शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: राज्याच्या सत्ताकारणाला वेगळा आकार; राज ठाकरेंचं 'ते' स्वप्न भाजपा करणार साकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 12:59 IST

मनसेचा केवळ एक उमेदवार विजयी होऊनही राज यांचं स्वप्न सत्यात

मुंबई: राज्याला सध्या सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे. सत्ताधाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी विधिमंडळात चांगला विरोधी पक्ष असायला हवा, असं आवाहन करत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विधानसभा निवडणूक लढवली. भाजपाला रोखण्यासाठी, त्यांच्यावर अंकुश ठेवण्याच्या दृष्टीनं राज ठाकरेंनी मतदारांना आवाहन केलं होतं. मात्र राज ठाकरेंचा केवळ एक उमेदवार निवडणुकीत विजयी झाला. परंतु राज ठाकरेंनी पाहिलेलं प्रबळ विरोधी पक्षाचं स्वप्न पूर्ण होणार आहे. राष्ट्रवादी, काँग्रेसनं शिवसेनेला पाठिंबा दिल्यानं राज्यात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन होणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं एका दिवसात बहुमत सिद्ध करण्याचा दिलेला आदेश, अजित पवारांचं फसलेलं बंड यामुळे काल देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता भाजपाला विरोधी पक्षात बसावं लागणार आहे. विशेष म्हणजे निवडणुकीत पहिला क्रमांकाचा पक्ष ठरुनही भाजपावर विरोधी बाकांवर बसण्याची नामुष्की ओढवली आहे. तर राज्यातील दुसरा, तिसरा आणि चौथा क्रमांकाचा पक्ष सत्तेत जाणार आहे. मात्र त्यांच्यासमोर तब्बल १०५ आमदारांसह विरोधी पक्षात असलेल्या भाजपाचं आव्हान असेल. नव्या विधानसभेत शिवसेनेचे ५६ आमदार आहेत. तर राष्ट्रवादीचे ५४, काँग्रेसचे ४४ आमदार आहेत. या आमदारांची एकूण संख्या पाहिल्यास ती १५४ वर जाते. याशिवाय शिवसेनेला काही अपक्ष आमदारांचादेखील पाठिंबा आहे. काही दिवसांपूर्वीच हॉटेल ग्रँड हयातमध्ये महाविकासआघाडीनं १६२ आमदारांना एकनिष्ठतेची शपथ घेत शक्तिप्रदर्शन केलं. महाविकासआघाडीला विधानसभेत १०५ आमदार असलेल्या भाजपाला तोंड द्यावं लागेल. त्यामुळे तीन प्रमुख पक्षांचं आघाडी सरकार विरुद्ध भाजपा असा सामना विधानसभेत पाहायला मिळू शकतो. राज ठाकरेंनी निवडणूक प्रचारात राज्याला सक्षम विरोधी पक्षाची गरज असल्याचं म्हटलं होतं. राज ठाकरेंचं हे स्वप्न आता साकार होणार आहे.राज ठाकरेंचा केवळ एक उमेदवार निवडून आला. कल्याणमधून राजू पाटील विजयी झाले. राज ठाकरेंनी आपल्याला विरोधी पक्षात बसायचं आहे, असं म्हटलं होतं. मात्र त्यांचा एकमेव आमदार सत्तेत जाण्याची शक्यता आहे. पाटील यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून मंत्रिपदं दिलं जाऊ शकतं. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि मनसेनं अनेक ठिकाणी एकमेकांना सहकार्य केलं होतं. त्याची परतफेड म्हणून पाटील यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस