शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

Maharashtra Election 2019: कलम 370 वर राज ठाकरेंचं अवघ्या दोन शब्दांत भाष्य; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 21:46 IST

पंतप्रधान मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहांवर निशाणा

मुंबई: काश्मीरमधून काढून टाकण्यात आलेल्या कलम 370 चा मुद्दा राज्याच्या निवडणूक प्रचारात वारंवार उपस्थित करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहांनाराज ठाकरेंनी दोन शब्दात उत्तर दिलं आहे. 'काश्मीरमधून कलम 370 हटवलंत. 'अभिनंदन, पुढे?'', अशा अवघ्या दोन शब्दांमध्ये राज यांनी या विषयावर भाष्य केलं. तुम्ही कामावर नव्हे, तर भावनेवर मतदान करता. याचा गैरफायदा घेऊन अशा प्रकारे राज्याशी संबंधित नसलेले मुद्दे राज्याच्या निवडणुकीत काढले जातात, असं राज ठाकरे उपस्थितांना म्हणाले. ते मालाडमधील प्रचारसभेत बोलत होते. तुम्ही थंड राहता. तुम्ही पेटून उठत नाही. त्यामुळेच तुम्हाला सत्ताधारी गृहीत धरतात, असं राज ठाकरे म्हणाले. पुन्हा सत्ता द्या, वेगळा विदर्भ करू, अशी भाषा भाजपाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार करतात. महाराष्ट्र म्हणजे काय तुमच्या वाढदिवसाचा केक वाटला का?, असा प्रश्न राज यांनी विचारला. शिवरायांचा जन्म शिवनेरीवर झाला. तर त्यांच्या आई जिजामातांचा जन्म सिंदखेडराजामध्ये झाला. महाराष्ट्राचे तुकडे करुन तुम्ही आई आणि मुलाची ताटातूट करणार का, असादेखील सवाल राज यांनी उपस्थित केला.राज ठाकरेंनी बुलेट ट्रेनवरुन पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलं. दूरवर असणारी ठिकाणं जोडण्यासाठी बुलेट ट्रेनचा वापर करण्यात येतो. मग मुंबई, अहमदाबाद या दोन जवळच्या शहरांना जोडण्यासाठी बुलेट ट्रेन सुरू करण्याचं कारण काय, असा प्रश्न राज यांनी विचारला. मुंबई महाराष्ट्राला मिळाली, त्याचा राग अद्याप काहींच्या मनात आहे. त्यामुळे बुलेट ट्रेनच्या माध्यमातून मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप राज यांनी केला.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Raj Thackerayराज ठाकरेArticle 370कलम 370Amit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदी