शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Maharashtra Election 2019: 'एका कुटुंबाचा 'स्वाभिमान' काल कणकवलीत गळून पडला'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 18:11 IST

नारायण राणेंनी काल त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन केला

सिंधुदुर्ग: एका कुटुंबाचा स्वाभिमान काल कणकवलीत गळून पडला, अशी खोचक टीका शिवसेनेचे नेते सुभाष देसाईंनी यांनी खासदार नारायण राणेंवर केली. बाळासाहेबांना, काँग्रेसला आणि स्वत:च्या कार्यकर्त्यांना फसवणारे भाजपाला काय देणार, अशा शब्दांत देसाईंनी अप्रत्यक्षपणे राणेंना लक्ष्य केलं. त्यामुळे राणे विरुद्ध शिवसेना हा वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. काल नारायण राणेंनी त्यांच्या दोन्ही मुलांसोबत भाजपात प्रवेश केला. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन करत असल्याची घोषणा त्यावेळी राणेंनी केली. त्यावर भाष्य करताना एका कुटुंबाचा 'स्वाभिमान' काल कणकवलीत गळून पडला, असं भाष्य शिवसेना नेते सुभाष देसाईंनी केलं. यावेळी त्यांनी दीपक केसरकर यांच्या विधानाचा संदर्भ दिला. नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरेंविरोधात केलेल्या विधानाबाबत जाहीर माफी मागितल्यास शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील वाद निश्चितपणे संपेल, असं केसरकर काल म्हणाले होते. त्यावर माफी मागायची असेल तर निवडणुकीतून माघार घ्या आणि शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांना पाठिंबा द्या, असं देसाई म्हणाले. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही नारायण राणेंचा समाचार घेतला. 'मातीच्या ढिगाऱ्यावरील ही ऐतिहासिक सभा आहे. येत्या २४ तारखेनंतर या ठिकाणी कोणाला तरी गाडायचं आहे. शिवसेना औषधाला राहणार नाही असं म्हणणारे आज सेनेशी जुळवून घ्यायला बघतात, हा काळाचा महिमा आहे. येवल्यापासून कणकवलीपर्यंत शिवसेना संपवण्याची भाषा करणाऱ्यांची आज अवस्था पहा,' अशा शब्दांत राऊत यांनी राणे यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनादेखील लक्ष्य केलं.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kankavli-acकणकवलीNarayan Raneनारायण राणे Shiv SenaशिवसेनाBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेSubhash Desaiसुभाष देसाई