शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

BLOG: शरद पवारांइतकी धमक अजित पवार दाखवतील का अन् कशी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 12:12 IST

जनसंघ, समाजवादी, डावे  वगैरे  सर्वांच्या पाठिंब्यावर पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेल्या शरद पवार यांचं  'पुलोद' सरकार शक्तीशाली पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बरखास्त केलं.

ठळक मुद्देअजित पवार मात्र त्यांचं राजकीय पाऊल नेमकेपणानं काकांच्या पावलावर  टाकत आहेत.'राष्ट्रवादी'चे  किमान 40 आमदार अजित पवारांना सोबत घ्यावे  लागतील.राजकारण क्रुर असतं. तीव्र स्पर्धा, ईर्षा आणि महत्वाकांक्षा यांनी भरलेलं असतं.

>> सुकृत करंदीकर

1978 - जनसंघाच्या पाठिंब्यावर पहिल्यांदा मुख्यमंत्रीपद मिळवले ते शरद  पवार.

2014 -  महाराष्ट्रात भाजपने न मागताही पाठींबा देणारे होते ते शरद पवार.

2019 - 'घरात नाही पीठ आणि तुम्हाला कशाला हवे विद्यापीठ,' 'मंडल कमिशन आणि आरक्षणाला विरोध; समान  नागरी  कायदा हवा,' 'बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्याचा अभिमान आहे.'- या सारख्या प्रतिगामी भूमिका घेणार्या सेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून प्रयत्न करणारे शरद पवार.

2019, नोव्हेंबर - शेतीच्या  प्रश्नावर पंतप्रधान सलग 45 मिनिटं देशात कोण्याच एका व्यक्तीशी चर्चा करत नसतात. पण तशी ते करत बसले ती व्यक्ती होती शरद पवार.

2019, नोव्हेंबर - अजित पवार एकटेच जाऊन भाजपाच्या मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतात; हा अजित  पवारांचा व्यक्तीगत निर्णय आहे, पक्षाचा नव्हे, असे सांगतात तेही  शरद  पवार.

कशावर विश्वास ठेवायचा आणि कशावर नाही, हे सांगणं अवघड आहे. 'प्रतिमा' किती महत्वाची, याचा प्रत्यय प्रकर्षाने शरद पवारांना या क्षणी येत असणार.

अजित पवार मात्र त्यांचं राजकीय पाऊल नेमकेपणानं काकांच्या पावलावर  टाकत आहेत. "चालून येईल त्या संधीचा पुरेपुर वापर करत येनकेनप्रकारे  राजकारणातली आपली उपयुक्तता, मूल्य आणि प्रासंगिकता टिकवून ठेवणे; आजच्या भाषेत relevant  राहणं,'' हेच  तर शरद पवार यांच्या दीर्घ राजकीय कारकिर्दिचं सूत्र राहिलं आहे. हे सूत्र जुळवून आणण्यासाठी मोठ्या हिकमती कराव्या लागतात. ती ताकद अजित  पवारांकडे आहे का, हे लवकरच सिद्ध होईल. 'दादागिरी' काकांच्या पुण्याईवर होती की खरी धमक त्यांच्यात आहे, हे आता दिसेल. 'राष्ट्रवादी'चे  किमान 40 आमदार अजित पवारांना सोबत घ्यावे  लागतील. जनसंघ, समाजवादी, डावे  वगैरे  सर्वांच्या पाठिंब्यावर पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेल्या शरद पवार यांचं  'पुलोद' सरकार शक्तीशाली पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बरखास्त केलं. त्यानंतरही 1980 मध्ये चाळीशीही न ओलांडलेल्या शरद पवारांनी 50-55 आमदार स्वबळावर निवडून आणले. ही धमक होती शरद पवारांची. आता साठीच्या घरातील अजित पवारांना अशीच कामगिरी करुन दाखवावी लागेल. नरेंद्र-देवेंद्राच्या केंद्र आणि राज्यातल्या सत्तेचं बळ त्यांच्या पाठीशी असेल.

राजकारण क्रुर असतं. तीव्र स्पर्धा, ईर्षा आणि महत्वाकांक्षा यांनी भरलेलं असतं. शरद पवार यांनीही सत्तेच्या ताकदीवर महाराष्ट्रातले अनेक पक्ष, गट-तट, घराणी, आघाड्या आजवर फोडल्या. अंकित केल्या. याचं कौतूक 'बेरजेचं राजकारण' असं केलं गेलं. राज ठाकरे यांच्या रुपाने बाळासाहेब ठाकरे यांच्या परिवारातील वाद जगजाहीर झाले. अजितदादांनी शपथ घेतल्याने शरद पवारांचंही घर फुटू शकतं, हे महाराष्ट्रानं पहिल्यांदाच पाहिलं. 'राष्ट्रवादी'त आता उभी फुट अटळ आहे; पण ती किती यावर अजित पवारांची भविष्यातली 'दादागिरी' अवलंबून आहे. पवारांच्या घरातील दुहीमुळे आणि शरद पवारांच्या वार्धक्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण निर्णायक वळणावर येऊन ठेपलं आहे. या वळणाचे शिल्पकार अजित पवार  ठरतील का?

महत्त्वाच्या राजकीय बातम्याः

अजित पवारांनी बंड करताच, रोहित पवारांचा फेसबुक प्रोफाईलचा फोटो बदलला !

30 नोव्हेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करा; राज्यपालांची मुख्यमंत्री फडणवीसांना सूचना

संजय राऊत यांनी शिवसेनेची, महाराष्ट्राची वाट लावली - चंद्रकांत पाटील 

रात्रीस खेळ चाले... महाराष्ट्रात 'असा' झाला राजकीय भूकंप!

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस