शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
2
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
3
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
4
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
5
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी निस्तब्ध पडून राहिली नवी नवरी
6
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
7
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
8
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
9
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
10
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
11
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
12
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
13
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
14
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
15
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
16
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
17
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
18
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
19
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
20
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."

कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? ११ व्या क्रमांकावर; जयंत पाटलांनी सांगितली कशी झाली वाताहात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 14:28 IST

महाविकास आघाडीचे उमेदवार राजेंद्र शिंगणे यांच्या प्रचारार्थ जयंत पाटील यांनी आज सभा घेतली. यावेळी पाटील यांनी महाराष्ट्र कसा मागे राहिला आणि गुजरात कसा पुढे गेला ते सांगितले.

पहाटेच्या शपथविधीनंतर सगळ्यात पहिले शरद पवार यांच्याकडे दोन तासात कोण आले असेल तर ते डॉ. राजेंद्र शिंगणे होते. पुन्हा एकदा शपथविधी झाला तो दुपारचा झाला आणि ते तिकडे असले तर प्रश्न सुटावेत, बँकेला भाग भांडवल मिळावे या उद्देशाने त्यांनी प्रयत्न केले. सगळ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा आजच्या सरकारने प्रयत्न केला. पक्ष फुटायला नको होता याची वेळोवेळी डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी खंत व्यक्त केली, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. 

महाविकास आघाडीचे उमेदवार राजेंद्र शिंगणे यांच्या प्रचारार्थ जयंत पाटील यांनी आज सभा घेतली. यावेळी पाटील यांनी महाराष्ट्र कसा मागे राहिला आणि गुजरात कसा पुढे गेला ते सांगितले. ''या सरकारने काय काय उद्योग केलेत ते सांगतो. मी जेव्हा अर्थमंत्री होतो तेव्हा महाराष्ट्राचा दरडोई उत्पन्नात देशात दुसरा-तिसरा क्रमांक असायचा. गुजरात फार मागे होते जवळपास देखील नव्हता. 2014 मध्ये मोदी दिल्लीत आणि फडणवीस राज्यात बसले आणि 2016 मध्ये मागे असणारे गुजरात पुढे गेले. आपण सहाव्या क्रमांकावर गेलो. आज आकडेवारी काढली तर देशात आपल्या राज्याचा अकरावा क्रमांक आहे, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? असा सवाल जयंत पाटील यांनी केला. 

गुजरातचे लोक आपल्यापेक्षा श्रीमंत झाले आहेत. जे राज्य गरीब होते ते मागील दहा वर्षात आपल्यापेक्षा पुढे गेले आहे. नाकर्तेपणाची भूमिका, गुजरातला घाबरण्याची भूमिका, मोदी शहांच्या समोर मान झुकवण्याची भूमिका कोणतीही गोष्ट गुजरात ने हिरावून घेतल्यावर कारे म्हणण्याची ताकत नसणारी लोक या महाराष्ट्रात नेतृत्व करत आहेत, असा आरोप पाटील यांनी केला. महाराष्ट्रातून प्रकल्प बाहेर जाताना थांबवले नाहीत. परिणामी बेरोजगारांची संख्या आपल्या राज्यात वाढत चालली आहे. एकनाथ शिंदे यांना बोलताना मर्यादा आहेत, ते मोदी-शाह यांना दुखावू शकत नाहीत, अशी टीका पाटील यांनी केली. 

आपल्या सगळ्यांना लुबाडायचं काम हे सरकार करत आहे. शेतकऱ्यांना बुडवण्याचे काम मागील अडीज वर्षात या सरकारने केले आहे. शरद पवार दिवसाला सहा-सात सभा घेत आहेत, या वयात एवढे कष्ट महाराष्ट्रात नव्हे देशात कुठल्या नेत्याने केले नसतील, असे पाटील म्हणाले.  

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस