शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

अजित पवारांच्या बंडाशी संबंध नाही - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 4:43 AM

‘शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांनी सत्ता स्थापनेचा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांनी केलेल्या बंडाशी माझा काहीही संबंध नाही.

क-हाड (जि.सातारा)  - ‘शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांनी सत्ता स्थापनेचा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांनी केलेल्या बंडाशी माझा काहीही संबंध नाही. त्यांना पक्षातून काढून टाकायचे की त्यांच्यावर कोणती अन्य कारवाई करायची, याचा निर्णय पक्षातील सर्वांच्या विचाराने घेतला जाईल,असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.कºहाड येथे सोमवारी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी खा. पवार यांनी अभिवादन केले. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असली तरी त्यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचेच सरकार अस्तित्वात येईल. राज्यपालांनी सांगितलेल्या दिवशी मतदान होईल. त्यावेळी सर्व गोष्टी स्पष्ट होतील. मात्र शिवसेना,राष्ट्रवादी व काँॅग्रेसचेच सरकार येईल. सरकार बनवण्यासाठी आवश्यक असलेले संख्याबळ आमच्याकडे आहे,’ असेही पवार यांनी यावेळी सांगितले.‘मुंबईतलं सगळं नीटनेटकं करतो’‘तुम्ही उसाचं वजन कसं वाढंल, याची चर्चा करा. मुंबईत सध्या काय चाललंय, त्याची चर्चा करत बसू नका. मी ते सगळं नीटनेटकं करतो. त्याची काळजी करू नका,असे सांगत शरद पवार यांनी एकप्रकारे राज्यात आपलेच सरकार येणार, असा विश्वास व्यक्त केला. यशवंतनगर (ता. कºहाड) येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचा ४६ वा गळीत हंगाम प्रारंभ शरद पवार यांच्या हस्ते सोमवारी पार पडला. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019