शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

संजय राऊतांनी जागावाटपावर बोलणं बंद करावं, त्यापेक्षा...; नाना पटोलेंनी थेट सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 13:24 IST

जागावाटपावरून महाविकास आघाडीत अद्याप काही जागांचा घोळ, उद्यापर्यंत सर्व गोष्टी स्पष्ट होतील असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

नागपूर - नागपूर विभागात ठाकरे गटाला १ जागा मिळाली त्यावरून नाराजी असेल तर तो त्यांचा व्यक्तिगत मत आहे. आम्हाला कोकणात काहीच मिळालं नाही असं आम्ही म्हणायचं का? संजय राऊतांनी हा विषय बंद केला पाहिजे, आपल्याला विरोधकांच्या विरोधात लढायचं आहे ही भूमिका आपण घेतली पाहिजे. संजय राऊतांनी आता आपली तोफ विरोधकांकडे डागली पाहिजे हा माझा प्रेमाचा सल्ला आहे असं विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊतांबाबत केले आहे. 

पत्रकार परिषदेत नाना पटोले म्हणाले की, सोलापूर दक्षिणबाबत आमच्या हायकमांडने घेतलेला निर्णय आहे. त्याबाबतीत चर्चा होईल. राज्य म्हणून त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. तिकिट वाटपानंतर काही नाराज होतील. हा प्रक्रियेचा भाग आहे. महाराष्ट्र मोठा आहे. ३ पक्षांची आघाडी आहे. मित्रपक्ष आहेत. त्यामुळे काही जिल्ह्यात एखाद्या पक्षाला जागा मिळणार नाहीत. जवळपास १०-१२ जिल्ह्यात आम्ही उमेदवार दिले नाहीत. संघटना हा महत्त्वाचा भाग आहे. परंतु महाराष्ट्र वाचवणे हे दायित्व जास्त आहे. महाराष्ट्र महायुतीच्या हातात गेला तर पूर्ण महाराष्ट्र विकून गुजरातचं नियंत्रण महाराष्ट्रावर आले असं होईल असं त्यांनी सांगितले.

तसेच राष्ट्रीय पक्ष असतील मग भाजपा असो वा काँग्रेस..त्यांना मित्रपक्षांना सांभाळणे ही राष्ट्रीय पक्षाची जबाबदारी असते. कार्यकर्त्यांच्या वेदना माहिती आहेत. आघाडी महत्त्वाची असते. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना ताकद मिळायला हवी. या युती सरकारने या विचारांना गाडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अपमानित करणे. या लोकांची मानसिकता पाहा. महिलांचा अपमान करणे ही भाजपाची मानसिकता आहे. ते अहिल्यानगरमध्ये दिसले. महाराष्ट्र वाचवणे, शेतकरी, तरुण आणि गरीबाला न्याय देणे, राज्यात कर वाढवले आहेत ते कमी करणे हा आमचा उद्देश आहे. त्यामुळे ही लढाई काँग्रेस लढतेय. ही वेळ महाराष्ट्राला वाचवण्याची आहे. एकत्रित येऊन मविआला निवडून द्यावं असं आवाहन नाना पटोलेंनी कार्यकर्त्यांना केले.

दरम्यान, सांगलीसारखा पॅटर्न कुठे होऊ नये असा आमचा प्रयत्न आहे. काही जागांचा वाद आहे तो उद्यापर्यंत संपेल. सगळ्या समाजाला संधी मिळावी यासाठी काँग्रेसचा प्रयत्न झालेला आहे. पक्ष संघटना असो वा सत्तेत सर्व समाजाला न्याय कसा देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. महाराष्ट्राची संस्कृती भाजपाने खराब करण्याचं पाप केले आहे. मराठा विरुद्ध ओबीसी, धनगर विरुद्ध आदिवासी ही फूट निर्माण करून सामाजिक तेढ निर्माण केला आहे. जातीय जनगणना करून या सर्व प्रवाहांना मुख्य प्रवाहात कसं आणता येईल ही भूमिका आमची आहे असं नाना पटोलेंनी सांगितले आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीNana Patoleनाना पटोलेSanjay Rautसंजय राऊतcongressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे