शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

CoronaVirus Updates: राज्यात कोरोनाचा कहर; 24 तासांत आढळले 58,924 नवे रुग्ण, 351 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 22:48 IST

आतापर्यंत एकूण 31,59,240 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी गेले आहेत. सध्या राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 6,76,520 वर पोहोचली आहे. तर राज्यात 37,43,968 लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत आणि 27,081 जण इंस्टिट्यूशनल क्वारंटइनमध्ये आहेत. (Maharashtra CoronaVirus updates)

 

मुंबई - राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. गेल्या 24 तासांत राज्यात कोरोनाचे 58,924 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. तर 351 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोना मृत्यू दर 1.56 टक्के एवढा झाला आहे. याशिवाय आज नवीन 52,412 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.04 टक्के एवढे आहे. (Maharashtra CoronaVirus updates Today newly 58,924 patients have been tested as positive, 351 dead)

आतापर्यंत एकूण 31,59,240 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी गेले आहेत. सध्या राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 6,76,520 वर पोहोचली आहे. तर राज्यात 37,43,968 लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत आणि 27,081 जण इंस्टिट्यूशनल क्वारंटइनमध्ये आहेत. 

CoronaVirus : Google Maps वर असं सर्च करा कोरोना टेस्ट सेंटर आणि व्हॅक्सीन सेंटर

राज्यात 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांच लसीकरण - देशात 1 मे पासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात होणार आहे. या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्वांनाच कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सध्या देशात लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे. यामध्ये 45 वर्षांवरील व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येत आहे. देशात लसींचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहितही केले जाणार आहे. तसेच लस उत्पादन करणाऱ्या कंपन्या आपल्या एकूण क्षमतेच्या 50 टक्क्यांपर्यंत पहिल्यांदा घोषित केलेल्या किंमतींवर राज्य सरकारांना आणि खुल्या बाजारातही विक्री करु शकणार आहेत. तर 50 टक्के लसी कंपन्यांना केंद्र सरकारला पुरवाव्या लागतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

CoronaVirus: मोदी सरकारचा मोठा निर्णय; इंग्लंड, अमेरिका, जपानच्या लशींना मंजुरीची आवश्यकता नाही, अमित शाह म्हणाले...

मुंबईत 24 तासांत 57 जणांचा मृत्यू - कोरोना व्हारसर पसरण्याचा वेग दिवसागणिक वाढतच चालला आहे. महाराष्ट्रात तर कोरोना रोजच्या रोजच नवा विक्रम करत आहे. अशीच स्थिती मुंबईचीही आहे. येथेही रोजच्या रोज सक्रीय रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. आज मुंबईत 7381 नवे रुग्ण नोंदवले गेले. तर गेल्या 24 तासांत कोरोनामुळे तब्बल 57 जणांचा मृत्यू झाला. 

'या' 6 राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी नियम कडक -केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली-एनसीआर आणि उत्तराखंड राज्य कोरोनाचा विचार करता संवेदनशील आहेत, असे महाराष्ट्र सरकारने म्हटले आहे. ट्रेनने येणाऱ्या प्रवाशांना 48 तासांच्या आत करण्यात आलेल्या आरटीपीआर तपासणीचा रिपोर्ट बंधनकारक आहे. या संवेदनशील भागांतून येणाऱ्या रेल्वे गाड्यांत महाराष्ट्रासाठी अनारक्षित तिकिटांचे बुकिंग करण्यात येणार नाही. प्रवाशाजवळ आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट नसल्यास त्याची रॅपिड अँटीजन टेस्ट केले जाईल.

देश सोडून चिनी कोरोना लस घेण्यासाठी नेपाळमध्ये का जातायत लोक? उत्तर वाचून व्हाल अवाक!

...तर हातावर मारण्यात येणार 15 दिवसांचा क्वारंटाइन स्टम्प -तपासात पॉझिटिव्ह अथवा कोरोनाची लक्षणे असणाऱ्या लोकांना क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठविण्यात येणार आहे. तसेच ज्यांना लक्षणे नाहीत, अशांच्या हातावर 15 दिवसांच्या क्वारंटाइनचा स्टम्प मारण्यात येईल. याशिवाय, ज्यांनी आपल्यासोबत आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट आणला आहे अथवा स्टेशनवर तपासादरम्यान अँटीजन टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आली आहे, अशांच्याही हातावर 15 दिवसांच्या क्वारंटाइनचा स्टम्प मारण्यात येणार आहे. लक्षण आणि पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांना इंस्टिट्यूशनल क्वारंटानिमध्ये पाठविण्यात येईल. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसMaharashtraमहाराष्ट्र