शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हाेणार की पुढे ढकलणार? आज फैसला, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष
2
आजचे राशीभविष्य, २५ नोव्हेंबर २०२५: प्रियजनांचा सहवास लाभेल, प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल!
3
अयोध्या नगरीत श्रीराम मंदिरावर आज दिमाखात फडकणार भगवा ध्वज, वास्तूचे काम पूर्ण झाल्याचे प्रतीक; ध्वजावर तेजस्वी सूर्य, ॐ ही प्रतीकेही, अयोध्येत कडक सुरक्षा
4
‘अनामिक’ रोख देणग्यांबद्दल कोर्टाची भाजप, काँग्रेस आणि सरकारला नोटीस!
5
सिम इतरांना द्याल तर तुरुंगात जाल, दूरसंचार विभागाचा इशारा
6
पती, सासरच्या जाचापायी राज्यात २,३७३ महिलांनी संपविले जीवन, २०२३ मध्ये देशभरात २४ हजार जणींनी उचललं टोकाचं पाऊल
7
कुणावरही टीकाटिप्पणी नाही, केवळ विकासाचे मुद्दे, मुख्यमंत्री प्रचारात फडणवीसांचा व्हिजनवर भर, विरोधकांवरही टीका नाही
8
चायनीज तैपईला नमवून भारताच्या महिला कबड्डीपटूंनी पटकावला विश्वचषक
9
१५ वर्षांत कोणती वस्तू किती महागली? खिसा कसा रिकामा?
10
भारतीय वंशाचे उद्योगपती मित्तल सोडणार ब्रिटन, समोर येतंय असं कारण
11
कर्ज हवे? चिंता करू नका; तुमचे भविष्य सुरक्षित, तर बॅंका निश्चिंत
12
कंपन्यांच्या पगार खर्चात १०% वाढ होणार, नव्या कायद्यामुळे भार; अनेक जबाबदाऱ्याही पडणार
13
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? शांतता योजनेचा मसुदा तयार; पण युक्रेनसमोर मोठे दुहेरी संकट!
14
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
15
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
16
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
17
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
18
चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
19
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
20
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : काँग्रेसचे बाजीप्रभू...

By अतुल कुलकर्णी | Updated: October 10, 2019 04:30 IST

Maharashtra Vidhan Sabha Election: दिल्लीच्या पक्षाच्या बैठकीत ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना हवे ते मतदारसंघ वाटून घ्यावेत अशी सूचना आली त्यावेळी कोणीही पुढे आले नाही.

- अतुल कुलकर्णी

मी बाजीप्रभूसारखा लढत आहे, असे सांगून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्वत:ची अवस्था अधोरेखित केली आहे. मात्र स्वत:ला बाजीप्रभू म्हणून घेण्याने त्यांनी अनेकांची अडचण केली आहे. आपल्यासोबत अनेक जण काम करत आहेत, पण मी मात्र अठरा अठरा तास काम करतोय असेही म्हणाले; पण ज्या गतीने आणि ज्या शिस्तीत भाजपचे काम चालू आहे ते पाहिले तर काँग्रेसमध्ये नेमके काय चालू आहे असा प्रश्न पडतो. दिल्लीच्या पक्षाच्या बैठकीत ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना हवे ते मतदारसंघ वाटून घ्यावेत अशी सूचना आली त्यावेळी कोणीही पुढे आले नाही. अशोक चव्हाण यांना राजीव सातव नको आहेत, बाळासाहेब थोरात यांनी आपल्यासाठी शब्द टाकला नाही असे सांगत हर्षवर्धन पाटील काँग्रेस सोडून गेले. काँग्रेसमध्ये सभा गाजवणारा, शहरी, ग्रामीण दोन्हीकडे चालू शकणारा चेहरा थांबवून ठेवण्यात यश येत नसेल तर बाजीप्रभूंची झुंज नेमकी कोणासाठी चालू आहे? असा प्रश्न येतो. पृथ्वीराज चव्हाण मुंबईतल्या माध्यमांचे आवडते. त्यांच्या बोलण्याला प्रसिद्धी मिळते हे लक्षात घेऊनही ते मुंबईबाहेर कसे राहतील याकडे अन्य नेत्यांचे लक्ष लागलेले. शिवाय, त्यांनी सातारा लोकसभा लढवावी असे पिल्लू सोडले गेले, कारण काय तर चव्हाण दिल्लीत गेले तर राज्यातील विरोधी पक्ष नेतेपदाची स्पर्धा कमी होईल...! या नीतीने आणि वृत्तीने जर काँग्रेसचे नेते वावरत असतील तर पक्ष कसा उभा राहणार? मुंबईत पक्षाच्या मुख्य कार्यालयात वॉर रुम सुरु आहे पण तेथे काम करण्यासाठी जी यंत्रणा लोकसभेच्यावेळी होती, ती आज दिसत नाही. काँग्रेसमधला एकही नेता राज्यभर फिरताना, सरकारच्या अपयशाच्या कहाण्या सांगताना, आक्रमकपणे सरकारवर हल्ला चढवताना, मंत्र्यांवर गंभीर आरोप करताना दिसत नाही. सगळे काही स्वत:ला सांभाळून. उगाच आपले काही निघाले तर काय करायचे? ही भीती या नेत्यांच्या वागण्या, बोलण्यातून स्पष्ट दिसते आहे. त्याउलट राष्टÑवादीत ८० वर्षाचा तरुण नेता राज्य ढवळून काढत आहे. माध्यमांकडे जाणे, स्वत:हून मुलाखती देणे, परसेप्शन बदलण्यासाठी काम करणे या गोष्टींचे कदाचित काँग्रेसच्या नेत्यांना वावडे झाले असावे असे चित्र आहे. जो तो आपापल्या मतदारसंघाच्या बाहेर पडायला तयार नाही, किंवा आक्रमक प्रचार करण्याच्या मनस्थितीत नाही. प्रचाराचा फुगा तोंडानेच फुगवणे सुरु असताना सुशीलकुमार शिंदे यांनी त्यालाच टाचणी लावणारे विधान केले. अजीर्ण होईल एवढ्यावेळा भाजपकडून कलम ३७० पुढे केले जात असताना ही निवडणूक राज्यातल्या प्रश्नावर, विकासावर नेण्याचे काम करण्याची मोठी जबाबदारी विरोधकांची असताना त्यासाठीही कोणी जीवाचा आकांत करताना दिसत नाही. मग खिंड कशी लढणार..? गडावर महाराज सुखरुप पोहोचले की तोफांचे आवाज करा, तोपर्यंत मी खिंड लढवतो अशी जीद्द बाजीप्रभूमध्ये होती. असेही सांगितले जाते की बाजीप्रभूचे शीर कलम केले तर त्यांचे तलवारी घेतलेले दोन्ही हात विद्यूत वेगाने चालतच होते. त्यातला अतीशयोक्तीचा भाग वगळला तरीही इथे जागेपणी विरोधकांवर हमला करण्यासाठीचा आक्रमकपणा हरवलेला दिसत आहे. त्यामुळे केवळ बातम्यांसाठी स्वत:ला बाजीप्रभू म्हणून घेण्याचे विधानसभेचे युध्द जिंकता येईल अशी स्थिती नाही.

टॅग्स :Balasaheb Thoratआ. बाळासाहेब थोरातMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसBJPभाजपाAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019