शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

निकालानंतरच्या रणनीतीसाठी मविआ नेत्यांची आज बैठक; अपक्षांसोबत संपर्क साधणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 13:44 IST

जर महाविकास आघाडीच्या बाजूने कल आला किंवा अपक्षांची गरज भासली तर कोण मविआच्या बाजूने उभे राहू शकेल याचा आढावा घेतला जाणार आहे

मुंबई - विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडलं असून यंदा मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यात कुणाचं सरकार येणार यावरून विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. बहुतांश एक्झिट पोलमध्ये महायुती पुन्हा सत्तेत येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. २३ नोव्हेंबरला निकाल लागणार असून त्यानंतरची रणनीती ठरवण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बैठक होणार आहे. या बैठकीत निकालावर चर्चा, त्याशिवाय काही अपक्ष आणि बंडखोरांनाही संपर्क साधण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

दुपारी ३ वाजता ही बैठक होणार असून यात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते हजर असणार आहेत. निकालानंतर कुठलाही धोका होऊ नये यादृष्टीने बैठकीत चर्चा होणार आहे. सर्व पर्यायांची चाचपणी करण्याकडे महाविकास आघाडीचा कल आहे. त्यात प्रामुख्याने इतर पक्ष, अपक्ष आणि बंडखोर यांच्याशी संपर्क साधण्याची चर्चा सुरू झाली आहे. विजयाची शक्यता असणाऱ्या काही अपक्ष उमेदवारांना मविआ नेत्यांकडून फोन करण्यात आल्याची माहिती आहे. सत्ता स्थापनेसाठी काय गरज पडू शकते, काय काळजी घ्यावी लागेल याची चर्चा बैठकीत होणार आहे. जर महाविकास आघाडीच्या बाजूने कल आला किंवा अपक्षांची गरज भासली तर कोण मविआच्या बाजूने उभे राहू शकेल याचा आढावा घेतला जाणार आहे.

महायुतीतही राजकीय हालचाली

राज्यात मतदान संपल्यानंतर बुधवारी रात्री भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांची भेट घेतली. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत व माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्याशी फडणवीस यांनी सुमारे २० मिनिटे चर्चा केली. सद्य:स्थितीतील राजकीय चित्र, २३ नोव्हेंबरनंतरची राजकीय समीकरणे आदींवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. सुमारे २५ मिनिटांनंतर फडणवीस तेथून रवाना झाले. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याची कुठलीही अधिकृत माहिती संघाकडून देण्यात आलेली नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने विविध कयास लावण्यात येत आहेत.

दरम्यान, राज्यात महायुतीचं पुन्हा सरकार येईल असा विश्वास महायुतीचे नेते वर्तवत आहे. त्यात मुख्यमंत्रि‍पदी कोण यावरून अनेक दावे करण्यात येत आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे असं विधान केले तर एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील असा विश्वास शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केले आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीBJPभाजपाcongressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवार