शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
2
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
3
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
4
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
5
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
6
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
7
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
8
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
9
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
10
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
11
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
12
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
13
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
15
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
16
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
17
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
18
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
19
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
20
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार

Maharashtra Election 2019: जाहीरनामा काढणार नाही तर फाडणार; राज ठाकरेंची भाजपा- शिवसेनेवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 1:12 PM

Maharashtra Election 2019: शेतकऱ्यांना खुली बाजारपेठ, पीकविमा, फुल-फळ शेती ह्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करणार' असं ५ वर्षांपूर्वी भाजप-शिवसेना सरकारने आश्वासनं देण्यात आली होती.

शेतकऱ्यांना खुली बाजारपेठ, पीकविमा, फुल-फळ शेती ह्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करणार' असं ५ वर्षांपूर्वी भाजप-शिवसेना सरकारने आश्वासनं देण्यात आली होती. सरकारने 5 वर्षात दिलेली आश्वासन पूर्ण केली नाहीत आणि आता सत्तेत येण्यासाठी पुन्हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. मला एकाने विचारलं की मनसेचं जाहीनाम्याचं कायं मी त्याला म्हणलं मी जाहीरनामा काढणार नाही तर विधानसभेत सत्ताधाऱ्यांचा जाहीरनामा फाडणार असं म्हणत मनसेप्रमुखराज ठाकरेंनी भाजपा व शिवसेनेने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यावर निशाणा साधला आहे. 

काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या भ्रष्टाचारी लोकांना भाजपने तिकिटं दिली, मग काय बदल झाला? काय बदल होणार आहे? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. त्याचप्रमाणे नोटबंदीसारख्या निर्णयामुळे आज देशभरात मंदी आली आहे. हे आर्थिक मंदीचे दिवस कुणामुळे आले? त्यात भाजपाचे कायदामंत्री रवीशंकर प्रसाद म्हणतात 'हिंदी चित्रपट कोट्यवधी कमावतात म्हणजे मंदी नाही.' मग देशातले सर्व उद्योगधंदे बंद होत आहेत, ह्याला काय म्हणतात? हजारो तरुण बेरोजगार होत आहेत असं म्हणत राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. यवतमाळमधील वणी मतदारसंघातील प्रचारसभेत ते बोलत होते.

दरम्यान, शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली आहे असं भाजपाने जाहिरनाम्यात लिहिलं होतं. या सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या कशा वाढल्या? गेल्या 5 वर्षात 14 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तसेच  ज्यांनी बँका बुडवल्या ते मजेत आहे, पूल कोसळले माणसं मेली, या गोष्टींचा राग येत नाही, 5 वर्षापूर्वी यांनी काय सांगितले, किती गोष्टी केल्या याबाबत कोणीही विचारणा केली नाही. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्याचं भाषण होण्यापूर्वी बाजूच्या गावात एका शेतकऱ्याने आत्महत्या केली असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019yavatmal-acयवतमाळ