शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

दक्षिणेकडील राज्यासह महाराष्ट्र तापला; केरळात सर्वाधिक कमाल तापमान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 1:40 AM

उत्तर-मध्य महाराष्ट्रातील किमान तापमान अद्याप खालीच

मुंबई : देशात १ मार्चपासून मान्सूनपूर्व हंगाम सुरू झाला आहे. परिणामी, देशाच्या दक्षिण आणि मध्य भारतातून तापमानवाढीस सुरुवात झाली असून, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आणि ओरिसातील कमाल तापमानाने ३५ अंश सेल्सिअसचा आकडा पार केला आहे. विशेषत: केरळ, मुंबई, गोवा आणि कोकणातील तापमानात वाढ नोंदविण्यात येत असून, देशातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद केरळमधील पुनालूर येथे ३९ अंश झाली आहे. तापमानवाढीच्या शहरांमध्ये तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि महाराष्ट्र राज्यातील शहरांचा समावेश होत आहे.

विदर्भात गेल्या २४ तासांत तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले. दरम्यान, राज्यभरात हवामानात बदल नोंदविण्यात येत असतानाच, उत्तर मध्य महाराष्ट्रातील किमान तापमानाचा पारा खालीच आहे. २४ तासांनंतर यात वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.विदर्भाला पावसाचा इशारा१२ मार्च रोजी मुंबईतील आकाश अंशत: ढगाळ राहील. १३ मार्चला आकाश निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे २९, २० अंशांच्या आसपास राहील. १३ मार्चपर्यंत विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

टॅग्स :Heat Strokeउष्माघातweatherहवामानTemperatureतापमान