शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

Maharashtra Election 2019: 'एका कुटुंबाचा 'स्वाभिमान' काल कणकवलीत गळून पडला'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 18:11 IST

नारायण राणेंनी काल त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन केला

सिंधुदुर्ग: एका कुटुंबाचा स्वाभिमान काल कणकवलीत गळून पडला, अशी खोचक टीका शिवसेनेचे नेते सुभाष देसाईंनी यांनी खासदार नारायण राणेंवर केली. बाळासाहेबांना, काँग्रेसला आणि स्वत:च्या कार्यकर्त्यांना फसवणारे भाजपाला काय देणार, अशा शब्दांत देसाईंनी अप्रत्यक्षपणे राणेंना लक्ष्य केलं. त्यामुळे राणे विरुद्ध शिवसेना हा वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. काल नारायण राणेंनी त्यांच्या दोन्ही मुलांसोबत भाजपात प्रवेश केला. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन करत असल्याची घोषणा त्यावेळी राणेंनी केली. त्यावर भाष्य करताना एका कुटुंबाचा 'स्वाभिमान' काल कणकवलीत गळून पडला, असं भाष्य शिवसेना नेते सुभाष देसाईंनी केलं. यावेळी त्यांनी दीपक केसरकर यांच्या विधानाचा संदर्भ दिला. नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरेंविरोधात केलेल्या विधानाबाबत जाहीर माफी मागितल्यास शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील वाद निश्चितपणे संपेल, असं केसरकर काल म्हणाले होते. त्यावर माफी मागायची असेल तर निवडणुकीतून माघार घ्या आणि शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांना पाठिंबा द्या, असं देसाई म्हणाले. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही नारायण राणेंचा समाचार घेतला. 'मातीच्या ढिगाऱ्यावरील ही ऐतिहासिक सभा आहे. येत्या २४ तारखेनंतर या ठिकाणी कोणाला तरी गाडायचं आहे. शिवसेना औषधाला राहणार नाही असं म्हणणारे आज सेनेशी जुळवून घ्यायला बघतात, हा काळाचा महिमा आहे. येवल्यापासून कणकवलीपर्यंत शिवसेना संपवण्याची भाषा करणाऱ्यांची आज अवस्था पहा,' अशा शब्दांत राऊत यांनी राणे यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनादेखील लक्ष्य केलं.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kankavli-acकणकवलीNarayan Raneनारायण राणे Shiv SenaशिवसेनाBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेSubhash Desaiसुभाष देसाई