शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

Maharashtra Election 2019: 'त्या' नेत्याला उद्धव ठाकरेंकडून बिभीषणाची उपमा? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 14:08 IST

काँग्रेस, राष्ट्रवादीतील गळतीवर उद्धव ठाकरेंचं भाष्य

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेत जोरदार इनकमिंग झालं. त्यामुळे राज्यातील विरोधी पक्षाची अवस्था वाईट झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतले अनेक नेते शिवसेना आणि भाजपामध्ये दाखल झाले. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं. राज्यातील राजकारणात गेल्या पाच वर्षांमध्ये विरोधी पक्ष नेत्याची भूमिका शिवसेनेनंच वठवली, असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यावेळी जो विरोधी नेता, त्याचं काय झालं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यावर या लोकशाहीतला सर्वात मोठा घोटाळा आहे, असं सामनाच्या संपादकांनी म्हटलं. यावर भाष्य करताना हे लोकशाहीतलं युद्ध आहे. त्याच्यामध्ये त्याही वेळेला ते बिभीषण विभीषण तिथले इथे, इथले तिथे आलेच होते. ते आता याबाबतीत येताहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पाच वर्षे सत्ता राबवल्यानंतरही निवडणूक प्रचारात काँग्रेस, राष्ट्रवादीला लक्ष्य करणार का, असा प्रश्न यावेळी उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला. त्यावर ते जर आम्हाला टार्गेट करणार असतील, तर आम्हालादेखील त्यांना टार्गेट करावं लागलं. जर ते आमच्या पाच वर्षांच्या कारभारावर बोलणार असतील, तर आम्हालाही त्यांच्या पन्नास वर्षांच्या नाकर्तेपणावर, किंबहुना भ्रष्टाचारावर बोलावं लागेल. विषय सरळ आहे.. ते जर का आम्हाला टार्गेट करत असतील तर आम्ही काय हात जोडून त्यांना सामोरे नाही जाणार, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस