाठालगतच्या नागरिकांसाठी नेताजी चौकातील आनंदीबाई बंकट विद्यालयात मदत कक्ष सुरू केला आहे. न.पा.ची टीम यासाठी सर्तक करण्यात आली आहे. ग्रामीण भागातही शाळांमध्ये नागरिकांना हलविण्यात येत आहे. अशी माहिती तहसिलदार अमोल मोरे यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.
 

31 Aug, 21 12:30 PM

राज्यात पुढील तीन ते चार दिवस मान्सून पुन्हा सक्रिय

पालघरमध्ये मंगळवारी येलो अलर्ट तर १ सप्टेंबर रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात पुढील तीन ते चार दिवस मान्सून पुन्हा सक्रिय होईल. या काळात ठाणे, पालघर, रायगड आणि मुंबई या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी व्यक्त केली आहे.

31 Aug, 21 12:08 PM

डहाणूत काही गावांशी संपर्क तुटला, नद्या दुथडी भरून वाहू लागल्या...


 

31 Aug, 21 11:33 AM

४० गावांना पाण्याचा वेढा

अहमदनगर - शेवगाव तालुक्यातील ४० गावांना पाण्याचा वेढा, जनावरे गेली वाहून

31 Aug, 21 11:23 AM

चाळीसगाव येथील बामोशी बाबा दर्गापर्यंत पाणी, भाविकांची मोठी तारांबळ उडाली.
 

31 Aug, 21 10:51 AM

पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प

अहमदनगर - नगर-कल्याण रोडवरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प, नगर-औरंगाबाद रोडवरील जेऊर येथील पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक तीन वाजेपासून बंद होती.

31 Aug, 21 11:17 AM

चाळीसगावात एसडीआरएफची टीम दाखल

चाळीसगाव शहर व ग्रामीण भागात महापूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्याने महसूल प्रशासनाने एसडीआरएफ पथकाची मागणी केली होती. त्यानुसार धुळे येथील ३० जणांचे पथक येथे दाखल झाले आहे. कन्नड घाटातील दरड हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे. कन्नड घाटातील वाहतूक थांबविण्यात आली आहे. प्रवाशी वाहने व मालवाहू वाहने नांदगाव व सिल्लोडमार्गे जळगावकडे वळविण्यात आली आहे. घाटाच्या मध्ये काही प्रवाशी अडकून पडले आहे. ग्रामीण भागातही तातडीची मदत पोहचविण्याचे प्रशसनासमोर आव्हान आहे. 
 

31 Aug, 21 11:06 AM

कन्नड घाटात दरड हटविण्याचे काम सुरू

कन्नड घाटात दरड हटविण्याचे काम सुरू, शहराला पाण्याचा वेढा, पावसाचा जोर पुन्हा वाढला, सकाळी १० वाजता पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात
 

31 Aug, 21 10:51 AM

शेवगाव तालुक्यात जोरदार पाऊस

31 Aug, 21 10:43 AM

मुसळधार पावसामुळे डहाणूत भरले पाणी

31 Aug, 21 10:35 AM

तिसगाव, पाथर्डी तालुक्यातील नदीला पूर


31 Aug, 21 10:24 AM

कन्नड घाटात दरड कोसळली. वाहतूक बंद. सुरळीत करण्याचे काम सुरू


31 Aug, 21 10:15 AM

डहाणूत पावसाचा तडाखा, सखल भागात पूरस्थिती

बोर्डी - हवामान विभागाने 31 ऑगस्ट रोजी पालघर जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवून एलो अलर्ट दिला होता. त्याप्रमाणे रात्रीपासून पावसाचा तडाखा बसत असून मुसळधार पावसासह ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट मंगळवारी  सकाळी दहा वाजेपर्यंत सुरू आहे. यामुळे तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी पातळी वाढू लागली आहे. 

31 Aug, 21 10:09 AM

औरंगाबाद : कन्नड घाटात मुसळधार पावसामुळे तीन ठिकाणी दरड कोसळली. औरंगाबाद-धुळे महामार्ग ठप्प.

31 Aug, 21 10:08 AM

अहमदनगरच्या दक्षिण भागात रात्रभर संततधार, नद्या-नाल्यांना पूर

31 Aug, 21 10:06 AM

भोरटेक ता. भडगाव या गावाला पाण्याचा वेढा

31 Aug, 21 10:01 AM

शहरात बाजारपेठेतही शिरले पाणी, पशुधनाचे नुकसान

31 Aug, 21 09:59 AM

चाळीसगाव परिसरात नदी-नाल्यांना पूर

चाळीसगाव जि.जळगाव - शहर व ग्रामीण भागात मंगळवारपासून सुरू झालेल्या पावसाची संततधार कायम राहिल्याने बुधवारी पहाटे डोंगरी व तितूर या नद्यांना मोठा पूर आला. शहराच्या  दक्षिणेला असणाऱ्या वाघडू, वाकडी, रोकडे, वाघले, बाणगाव येथे गावांमध्ये नदीचे पाणी शिरले आहे. मध्यरात्री व पहाटे पूर आल्याने पशुधनाचे नुकसान झाले आहे. अनेक जनावरे दगावली आहेत. तालुक्यातील १४ मध्यम जल प्रकल्पांपैकी १० धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. शहरात बामोशी बाबा दर्गाह परिसरासह, मुख्य बाजार पेठ, दोस्त टाॕकीज परिसर जलमय झाला आहे. 

31 Aug, 21 09:57 AM

मुंबईतील काही भागांमध्ये जोरदार ते अति जोरदार सरी कोसळणार

मुंबईत सोमवारी सांताक्रुझ वेधशाळेने ०.७ मिलिमीटर पावसाची नोंद केली आहे. ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर हे दोन दिवस मुंबईतील काही भागांमध्ये जोरदार ते अति जोरदार सरी कोसळणार आहेत.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रRainपाऊसMumbai Rain Updateमुंबई मान्सून अपडेट