शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 17:38 IST

Maharashtra Assembly Election 2024 : "जग एवढे पुढे गेले, पण भारतीय जनता पक्षवाले अजून 'बटेंगे तो कटेंगे'मध्येच अडकलेले आहेत."

राज्यात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. प्रचारादरम्यान सर्वच राजकीय पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत टोलेबाजी करताना दिसत आहेत. यातच आता, "जग एवढे पुढे गेले, पण भारतीय जनता पक्षवाले अजून 'बटेंगे तो कटेंगे'मध्येच अडकलेले आहेत. दुनिया खूप पुढे गेली आहे," असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटलील यांनी भाजपला  लगावला आहे. एवढेच नाही तर, "...याचा अर्थ क्लिअर आहे. भारतीय जनता पक्षाच्या ५० पेक्षा जास्त जागा महाराष्ट्रात निवडून येणार नाहीत," अशी भविष्यवाणीही त्यांनी यावेळी केली. ते बीडमध्ये प्रचारसभेत बोलत होते.

काय म्हणाले जयंत पाटील? -पाटील म्हणाले, "काळ बदललेला आहे. जातीवर आणि धर्मावर हे निवडणूक नेत आहेत. "बटेंगे तो कटेंगे" म्हणणाऱ्यांना मी एवढेच सांगतो की, ही अठराव्या-एकोणिसाव्या शतकातली भाषा आहे. आपण आता २१ व्या शतकात आलोय. २१ व्या शतकात लोकं फार पुढे गेली आहेत. ते इलॉन मस्क नावाचा एक माणूस आहे, जगातल्या सगळ्या नव्या नव्या संशोधन करून प्रयोग करण्याचा त्याचा हातखंडा आहे. तो आता काय विचार करतोय माहिती आहे का? तो विचार करतोय की, मंगळावर इंटरनेट कसं चालू करता येईल? याचा विचार पृथ्वीवर, इलॉन मस्क करतोय आणि त्यासाठी आता प्रयोग करण्याचं काम त्यांनी सुरू केलेले आहे. जग एवढं पुढे गेलं, पण भारतीय जनता पक्ष वाले अजून 'बटेंगे तो कटेंगे' मध्ये अडकलेले आहेत. दुनिया खूप पुढे गेली आहे." 

जयंत पाटील पुढे म्हणाले, "अमित शहा आणि ते योगी आदित्यनाथ इथे येऊन असल्या घोषणा करतात. त्या योगींना माहीत नाही की, यांचा निम्मा उत्तर प्रदेश मुंबई आणि पुण्यात नोकरीला आलाय यांचा आणि आम्हाला येऊन शिकवताय की "बटेंगे तो कटेंगे". याचा अर्थ क्लिअर आहे. भारतीय जनता पक्षाच्या ५० पेक्षा जास्त जागा महाराष्ट्रात निवडून येणार नाहीत," असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटलील यांनी भाजपला लगावला आहे."

इंदिरा गांधी असत्या, तर... -बांगलादेशात सत्ता परिवर्तनानंतर हिंदूंवर झालेल्या अत्याचारांचा आणि मंदिरांवरील हल्ल्याचा उल्लेख करत जयंत पाटील म्हणाले, "अरे, तुमचा नेता विश्वगुरु झालाय ना? शेजारच्या बांगलादेसला दम देऊन हिंदूंवरचे अत्याचार थांबवता आले नाहीत? इंदिरा गांधी असत्या, तर त्या बांगलादेशवर हल्ला केला असता आणि तिथल्या हिंदूंचे संरक्षण केले असतं."

"निवडणूक जवळ आली की धर्मावर निवडणूक न्यावी, असे कधी वाटते भाजपला? ज्यावेळी लक्षात येते की, जमणे जरा अवघड आहे, इलेक्शन जरा अवघड झाले आहे, हे आता त्यांच्या लक्षात आले आहे, असा टोलाही जयंत पाटील यांनी यावेळी लगावला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Jayant Patilजयंत पाटीलyogi adityanathयोगी आदित्यनाथAmit Shahअमित शाहBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस