शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

Maharashtra Government: राज्याच्या सत्ताकारणाला वेगळा आकार; राज ठाकरेंचं 'ते' स्वप्न भाजपा करणार साकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 12:59 IST

मनसेचा केवळ एक उमेदवार विजयी होऊनही राज यांचं स्वप्न सत्यात

मुंबई: राज्याला सध्या सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे. सत्ताधाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी विधिमंडळात चांगला विरोधी पक्ष असायला हवा, असं आवाहन करत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विधानसभा निवडणूक लढवली. भाजपाला रोखण्यासाठी, त्यांच्यावर अंकुश ठेवण्याच्या दृष्टीनं राज ठाकरेंनी मतदारांना आवाहन केलं होतं. मात्र राज ठाकरेंचा केवळ एक उमेदवार निवडणुकीत विजयी झाला. परंतु राज ठाकरेंनी पाहिलेलं प्रबळ विरोधी पक्षाचं स्वप्न पूर्ण होणार आहे. राष्ट्रवादी, काँग्रेसनं शिवसेनेला पाठिंबा दिल्यानं राज्यात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन होणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं एका दिवसात बहुमत सिद्ध करण्याचा दिलेला आदेश, अजित पवारांचं फसलेलं बंड यामुळे काल देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता भाजपाला विरोधी पक्षात बसावं लागणार आहे. विशेष म्हणजे निवडणुकीत पहिला क्रमांकाचा पक्ष ठरुनही भाजपावर विरोधी बाकांवर बसण्याची नामुष्की ओढवली आहे. तर राज्यातील दुसरा, तिसरा आणि चौथा क्रमांकाचा पक्ष सत्तेत जाणार आहे. मात्र त्यांच्यासमोर तब्बल १०५ आमदारांसह विरोधी पक्षात असलेल्या भाजपाचं आव्हान असेल. नव्या विधानसभेत शिवसेनेचे ५६ आमदार आहेत. तर राष्ट्रवादीचे ५४, काँग्रेसचे ४४ आमदार आहेत. या आमदारांची एकूण संख्या पाहिल्यास ती १५४ वर जाते. याशिवाय शिवसेनेला काही अपक्ष आमदारांचादेखील पाठिंबा आहे. काही दिवसांपूर्वीच हॉटेल ग्रँड हयातमध्ये महाविकासआघाडीनं १६२ आमदारांना एकनिष्ठतेची शपथ घेत शक्तिप्रदर्शन केलं. महाविकासआघाडीला विधानसभेत १०५ आमदार असलेल्या भाजपाला तोंड द्यावं लागेल. त्यामुळे तीन प्रमुख पक्षांचं आघाडी सरकार विरुद्ध भाजपा असा सामना विधानसभेत पाहायला मिळू शकतो. राज ठाकरेंनी निवडणूक प्रचारात राज्याला सक्षम विरोधी पक्षाची गरज असल्याचं म्हटलं होतं. राज ठाकरेंचं हे स्वप्न आता साकार होणार आहे.राज ठाकरेंचा केवळ एक उमेदवार निवडून आला. कल्याणमधून राजू पाटील विजयी झाले. राज ठाकरेंनी आपल्याला विरोधी पक्षात बसायचं आहे, असं म्हटलं होतं. मात्र त्यांचा एकमेव आमदार सत्तेत जाण्याची शक्यता आहे. पाटील यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून मंत्रिपदं दिलं जाऊ शकतं. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि मनसेनं अनेक ठिकाणी एकमेकांना सहकार्य केलं होतं. त्याची परतफेड म्हणून पाटील यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस