शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

Maharashtra Exit Poll: अजून एक एक्झिट पोल म्हणतो राज्यात भाजपा-सेना युतीचेच सरकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 18:57 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यास आता केवळ काही तासांचा अवधी राहिला आहे. दरम्यान, विधानसभेचा संभाव्य निकाल काय असेल, याबाबत सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांकडून तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत.

मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यास आता केवळ काही तासांचा अवधी राहिला आहे. दरम्यान, विधानसभेचा संभाव्य निकाल काय असेल, याबाबत सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांकडून तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. तसेच विविध वृत्तवाहिन्यांच्या एक्झिट पोलमधूनही संभाव्य निकालाचा कल सांगितला जात आहे. दरम्यान, आज टीव्ही नाईन या वृत्तवाहिनीने व्हीडीपीएच्या हवाल्याने एक एक्झिट पोल प्रसारित केला असून, या पोलमधूनसुद्धा राज्यात भाजपा आणि शिवसेना महायुतीचे सरकार मोठ्या मताधिक्यासह पुन्हा सत्तेत येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.व्हीडीपीएच्या एक्झिट पोलनुसार  राज्यातील विधानसभेच्या 288 जागांपैकी भाजपाला 126 ते 135 जागा मिळतील. तर शिवसेनेला 79 ते 88 जागा मिळतील. मात्र काँग्रेसची मोठ्या प्रमाणावर घसरण होईल, असा अंदाज या पोलमधून वर्तवण्यात आला आहे. या पोलमधील आकडेवारीनुसार काँग्रेसला केवळ 16 ते 26 जागा मिळतील , असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस तुलनेने चांगली कामगिरी करणार असून, राष्ट्रवादीला 33 ते 43 जागा मिळतील, असे हा एक्झिट पोल म्हणतो. इतर पक्षांचा विचार केल्यास अन्य एक्झिट पोलप्रमाणेच या एक्झिट पोलमध्येही मनसेला फार यश मिळणार नसल्याचा अंदाज वर्तवला आहे. मनसेला 0 ते 1 जागा मिळेल. तर वंचित बहुजन आघाडी 2 ते 5 जागा जिंकण्यात यशस्वी ठरेल. तर इतर 5 ते 13 जागी विजय ठरतील.दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात सोमवारी मतदान पार पडलं. यानंतर  एबीपी माझा आणि सी व्होटरनं केलेल्या सर्वेक्षणानुसार राज्यात महायुतीची सत्ता कायम राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुपारी 3 पर्यंतचं मतदान गृहित धरून हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही महायुतीच विजयी होईल, अशी सर्वेक्षणातील आकडेवारी सांगते. या सर्वेक्षणानुसार महायुतीला 192 ते 216 जागा मिळू शकतात. सध्या विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पुढील पाच वर्षेदेखील विरोधी बाकांवरच बसावं लागण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणानुसार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीला 55 ते 81 जागा मिळण्याचा अंदाज आहे.  मागील निवडणुकीत राज्यात सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी 122 जागा जिंकत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर शिवसेना 63 जागा जिंकून दुसऱ्या स्थानी राहिली होती. त्यावेळी काँग्रेसला 42, राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी निवडणुकीचा निकाल जाहीर होताच राष्ट्रवादीनं भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला. यानंतर काही दिवसांत शिवसेना सत्तेत सहभागी झाली होती. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019exit pollमतदानोत्जतर जनमत चाचणीBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस