शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
3
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
4
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
5
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
6
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
7
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
8
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
9
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
10
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
11
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
12
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
13
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
14
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
15
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
16
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
17
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
18
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
19
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
20
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

BIG BREAKING: उद्धव ठाकरे होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री; गृह, नगरविकास खातं राष्ट्रवादीकडे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 19:04 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाचीही चर्चा आहे, पण उद्धव ठाकरे शिवसैनिकांचा हट्ट मोडणार नाहीत, असं समजतं.

मुंबईः महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी शिवसैनिकाला बसवण्याचं वचन शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना देणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतःच राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळणार असल्याचं समजतं. राष्ट्रवादी काँग्रेस थेट आणि काँग्रेसच्या बाहेरून पाठिंब्याच्या जोरावर शिवसेनेनं आज सत्तास्थापनेचा दावा केला आहे. मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाचीही चर्चा असली, तरी उद्धव ठाकरे यांनाच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींची पसंती आहे. उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावं, असा हट्टच शिवसेना नेत्यांसह सर्व आमदार आणि शिवसैनिकांचा आहे. तो उद्धव मोडणार नाही, असा अंदाज वर्तवला जातोय.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात खातेवाटपासंदर्भातही चर्चा झाली असून गृह आणि नगरविकास ही खाती राष्ट्रवादीकडे असावीत, यासाठी पवार आग्रही आहेत. वित्त आणि नियोजन खातं सुभाष देसाई यांच्याकडे सोपवलं जाईल, तर गृहमंत्रिपद जयंत पाटील यांना दिलं जाण्याची शक्यता आहे. अजित पवार यांना नगरविकास मंत्रालय दिलं जाऊ शकतं.  

विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपानं, आपण सरकार स्थापन करू शकत नसल्याचं रविवारी राज्यपालांना कळवलं होतं. अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या पाठिंब्याच्या जोरावर भाजपानं ११८ आमदारांचं संख्याबळ जमा केलं होतं. परंतु, छोट्या भावाने त्यांना मोठाच हादरा दिला.   

भाजपा-शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रिपदावरून वादाची ठिणगी पडली होती. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाची मागणी शिवसेनेनं लावून धरली, भाजपावर शब्द फिरवत असल्याचा - खोटेपणाचा आरोप केला. याउलट, असा शब्द दिलाच नव्हता, या भूमिकेवर भाजपा ठाम राहिली. त्यामुळे गेले १८ दिवस राज्यातील सरकारस्थापनेचा गुंता सुटत नव्हता, मुख्यमंत्री ठरतच नव्हता. दोन भावांमधील वाद विकोपाला गेला आणि ३० वर्षांचं नातं तुटेपर्यंत ताणलं गेलं.

 

या पार्श्वभूमीवर, भाजपानं सरकार स्थापण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्तास्थापनेचं आमंत्रण दिलं होतं. त्यानंतर आज दिवसभर गल्लीपासून दिल्लीपर्यंत वेगाने हालचाली घडल्या. हो-नाही करता-करता काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देण्यास हिरवा कंदील दाखवला आणि राज्यात महाशिवआघाडीचं सरकार येणार यावर शिक्कामोर्तब झालं. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार