शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

Maharashtra Political Crisis : "महाराष्ट्र 'माफिया' मुक्त होत आहे, आत्ता मुंबई महापालिका माफिया मुक्त करणार" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 12:05 IST

Maharashtra Political Crisis BJP Kirit Somaiya Slams Shivsena : भाजपाच्या सत्तास्थापनेसाठीच्या हालचालींना आता वेग आला आहे. याच दरम्यान भाजपाने शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. 

मुंबई - उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल मुख्यमंत्रीपदासह विधानसभा परिषदेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडीच वर्षातच कोसळलं आहे. गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे पडदा पडला आहे. आता राज्यपाल विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित करू शकतात. भाजपाच्या सत्तास्थापनेसाठीच्या हालचालींना आता वेग आला आहे. याच दरम्यान भाजपाने शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. 

महाराष्ट्रात नवीन सरकार येणार...असं म्हणत हल्लाबोल केला आहे. भाजपाचे नेते किरीट सोमय्या (BJP Kirit Somaiya) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट्स केले आहेत. "महाराष्ट्र "माफिया" मुक्त होत आहे, आत्ता मुंबई महापालिका माफिया मुक्त करणार" असं म्हटलं आहे. यासोबतच "महाराष्ट्रात नवीन सरकार येणार... पुन्हा एकदा मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, भाईंदर, वसई, नवी मुंबई, पनवेल...... मेट्रो रेल्वेचे काम पुन्हा जलद गतीने सुरू होईल" असं देखील किरीट सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

किरीट सोमय्या यांनी य़ाआधी देखील उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. “शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे घाबरतात हे मला कळत नाही. आमदार आले की ते आम्हाला मतदान करतील असं सकाळ संध्याकाळ त्यांचा भोंगा आवाहन करत असतो. फ्लोअर टेस्ट होऊन जाऊदे एकदा. आता का घाबरताय. कारण ठाकरेंच्या पोटात पाप आहे. काल पर्यंत ओरडणारे ठाकरे कुटुंबीय गप्प का?,” असा सवालही सोमय्या यांनी केला होता. राज्यपालांनी बहुमत घ्या सांगितलं, संपूर्ण शिवसेनेचा ठाकरेंवर अविश्वास आहे हे सांगा असंही ते म्हणाले होते. 

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता भाजपानं सत्ता स्थापनेच्या हालचालींना सुरुवात केली आहे. सत्ता स्थापने संदर्भात भाजपाकडून आज महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. ठाकरे सरकार कोसळल्यानंतर आज गोव्यात एकनाथ शिंदे गटाची महत्वाची बैठक होणार असून या बैठकीत पुढची रणनीती ठरवली जाणार आहे, अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेKirit Somaiyaकिरीट सोमय्याShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMumbaiमुंबईMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ