शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
2
Maharashtra Municipal Election: मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
3
सोने-चांदी पुन्हा महागले! खरेदी करण्यापूर्वी २२ कॅरेट आणि २४ कॅरेटचे दर पाहा; आणखी भाव वाढणार?
4
'पप्पा बाहेरून घरात आले आणि आम्हा सगळ्यांना...'; कुटुंब उद्ध्वस्त, वाचलेल्या दोन चिमुकल्यांनी काय सांगितलं?
5
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
6
२० वर्षे लहान असलेल्या सारासोबत रणवीरचा रोमान्स का? 'धुरंधर पार्ट २'मध्ये उलगडणार सर्वात मोठं गूढ
7
लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल
8
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
9
"ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही", रामदास आठवलेंचा अजित पवारांना 'त्या' विधानावरून इशारा
10
Ram Vilas Vedanti: श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख रामविलास वेदांती यांचे निधन; मुख्यमंत्री योगींनी व्यक्त केले दुःख
11
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
12
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
13
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
14
Mumbai-Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
15
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
16
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
17
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
18
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
19
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
20
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत काँग्रेसचे ११ पैकी फक्त २ उमेदवार मराठी; भाजपाचा घणाघात, ठाकरे गटावरही निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 14:00 IST

मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलारांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेससह उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. 

मुंबई - विधानसभा निवडणुकीत मुंबईत काँग्रेसनं ११ पैकी केवळ २ मराठी माणसांना उमेदवारी दिली आहे. इतका मराठीद्वेष काँग्रेसनं केला आहे. उद्धव ठाकरेंची यावर भूमिका काय..? मराठी चेहरे काँग्रेसमधून हद्दपार केले असा आरोप करत मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी काँग्रेससह उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

आशिष शेलार म्हणाले की, काँग्रेसचे जे मराठी चेहरे आहेत त्यांना उमेदवारीतून डावलण्यात आले. बाजूला सारले गेले. मग त्यात भाई जगताप, मधुकर अण्णा चव्हाण, सचिन सावंत जे मोजके राहिलेत त्या सगळ्यांना मराठी आहेत म्हणून कात्रजचा घाट दाखवला आहे. एवढा काँग्रेसचा मराठी द्वेष उद्धव ठाकरेंना मान्य आहे का..? काँग्रेसची महाराष्ट्रविरोधी भूमिका ही संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही काँग्रेसचे सर्वोच्च नेते छाती पिटवून महाराष्ट्र मराठी भाषिक राज्य आम्ही होऊ देणार नाही असं म्हणत होते.  समस्त महाराष्ट्र पेटून उठला एकत्रित आला, आंदोलन केले. संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिली तेव्हा आंदोलनकर्त्यांना घरात घुसून गोळ्या मारल्या आहेत. आमचे १०६ हुतात्मे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत गेले. मराठी माणसाच्या छाताडावर गोळ्या याच काँग्रेसने घातल्या. मराठी भाषिक राज्याला काँग्रेसने विरोध केला. काँग्रेसनं तेव्हाही मराठी विरोधाची भूमिका घेतली होती आणि आता तीच भूमिका पुढे नेत ११ पैकी केवळ २ मराठी उमेदवार दिलेत. हा मराठीद्वेष त्यावर उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी असं त्यांनी म्हटलं. 

तसेच स्थैर्य, शांतता प्रगती हवी असेल तर महाविकास आघाडीला महाराष्ट्रातून हद्दपार करा. याकुब मेमनचं समर्थन हे काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील लोक करतात. जिथे जिथे त्यांचे राज्य येते तिथे अशा घटकांचे समर्थन महाविकास आघाडी करते. केवळ याकुब मेमनंच नाही, इब्राहिम मुसा जो मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी तो लोकसभेला उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराचा प्रचार करत होता. हे सहज होत नाही. अशांतता निर्माण करणाऱ्या लोकांशी यांचे लागेबांधे आहेत. कसाबच्या भूमिकेचं समर्थन, जे वीर पोलिसांनी बलिदान दिले त्यांना लागलेल्या गोळ्या या कसाबच्या नव्हत्या असं काँग्रेस-राष्ट्रवादी-उबाठा म्हणतात. जम्मू काश्मीर ते महाराष्ट्र अशांतता निर्माण करणाऱ्या लोकांसोबत मविआ नेत्यांशी संबंध आहेत. त्यामुळे या प्रवृत्तीला हद्दपार करा असं आवाहन आशिष शेलार यांनी केले आहे. 

दरम्यान, मुस्लीमांना आरक्षण देण्याची मागणी समाजवादी पक्ष करतोय, धर्माच्या आधारे आरक्षण संविधानात मान्य नाही. परंतु ही मागणी सपा करते, शरद पवार त्यांना पाठिंबा देतात, उबाठा त्यांना मांडीवर घेते. त्यामुळे तुष्टीकरणाच्या राजकारणाचे उद्धव ठाकरे महामेरू आहेत. मुस्लीम आरक्षणावर उद्धव ठाकरेंची भूमिका काय हे त्यांनी स्पष्ट करायला हवं अशी मागणीही आशिष शेलारांनी केली. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेसAshish Shelarआशीष शेलार