शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

Maharashtra Government: सोनिया गांधींनी दाखवली 'पॉवर'; तीन कारणांमुळे शिवसेनेला पाठिंबा नाकारला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 14:23 IST

सोनिया गांधी यांच्या मनाला सगळ्यात जास्त लागलेली गोष्ट म्हणजे, शिवसेनेनं सातत्याने त्यांच्या परदेशी मुळावरून केलेली बोचरी टीका.

ठळक मुद्देशेवटपर्यंत काँग्रेसचं पाठिंब्याचं पत्रच न आल्यानं शिवसेनेची वेळ निघून गेली.सोनिया गांधींनी ठाम भूमिका घेतल्यामुळे शिवसेनेचा स्वप्नभंग झाल्याचं बोललं जातंय.ठाकरे कुटुंबाबद्दल त्यांच्या मनात कटुता असल्याचं निकटवर्तीय सांगतात.

मुंबईः विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाने संख्याबळाअभावी सत्तास्थापनेस असमर्थता दर्शवल्यानंतर, राज्यात 'महाशिवआघाडी'चं सरकार येण्याची शक्यता सोमवारी निर्माण झाली होती. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन करतील, अशी चिन्हं दिसू लागली होती. परंतु, शेवटपर्यंत काँग्रेसचं पाठिंब्याचं पत्रच न आल्यानं शिवसेनेची वेळ निघून गेली. सत्तास्थापनेचा दावा न करताच त्यांच्या नेत्यांना 'राजभवना'वरून परतावं लागलं. त्यांच्यासाठी हा मोठाच धक्का मानला जातोय. त्याला जबाबदार कोण, याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. त्यात, काही जण शरद पवारांकडे बोट दाखवत असले, तरी जाणकारांच्या अंदाजानुसार कालचा दिवस 'सोनियाचा दिन'च ठरला. शिवसेनेबद्दलचं मत आणि काँग्रेसची तत्व याचा विचार करून काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी ठाम भूमिका घेतल्यामुळे शिवसेनेचा स्वप्नभंग झाल्याचं काही वरिष्ठ पत्रकारांनी नमूद केलं आहे. सोनिया गांधींच्या या भूमिकेमागे दोन ठळक कारणं असू शकतात, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. 

सत्तेचा पेच सुटत नसल्याने शिवसेना आमदारांची धाकधूक वाढली

सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याची शक्यता; काँग्रेसचे 'चाणक्य' पवारांच्या भेटीला

शिवसेनेची विचारधारा हिंदुत्ववादी आहे आणि काँग्रेस पक्ष कायमच धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करत आला आहे, हा झाला अत्यंत मूलभूत मुद्दा. त्यावरून त्यांच्यात झडलेल्या चकमकी, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सगळ्यांनीच पाहिल्यात. मात्र, सोनिया गांधी यांच्या मनाला सगळ्यात जास्त लागलेली गोष्ट म्हणजे, शिवसेनेनं सातत्याने त्यांच्या परदेशी मुळावरून केलेली बोचरी टीका. 'इटालियन मम्मी' असा उल्लेख सेना नेत्यांकडून अनेकदा झाला होता, तो त्यांना अजिबातच रुचला नव्हता. त्यामुळे ठाकरे कुटुंबाबद्दल त्यांच्या मनात कटुता असल्याचं निकटवर्तीय सांगतात. 

देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या आत्मचरित्रात एका प्रसंगाचा उल्लेख केला आहे, तो सोनियांची 'मन की बात' सांगून जातो. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीआधी प्रणव मुखर्जी यांनी 'मातोश्री'वर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी, या भेटीमुळे आपण अत्यंत नाराज असल्याचा निरोप सोनिया गांधींनी अहमद पटेल आणि गिरीजा व्यास यांच्या माध्यमातून पाठवला होता, असं मुखर्जींनी The Coalition Years मध्ये नमूद केलं आहे. असं असताना, शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारला काँग्रेसनं आतून किंवा बाहेरून पाठिंबा देणं जरा अवघडच आहे. 

'तुमसे ना हो पाएगा', नेटिझन्सकडून मीम्सद्वारे सेनेची खिल्ली!

तुम्ही भले वचन दिलं असेल, पवार, सोनियांनी नाही; भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला 

दुसरा मुद्दा आहे तो, केरळ लॉबीचा. काँग्रेसने शिवसेनसेला पाठिंबा देता कामा नये, अशी केरळमधील अनेक काँग्रेस नेत्यांची ठाम धारणा आहे. बाळासाहेबांनी दिलेला 'हटाव लुंगी..'चा नारा दक्षिण भारतीयांना तेव्हाही खटकला होता आणि आजही त्यांची नाराजी कायम आहे. त्यामुळे काल जेव्हा सोनिया गांधींनी विविध नेत्यांशी चर्चा केली, तेव्हा महाराष्ट्रातील नेते-आमदार पाठिंब्यासाठी आग्रही असताना, केरळ लॉबीनं स्पष्टपणे विरोध केल्याचं सूत्रांकडून समजतं. मुंबईत शिवसेना कायमच काँग्रेसच्या विरोधात राहिली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं.

शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा देण्यास विरोध करण्याचा तिसरा आणि सगळ्यात पॉवरफुल्ल मुद्दा होता, तो म्हणजे सत्ताकेंद्र. मुख्यमंत्रिपदी शिवसेनेचा नेता बसला, तरी सरकारची सूत्रं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हातीच राहतील, अशी स्पष्ट चिन्हं आहेत. कारण राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या काँग्रेसहून जास्त आहेच, पण शिवसेना नेत्यांशीही त्यांचं सख्य आहे. तसं झाल्यास, काँग्रेसचे आमदार पवारांच्या जवळ जाऊ शकतात आणि हे भविष्यात थोडं तापदायक ठरू शकतं, असं समीकरणही काँग्रेसनं मांडलं असावं, यावर जाणकारांनी प्रकाश टाकला. 

या मुद्द्यांचा विचार करता, राज्यात 'महाशिवआघाडी'चं सरकार स्थापन होणं कठीण दिसतंय. मात्र, राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं, हेही तितकंच खरं. त्यामुळे आता काय होतं आणि कधी होतं, हे पाहायचं!

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसSharad Pawarशरद पवारShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे