शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
3
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
4
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
5
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
6
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
7
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
8
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
9
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
10
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
11
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
12
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
13
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
14
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
15
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
16
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
17
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
18
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
19
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
20
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?

Maharashtra Election 2019 : काँग्रेसचे बाजीप्रभू...

By अतुल कुलकर्णी | Updated: October 10, 2019 04:30 IST

Maharashtra Vidhan Sabha Election: दिल्लीच्या पक्षाच्या बैठकीत ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना हवे ते मतदारसंघ वाटून घ्यावेत अशी सूचना आली त्यावेळी कोणीही पुढे आले नाही.

- अतुल कुलकर्णी

मी बाजीप्रभूसारखा लढत आहे, असे सांगून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्वत:ची अवस्था अधोरेखित केली आहे. मात्र स्वत:ला बाजीप्रभू म्हणून घेण्याने त्यांनी अनेकांची अडचण केली आहे. आपल्यासोबत अनेक जण काम करत आहेत, पण मी मात्र अठरा अठरा तास काम करतोय असेही म्हणाले; पण ज्या गतीने आणि ज्या शिस्तीत भाजपचे काम चालू आहे ते पाहिले तर काँग्रेसमध्ये नेमके काय चालू आहे असा प्रश्न पडतो. दिल्लीच्या पक्षाच्या बैठकीत ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना हवे ते मतदारसंघ वाटून घ्यावेत अशी सूचना आली त्यावेळी कोणीही पुढे आले नाही. अशोक चव्हाण यांना राजीव सातव नको आहेत, बाळासाहेब थोरात यांनी आपल्यासाठी शब्द टाकला नाही असे सांगत हर्षवर्धन पाटील काँग्रेस सोडून गेले. काँग्रेसमध्ये सभा गाजवणारा, शहरी, ग्रामीण दोन्हीकडे चालू शकणारा चेहरा थांबवून ठेवण्यात यश येत नसेल तर बाजीप्रभूंची झुंज नेमकी कोणासाठी चालू आहे? असा प्रश्न येतो. पृथ्वीराज चव्हाण मुंबईतल्या माध्यमांचे आवडते. त्यांच्या बोलण्याला प्रसिद्धी मिळते हे लक्षात घेऊनही ते मुंबईबाहेर कसे राहतील याकडे अन्य नेत्यांचे लक्ष लागलेले. शिवाय, त्यांनी सातारा लोकसभा लढवावी असे पिल्लू सोडले गेले, कारण काय तर चव्हाण दिल्लीत गेले तर राज्यातील विरोधी पक्ष नेतेपदाची स्पर्धा कमी होईल...! या नीतीने आणि वृत्तीने जर काँग्रेसचे नेते वावरत असतील तर पक्ष कसा उभा राहणार? मुंबईत पक्षाच्या मुख्य कार्यालयात वॉर रुम सुरु आहे पण तेथे काम करण्यासाठी जी यंत्रणा लोकसभेच्यावेळी होती, ती आज दिसत नाही. काँग्रेसमधला एकही नेता राज्यभर फिरताना, सरकारच्या अपयशाच्या कहाण्या सांगताना, आक्रमकपणे सरकारवर हल्ला चढवताना, मंत्र्यांवर गंभीर आरोप करताना दिसत नाही. सगळे काही स्वत:ला सांभाळून. उगाच आपले काही निघाले तर काय करायचे? ही भीती या नेत्यांच्या वागण्या, बोलण्यातून स्पष्ट दिसते आहे. त्याउलट राष्टÑवादीत ८० वर्षाचा तरुण नेता राज्य ढवळून काढत आहे. माध्यमांकडे जाणे, स्वत:हून मुलाखती देणे, परसेप्शन बदलण्यासाठी काम करणे या गोष्टींचे कदाचित काँग्रेसच्या नेत्यांना वावडे झाले असावे असे चित्र आहे. जो तो आपापल्या मतदारसंघाच्या बाहेर पडायला तयार नाही, किंवा आक्रमक प्रचार करण्याच्या मनस्थितीत नाही. प्रचाराचा फुगा तोंडानेच फुगवणे सुरु असताना सुशीलकुमार शिंदे यांनी त्यालाच टाचणी लावणारे विधान केले. अजीर्ण होईल एवढ्यावेळा भाजपकडून कलम ३७० पुढे केले जात असताना ही निवडणूक राज्यातल्या प्रश्नावर, विकासावर नेण्याचे काम करण्याची मोठी जबाबदारी विरोधकांची असताना त्यासाठीही कोणी जीवाचा आकांत करताना दिसत नाही. मग खिंड कशी लढणार..? गडावर महाराज सुखरुप पोहोचले की तोफांचे आवाज करा, तोपर्यंत मी खिंड लढवतो अशी जीद्द बाजीप्रभूमध्ये होती. असेही सांगितले जाते की बाजीप्रभूचे शीर कलम केले तर त्यांचे तलवारी घेतलेले दोन्ही हात विद्यूत वेगाने चालतच होते. त्यातला अतीशयोक्तीचा भाग वगळला तरीही इथे जागेपणी विरोधकांवर हमला करण्यासाठीचा आक्रमकपणा हरवलेला दिसत आहे. त्यामुळे केवळ बातम्यांसाठी स्वत:ला बाजीप्रभू म्हणून घेण्याचे विधानसभेचे युध्द जिंकता येईल अशी स्थिती नाही.

टॅग्स :Balasaheb Thoratआ. बाळासाहेब थोरातMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसBJPभाजपाAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019