शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

संजय राऊतांनी जागावाटपावर बोलणं बंद करावं, त्यापेक्षा...; नाना पटोलेंनी थेट सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 13:24 IST

जागावाटपावरून महाविकास आघाडीत अद्याप काही जागांचा घोळ, उद्यापर्यंत सर्व गोष्टी स्पष्ट होतील असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

नागपूर - नागपूर विभागात ठाकरे गटाला १ जागा मिळाली त्यावरून नाराजी असेल तर तो त्यांचा व्यक्तिगत मत आहे. आम्हाला कोकणात काहीच मिळालं नाही असं आम्ही म्हणायचं का? संजय राऊतांनी हा विषय बंद केला पाहिजे, आपल्याला विरोधकांच्या विरोधात लढायचं आहे ही भूमिका आपण घेतली पाहिजे. संजय राऊतांनी आता आपली तोफ विरोधकांकडे डागली पाहिजे हा माझा प्रेमाचा सल्ला आहे असं विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊतांबाबत केले आहे. 

पत्रकार परिषदेत नाना पटोले म्हणाले की, सोलापूर दक्षिणबाबत आमच्या हायकमांडने घेतलेला निर्णय आहे. त्याबाबतीत चर्चा होईल. राज्य म्हणून त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. तिकिट वाटपानंतर काही नाराज होतील. हा प्रक्रियेचा भाग आहे. महाराष्ट्र मोठा आहे. ३ पक्षांची आघाडी आहे. मित्रपक्ष आहेत. त्यामुळे काही जिल्ह्यात एखाद्या पक्षाला जागा मिळणार नाहीत. जवळपास १०-१२ जिल्ह्यात आम्ही उमेदवार दिले नाहीत. संघटना हा महत्त्वाचा भाग आहे. परंतु महाराष्ट्र वाचवणे हे दायित्व जास्त आहे. महाराष्ट्र महायुतीच्या हातात गेला तर पूर्ण महाराष्ट्र विकून गुजरातचं नियंत्रण महाराष्ट्रावर आले असं होईल असं त्यांनी सांगितले.

तसेच राष्ट्रीय पक्ष असतील मग भाजपा असो वा काँग्रेस..त्यांना मित्रपक्षांना सांभाळणे ही राष्ट्रीय पक्षाची जबाबदारी असते. कार्यकर्त्यांच्या वेदना माहिती आहेत. आघाडी महत्त्वाची असते. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना ताकद मिळायला हवी. या युती सरकारने या विचारांना गाडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अपमानित करणे. या लोकांची मानसिकता पाहा. महिलांचा अपमान करणे ही भाजपाची मानसिकता आहे. ते अहिल्यानगरमध्ये दिसले. महाराष्ट्र वाचवणे, शेतकरी, तरुण आणि गरीबाला न्याय देणे, राज्यात कर वाढवले आहेत ते कमी करणे हा आमचा उद्देश आहे. त्यामुळे ही लढाई काँग्रेस लढतेय. ही वेळ महाराष्ट्राला वाचवण्याची आहे. एकत्रित येऊन मविआला निवडून द्यावं असं आवाहन नाना पटोलेंनी कार्यकर्त्यांना केले.

दरम्यान, सांगलीसारखा पॅटर्न कुठे होऊ नये असा आमचा प्रयत्न आहे. काही जागांचा वाद आहे तो उद्यापर्यंत संपेल. सगळ्या समाजाला संधी मिळावी यासाठी काँग्रेसचा प्रयत्न झालेला आहे. पक्ष संघटना असो वा सत्तेत सर्व समाजाला न्याय कसा देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. महाराष्ट्राची संस्कृती भाजपाने खराब करण्याचं पाप केले आहे. मराठा विरुद्ध ओबीसी, धनगर विरुद्ध आदिवासी ही फूट निर्माण करून सामाजिक तेढ निर्माण केला आहे. जातीय जनगणना करून या सर्व प्रवाहांना मुख्य प्रवाहात कसं आणता येईल ही भूमिका आमची आहे असं नाना पटोलेंनी सांगितले आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीNana Patoleनाना पटोलेSanjay Rautसंजय राऊतcongressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे