शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

Maharashtra Election 2019: अमित शहांचा शिवसेनेला 'इशारा'; निवडणूक पाच दिवसांवर असताना वाढवलं टेन्शन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 15:59 IST

Maharashtra Vidhan Sabha Election : महायुती दोन तृतीयांश जागा जिंकणार; अमित शहांना विश्वास

नवी दिल्ली: महाराष्ट्रात सत्ता राखल्यानंतर मुख्यमंत्रीपद भाजपाकडेच असेल, असं भाजपाचे अध्यक्ष अमित शहांनी म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीत महायुती दोन तृतीयांश जागा जिंकेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपा स्वबळावर सत्ता स्थापन करू शकते, असंदेखील शहांनी म्हटलं. त्यामुळे निवडणूक पाच दिवसांवर असताना शिवसेनेचं टेन्शन वाढलं आहे.भाजपाला विधानसभा निवडणुकीत नेमक्या किती जागा मिळतील, याची निश्चित आकडेवारी सध्याच्या घडीला सांगता येणार नाही. मात्र गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपाला जास्त जागा मिळतील, असं शहा यांनी 'न्यूज18 नेटवर्कला' दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. 164 जागा लढवणारी भाजपा बहुमताचा आकडा गाठू शकेल का, या प्रश्नाला ते अशक्य नाही, असं उत्तर शहांनी दिलं. 'भाजपाचा महाराष्ट्रातील प्रवास अतिशय रंजक आहे. आम्ही 2014 मध्ये स्वतंत्र लढलो आणि राज्यातील क्रमांक एकचा पक्ष ठरलो. त्यानंतर आम्ही शिवसेनेसोबत सरकार स्थापन केलं. कधीकाळी शेती, गुंतवणूक, सहकार, उद्योग क्षेत्रांमध्ये पहिल्या क्रमांकावर असणारा महाराष्ट्र यूपीए सरकारच्या 15 वर्षांच्या काळात पिछाडीवर गेला होता. मात्र अवघ्या 5 वर्षांमध्ये आम्ही जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये राज्याला पहिल्या पाचात आणलं,' असं शहा यांनी म्हटलं. 2014 मध्ये भाजपा आणि शिवसेनेनं स्वतंत्र निवडणूक लढवली. त्यावेळी भाजपानं 122 जागा जिंकल्या. सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपाला 22 जागा कमी पडल्या. यानंतर भाजपा, शिवसेनेनं पुन्हा युती केली. बाळासाहेब ठाकरेंच्या काळात दोन्ही पक्षांची युती झाली, तेव्हा शिवसेना युतीमधील मोठा भाऊ होता. त्यामुळे शिवसेनेनं विधानसभा निवडणुकीत कायम भाजपापेक्षा जास्त जागा लढवल्या. मात्र तीस वर्षांमध्ये यंदा प्रथमच शिवसेना भाजपापेक्षा कमी जागा लढवत आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Amit Shahअमित शहाBJPभाजपाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे