शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

महाराष्ट्र निवडणूक 2019: उद्धव ठाकरेंची सोनिया गांधींशी 'फोन पे चर्चा'; शिवसेना नेते थोड्याच वेळात राजभवनावर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 4:34 PM

बहुमताचं गणित जुळवण्यात यश?; शिवसेना नेते-राज्यपालांच्या भेटीकडे राज्यांचं लक्ष

मुंबई: भाजपापासून दूर गेलेली शिवसेना लवकरच राज्यात लवकरच सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे नेते थोड्याच वेळात राज्यपालांची भेट घेणार आहेत. या भेटीत शिवसेनेकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जाऊ शकतो. सध्या याच पार्श्वभूमीवर राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत. शिवसेना नेते सकाळपासून राष्ट्रवादी, काँग्रेसच्या संपर्कात असल्यानं राज्यपालांच्या भेटीत नेमकं काय घडणार, त्याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. आज दिवसभर राजकीय वर्तुळात भेटीगाठी आणि बैठकांचं सत्र सुरू आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर थोड्याच वेळापूर्वी उद्धव यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचं समजतं आहे. तत्पूर्वी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार अनिल देसाई सकाळपासून काँग्रेसच्या, तर उद्धव ठाकरे शरद पवारांच्या संपर्कात होते. त्यामुळे राज्यात 'महाशिवआघाडी'चं सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे.राज्यात सत्ता स्थापनेच्या घडामोडी वेगानं सुरू असताना शिवसेना नेते थोड्याच वेळात राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत. या भेटीत नेमकं काय होणार, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. शिवसेना या भेटीत बहुमताचा दावा करणार की राज्यपालांकडून अधिक वेळ मागून घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. भाजपाला राज्यपालांनी ७२ तासांचा अवधी दिला होता. त्या तुलनेत शिवसेनेला अतिशय कमी वेळ मिळाल्याचं आज सकाळीच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना