शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
3
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
4
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
5
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
6
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
7
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
8
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
9
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
10
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
11
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
12
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
13
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
15
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
16
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
17
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
18
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
19
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
20
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 

Maharashtra Government: रामदास आठवलेंचा सूर अचानक बदलला; मुख्यमंत्रिपदासाठी सुचवला नवा फॉर्म्युला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 3:50 AM

शिवसेनेने दुर्लक्ष केल्यानंतर आठवलेंनी दुसऱ्या पक्षाकडे मोर्चा वळवला

मुंबई : मुख्यमंत्री पद मिळणार नसेल तर काँग्रेसने सेना आणि राष्ट्रवादीच्या नव्या आघाडीला पाठिंबा देऊ नये, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत शिवसेना आणि भाजपने एकत्र यावे यासाठी आठवले स्वत:च मध्यस्थीसाठी पुढाकार घेत विविध फॉर्म्युले देत होते. सेनेने त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर आता त्यांनी काँग्रेसकडे मोर्चा वळविला आहे.शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचे नव्या आघाडीचे सरकार स्थापन होत असताना मुख्यमंत्री पद शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वाटून घेतले जाणार असल्याची चर्चा आहे. तर, काँग्रेसला उपमुख्यमंत्री पद दिले जाणार आहे. त्यामुळे नव्या आघाडीला पाठिंबा देताना काँग्रेसने विचार करावा, असा सल्ला आठवले यांनी दिला. या वेळी नव्या आघाडीचा फॉर्म्युलाही त्यांनी सुचविला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या आघाडीत शिवसेनेला दोन वर्षे मुख्यमंत्री पद द्यावे. उरलेल्या तीन वर्षांपैकी दीड वर्ष राष्ट्रवादी आणि दीड वर्ष काँग्रेसने घ्यावे. त्यासाठी काँग्रेसने आग्रही राहावे.काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे. अनेक अडचणींचा सामना करीत त्यांनी सेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा करण्यास मागे हटू नये; मुख्यमंत्रिपद मिळणार नसेल तर नव्या आघाडीला काँग्रेसने पाठिंबा देऊ नये, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ramdas Athawaleरामदास आठवलेcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना