शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 08:28 IST

Maharashtra Assembly Election 2024: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा दिल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील अल्पसंख्याक समुदाय आपली मते कुणाच्या पारड्यात टाकतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा दिल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील अल्पसंख्याक समुदाय आपली मते कुणाच्या पारड्यात टाकतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात जवळपास ३५ विधानसभा मतदारसंघ असे आहेत जेथे अल्पसंख्याक मतदार हा निर्णायक भूमिका बजावतो. 

महाराष्ट्रातील अल्पसंख्याक समाज हा विकासाला प्राधान्य देणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने विविध योजना राबवून अल्पसंख्याक समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रात अल्पसंख्याक मंत्रालय होते. परंतु, सचिवालय नव्हते. यामुळे मंत्रालयाचा काहीही उपयोग झाला नाही. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अल्पसंख्याक मंत्रालयाला केवळ सचिवालय मिळाले नाही तर जिल्हा पातळीवर कार्यालय सुरू झाले. यामुळे महाराष्ट्रातील अल्पसंख्याक समाज महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

३५ जागा ठरणार निर्णायक- महाराष्ट्राची लोकसंख्या जवळपास ११.२४ कोटी असून, त्यापैकी १.३ कोटी अल्पसंख्याक आहेत. राज्यातील २८८ विधानसभा जागांपैकी ३५ अशा आहेत जिथे अल्पसंख्याक लोकसंख्या २० टक्क्याच्या आसपास आहे. आठ ते नऊ विधानसभांमध्ये याहीपेक्षा जास्त आहे.- मात्र, निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या मुस्लीम उमेदवारांची संख्या अवघी १३ आहे. काँग्रेसने आठ मुस्लिमांना उमेदवारी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने एक आणि राष्ट्रवादी काँग्रेसने चार जणांना उमेदवारी दिली आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Votingमतदान