शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
3
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
4
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
5
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
6
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
7
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
8
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
9
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
10
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
11
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
12
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
13
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
14
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
15
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
16
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
17
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
18
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री
19
५० टक्के ट्रम्प टॅरिफचा वार, भारत कसा करणार बचाव? ७ पर्याय अजून खुले; अमेरिका गुडघे टेकेल!
20
संधी साधायची तर...! या ईलेक्ट्रीक कारवर मिळतोय १० लाखांपर्यंतचा डिस्काऊंट...

Maharashtra Election 2019 : काँग्रेसचे बाजीप्रभू...

By अतुल कुलकर्णी | Updated: October 10, 2019 04:30 IST

Maharashtra Vidhan Sabha Election: दिल्लीच्या पक्षाच्या बैठकीत ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना हवे ते मतदारसंघ वाटून घ्यावेत अशी सूचना आली त्यावेळी कोणीही पुढे आले नाही.

- अतुल कुलकर्णी

मी बाजीप्रभूसारखा लढत आहे, असे सांगून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्वत:ची अवस्था अधोरेखित केली आहे. मात्र स्वत:ला बाजीप्रभू म्हणून घेण्याने त्यांनी अनेकांची अडचण केली आहे. आपल्यासोबत अनेक जण काम करत आहेत, पण मी मात्र अठरा अठरा तास काम करतोय असेही म्हणाले; पण ज्या गतीने आणि ज्या शिस्तीत भाजपचे काम चालू आहे ते पाहिले तर काँग्रेसमध्ये नेमके काय चालू आहे असा प्रश्न पडतो. दिल्लीच्या पक्षाच्या बैठकीत ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना हवे ते मतदारसंघ वाटून घ्यावेत अशी सूचना आली त्यावेळी कोणीही पुढे आले नाही. अशोक चव्हाण यांना राजीव सातव नको आहेत, बाळासाहेब थोरात यांनी आपल्यासाठी शब्द टाकला नाही असे सांगत हर्षवर्धन पाटील काँग्रेस सोडून गेले. काँग्रेसमध्ये सभा गाजवणारा, शहरी, ग्रामीण दोन्हीकडे चालू शकणारा चेहरा थांबवून ठेवण्यात यश येत नसेल तर बाजीप्रभूंची झुंज नेमकी कोणासाठी चालू आहे? असा प्रश्न येतो. पृथ्वीराज चव्हाण मुंबईतल्या माध्यमांचे आवडते. त्यांच्या बोलण्याला प्रसिद्धी मिळते हे लक्षात घेऊनही ते मुंबईबाहेर कसे राहतील याकडे अन्य नेत्यांचे लक्ष लागलेले. शिवाय, त्यांनी सातारा लोकसभा लढवावी असे पिल्लू सोडले गेले, कारण काय तर चव्हाण दिल्लीत गेले तर राज्यातील विरोधी पक्ष नेतेपदाची स्पर्धा कमी होईल...! या नीतीने आणि वृत्तीने जर काँग्रेसचे नेते वावरत असतील तर पक्ष कसा उभा राहणार? मुंबईत पक्षाच्या मुख्य कार्यालयात वॉर रुम सुरु आहे पण तेथे काम करण्यासाठी जी यंत्रणा लोकसभेच्यावेळी होती, ती आज दिसत नाही. काँग्रेसमधला एकही नेता राज्यभर फिरताना, सरकारच्या अपयशाच्या कहाण्या सांगताना, आक्रमकपणे सरकारवर हल्ला चढवताना, मंत्र्यांवर गंभीर आरोप करताना दिसत नाही. सगळे काही स्वत:ला सांभाळून. उगाच आपले काही निघाले तर काय करायचे? ही भीती या नेत्यांच्या वागण्या, बोलण्यातून स्पष्ट दिसते आहे. त्याउलट राष्टÑवादीत ८० वर्षाचा तरुण नेता राज्य ढवळून काढत आहे. माध्यमांकडे जाणे, स्वत:हून मुलाखती देणे, परसेप्शन बदलण्यासाठी काम करणे या गोष्टींचे कदाचित काँग्रेसच्या नेत्यांना वावडे झाले असावे असे चित्र आहे. जो तो आपापल्या मतदारसंघाच्या बाहेर पडायला तयार नाही, किंवा आक्रमक प्रचार करण्याच्या मनस्थितीत नाही. प्रचाराचा फुगा तोंडानेच फुगवणे सुरु असताना सुशीलकुमार शिंदे यांनी त्यालाच टाचणी लावणारे विधान केले. अजीर्ण होईल एवढ्यावेळा भाजपकडून कलम ३७० पुढे केले जात असताना ही निवडणूक राज्यातल्या प्रश्नावर, विकासावर नेण्याचे काम करण्याची मोठी जबाबदारी विरोधकांची असताना त्यासाठीही कोणी जीवाचा आकांत करताना दिसत नाही. मग खिंड कशी लढणार..? गडावर महाराज सुखरुप पोहोचले की तोफांचे आवाज करा, तोपर्यंत मी खिंड लढवतो अशी जीद्द बाजीप्रभूमध्ये होती. असेही सांगितले जाते की बाजीप्रभूचे शीर कलम केले तर त्यांचे तलवारी घेतलेले दोन्ही हात विद्यूत वेगाने चालतच होते. त्यातला अतीशयोक्तीचा भाग वगळला तरीही इथे जागेपणी विरोधकांवर हमला करण्यासाठीचा आक्रमकपणा हरवलेला दिसत आहे. त्यामुळे केवळ बातम्यांसाठी स्वत:ला बाजीप्रभू म्हणून घेण्याचे विधानसभेचे युध्द जिंकता येईल अशी स्थिती नाही.

टॅग्स :Balasaheb Thoratआ. बाळासाहेब थोरातMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसBJPभाजपाAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019