शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : काँग्रेसचे बाजीप्रभू...

By अतुल कुलकर्णी | Updated: October 10, 2019 04:30 IST

Maharashtra Vidhan Sabha Election: दिल्लीच्या पक्षाच्या बैठकीत ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना हवे ते मतदारसंघ वाटून घ्यावेत अशी सूचना आली त्यावेळी कोणीही पुढे आले नाही.

- अतुल कुलकर्णी

मी बाजीप्रभूसारखा लढत आहे, असे सांगून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्वत:ची अवस्था अधोरेखित केली आहे. मात्र स्वत:ला बाजीप्रभू म्हणून घेण्याने त्यांनी अनेकांची अडचण केली आहे. आपल्यासोबत अनेक जण काम करत आहेत, पण मी मात्र अठरा अठरा तास काम करतोय असेही म्हणाले; पण ज्या गतीने आणि ज्या शिस्तीत भाजपचे काम चालू आहे ते पाहिले तर काँग्रेसमध्ये नेमके काय चालू आहे असा प्रश्न पडतो. दिल्लीच्या पक्षाच्या बैठकीत ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना हवे ते मतदारसंघ वाटून घ्यावेत अशी सूचना आली त्यावेळी कोणीही पुढे आले नाही. अशोक चव्हाण यांना राजीव सातव नको आहेत, बाळासाहेब थोरात यांनी आपल्यासाठी शब्द टाकला नाही असे सांगत हर्षवर्धन पाटील काँग्रेस सोडून गेले. काँग्रेसमध्ये सभा गाजवणारा, शहरी, ग्रामीण दोन्हीकडे चालू शकणारा चेहरा थांबवून ठेवण्यात यश येत नसेल तर बाजीप्रभूंची झुंज नेमकी कोणासाठी चालू आहे? असा प्रश्न येतो. पृथ्वीराज चव्हाण मुंबईतल्या माध्यमांचे आवडते. त्यांच्या बोलण्याला प्रसिद्धी मिळते हे लक्षात घेऊनही ते मुंबईबाहेर कसे राहतील याकडे अन्य नेत्यांचे लक्ष लागलेले. शिवाय, त्यांनी सातारा लोकसभा लढवावी असे पिल्लू सोडले गेले, कारण काय तर चव्हाण दिल्लीत गेले तर राज्यातील विरोधी पक्ष नेतेपदाची स्पर्धा कमी होईल...! या नीतीने आणि वृत्तीने जर काँग्रेसचे नेते वावरत असतील तर पक्ष कसा उभा राहणार? मुंबईत पक्षाच्या मुख्य कार्यालयात वॉर रुम सुरु आहे पण तेथे काम करण्यासाठी जी यंत्रणा लोकसभेच्यावेळी होती, ती आज दिसत नाही. काँग्रेसमधला एकही नेता राज्यभर फिरताना, सरकारच्या अपयशाच्या कहाण्या सांगताना, आक्रमकपणे सरकारवर हल्ला चढवताना, मंत्र्यांवर गंभीर आरोप करताना दिसत नाही. सगळे काही स्वत:ला सांभाळून. उगाच आपले काही निघाले तर काय करायचे? ही भीती या नेत्यांच्या वागण्या, बोलण्यातून स्पष्ट दिसते आहे. त्याउलट राष्टÑवादीत ८० वर्षाचा तरुण नेता राज्य ढवळून काढत आहे. माध्यमांकडे जाणे, स्वत:हून मुलाखती देणे, परसेप्शन बदलण्यासाठी काम करणे या गोष्टींचे कदाचित काँग्रेसच्या नेत्यांना वावडे झाले असावे असे चित्र आहे. जो तो आपापल्या मतदारसंघाच्या बाहेर पडायला तयार नाही, किंवा आक्रमक प्रचार करण्याच्या मनस्थितीत नाही. प्रचाराचा फुगा तोंडानेच फुगवणे सुरु असताना सुशीलकुमार शिंदे यांनी त्यालाच टाचणी लावणारे विधान केले. अजीर्ण होईल एवढ्यावेळा भाजपकडून कलम ३७० पुढे केले जात असताना ही निवडणूक राज्यातल्या प्रश्नावर, विकासावर नेण्याचे काम करण्याची मोठी जबाबदारी विरोधकांची असताना त्यासाठीही कोणी जीवाचा आकांत करताना दिसत नाही. मग खिंड कशी लढणार..? गडावर महाराज सुखरुप पोहोचले की तोफांचे आवाज करा, तोपर्यंत मी खिंड लढवतो अशी जीद्द बाजीप्रभूमध्ये होती. असेही सांगितले जाते की बाजीप्रभूचे शीर कलम केले तर त्यांचे तलवारी घेतलेले दोन्ही हात विद्यूत वेगाने चालतच होते. त्यातला अतीशयोक्तीचा भाग वगळला तरीही इथे जागेपणी विरोधकांवर हमला करण्यासाठीचा आक्रमकपणा हरवलेला दिसत आहे. त्यामुळे केवळ बातम्यांसाठी स्वत:ला बाजीप्रभू म्हणून घेण्याचे विधानसभेचे युध्द जिंकता येईल अशी स्थिती नाही.

टॅग्स :Balasaheb Thoratआ. बाळासाहेब थोरातMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसBJPभाजपाAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019