शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

CoronaVirus: “कोरोनाची दुसरी लाटही आली नसती व लोकांचे जीवही गेले नसते”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 18:07 IST

corona: काँग्रेसकडून सातत्याने केंद्रातील मोदी सरकारवर टीका होताना दिसत आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसची पंतप्रधान मोदींवर टीकाकोरोना परिस्थितीवरून साधला निशाणाट्विटरच्या माध्यमातून केंद्र सरकारवर हल्लाबोल

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण देशभरात कोरोनाचा अक्षरशः कहर सुरू आहे. देशात दुसरी लाट आल्याचे सांगितले जात असून, कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस नवनवे उच्चांक गाठत आहे. देशभरात कोरोना लसींचा तुटवडा, रेमडेसिव्हीर इंजेक्शन, बेड्स, ऑक्सिजन यांची कमतरता अनेक राज्यांमध्ये जाणवू लागली आहे. यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. काँग्रेसकडून सातत्याने केंद्रातील मोदी सरकारवर टीका होताना दिसत आहे. कोरोनाची दुसरी लाटही आली नसती व लोकांचे जीवही गेले नसते, अशी बोचरी टीका केली आहे. (maharashtra congress criticised modi govt over corona situation)

महाराष्ट्र काँग्रेसकडून एक ट्विट करण्यात आले आहे. या ट्विटच्या माध्यमातून काँग्रेसने केंद्र सरकारवर टीका केली आहे. नागरिकांमध्ये जनजागृती, कडक निर्बंध, लॉकडाउनसह वैद्यकीय यंत्रणा अधिक गतीमान व बळकट करण्याचे काम सुरू आहे. मात्र तरी देखील करोनाच प्रादुर्भाव वाढतच आहे. अनेक राज्यांमध्ये बेड्स, व्हेंटिलेटर्ससह मेडिकल ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन व लसींचा तुटवडा जाणवत आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

लोकांचे जीवही गेले नसते

“करोनावरील इतरही लसींना मान्यता द्यावी” हा सल्ला राहुल गांधींनी फार आधीच दिला होता. मात्र लसीअभावी लसीकरण केंद्र बंद करायची वेळ आल्यावर मोदी सरकारने इतर लसींना मान्यता दिली. जर हा निर्णय आधीच घेतला असता तर कोरोनाची दुसरी लाटही आली नसती व लोकांचे जीवही गेले नसते!, असा हल्लाबोल काँग्रेसने केला आहे. 

निवडणुकांमध्ये कोरोनाची ‘रॅली’; बंगालमध्ये ४२० टक्के, तर आसामामध्ये ५३२ टक्के रुग्णवाढ

राहुल गांधीची मोदी सरकारवर टीका

केंद्र सरकारच्या अपयशी धोरणांमुळे देशात करोनाची भयानक दुसरी लाट आहे आणि स्थलांतरित मजूर पुन्हा एकदा गावाकडे परतण्यासाठी मजबूर झाले आहेत. सर्वसमान्यांचं जीवन व देशाची अर्थव्यवस्था दोन्हींसाठी लसीकरण वाढवण्यासोबतच त्यांच्या हातात पैसा देणं देखील आवश्यक आहे. मात्र अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अ‍ॅलर्जी आहे, अशी टीका राहुल गांधींनी यापूर्वी केली होती. 

“खरंच… हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे”: जितेंद्र आव्हाड

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १४ एप्रिल रात्री ८ वाजेपासून पुढचे १५ दिवस राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये पूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली असून फक्त जीवनावश्यक वस्तू आणि सेवांशी संबंधित व्यक्तींना प्रवासाची आणि उद्योगांना सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच, विविध समाजघटकांसाठी अर्थसहाय्य करण्याचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcongressकाँग्रेसCorona vaccineकोरोनाची लसprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारPoliticsराजकारणBJPभाजपा