शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 17:38 IST

Maharashtra Assembly Election 2024 : "जग एवढे पुढे गेले, पण भारतीय जनता पक्षवाले अजून 'बटेंगे तो कटेंगे'मध्येच अडकलेले आहेत."

राज्यात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. प्रचारादरम्यान सर्वच राजकीय पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत टोलेबाजी करताना दिसत आहेत. यातच आता, "जग एवढे पुढे गेले, पण भारतीय जनता पक्षवाले अजून 'बटेंगे तो कटेंगे'मध्येच अडकलेले आहेत. दुनिया खूप पुढे गेली आहे," असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटलील यांनी भाजपला  लगावला आहे. एवढेच नाही तर, "...याचा अर्थ क्लिअर आहे. भारतीय जनता पक्षाच्या ५० पेक्षा जास्त जागा महाराष्ट्रात निवडून येणार नाहीत," अशी भविष्यवाणीही त्यांनी यावेळी केली. ते बीडमध्ये प्रचारसभेत बोलत होते.

काय म्हणाले जयंत पाटील? -पाटील म्हणाले, "काळ बदललेला आहे. जातीवर आणि धर्मावर हे निवडणूक नेत आहेत. "बटेंगे तो कटेंगे" म्हणणाऱ्यांना मी एवढेच सांगतो की, ही अठराव्या-एकोणिसाव्या शतकातली भाषा आहे. आपण आता २१ व्या शतकात आलोय. २१ व्या शतकात लोकं फार पुढे गेली आहेत. ते इलॉन मस्क नावाचा एक माणूस आहे, जगातल्या सगळ्या नव्या नव्या संशोधन करून प्रयोग करण्याचा त्याचा हातखंडा आहे. तो आता काय विचार करतोय माहिती आहे का? तो विचार करतोय की, मंगळावर इंटरनेट कसं चालू करता येईल? याचा विचार पृथ्वीवर, इलॉन मस्क करतोय आणि त्यासाठी आता प्रयोग करण्याचं काम त्यांनी सुरू केलेले आहे. जग एवढं पुढे गेलं, पण भारतीय जनता पक्ष वाले अजून 'बटेंगे तो कटेंगे' मध्ये अडकलेले आहेत. दुनिया खूप पुढे गेली आहे." 

जयंत पाटील पुढे म्हणाले, "अमित शहा आणि ते योगी आदित्यनाथ इथे येऊन असल्या घोषणा करतात. त्या योगींना माहीत नाही की, यांचा निम्मा उत्तर प्रदेश मुंबई आणि पुण्यात नोकरीला आलाय यांचा आणि आम्हाला येऊन शिकवताय की "बटेंगे तो कटेंगे". याचा अर्थ क्लिअर आहे. भारतीय जनता पक्षाच्या ५० पेक्षा जास्त जागा महाराष्ट्रात निवडून येणार नाहीत," असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटलील यांनी भाजपला लगावला आहे."

इंदिरा गांधी असत्या, तर... -बांगलादेशात सत्ता परिवर्तनानंतर हिंदूंवर झालेल्या अत्याचारांचा आणि मंदिरांवरील हल्ल्याचा उल्लेख करत जयंत पाटील म्हणाले, "अरे, तुमचा नेता विश्वगुरु झालाय ना? शेजारच्या बांगलादेसला दम देऊन हिंदूंवरचे अत्याचार थांबवता आले नाहीत? इंदिरा गांधी असत्या, तर त्या बांगलादेशवर हल्ला केला असता आणि तिथल्या हिंदूंचे संरक्षण केले असतं."

"निवडणूक जवळ आली की धर्मावर निवडणूक न्यावी, असे कधी वाटते भाजपला? ज्यावेळी लक्षात येते की, जमणे जरा अवघड आहे, इलेक्शन जरा अवघड झाले आहे, हे आता त्यांच्या लक्षात आले आहे, असा टोलाही जयंत पाटील यांनी यावेळी लगावला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Jayant Patilजयंत पाटीलyogi adityanathयोगी आदित्यनाथAmit Shahअमित शाहBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस