शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 17:38 IST

Maharashtra Assembly Election 2024 : "जग एवढे पुढे गेले, पण भारतीय जनता पक्षवाले अजून 'बटेंगे तो कटेंगे'मध्येच अडकलेले आहेत."

राज्यात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. प्रचारादरम्यान सर्वच राजकीय पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत टोलेबाजी करताना दिसत आहेत. यातच आता, "जग एवढे पुढे गेले, पण भारतीय जनता पक्षवाले अजून 'बटेंगे तो कटेंगे'मध्येच अडकलेले आहेत. दुनिया खूप पुढे गेली आहे," असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटलील यांनी भाजपला  लगावला आहे. एवढेच नाही तर, "...याचा अर्थ क्लिअर आहे. भारतीय जनता पक्षाच्या ५० पेक्षा जास्त जागा महाराष्ट्रात निवडून येणार नाहीत," अशी भविष्यवाणीही त्यांनी यावेळी केली. ते बीडमध्ये प्रचारसभेत बोलत होते.

काय म्हणाले जयंत पाटील? -पाटील म्हणाले, "काळ बदललेला आहे. जातीवर आणि धर्मावर हे निवडणूक नेत आहेत. "बटेंगे तो कटेंगे" म्हणणाऱ्यांना मी एवढेच सांगतो की, ही अठराव्या-एकोणिसाव्या शतकातली भाषा आहे. आपण आता २१ व्या शतकात आलोय. २१ व्या शतकात लोकं फार पुढे गेली आहेत. ते इलॉन मस्क नावाचा एक माणूस आहे, जगातल्या सगळ्या नव्या नव्या संशोधन करून प्रयोग करण्याचा त्याचा हातखंडा आहे. तो आता काय विचार करतोय माहिती आहे का? तो विचार करतोय की, मंगळावर इंटरनेट कसं चालू करता येईल? याचा विचार पृथ्वीवर, इलॉन मस्क करतोय आणि त्यासाठी आता प्रयोग करण्याचं काम त्यांनी सुरू केलेले आहे. जग एवढं पुढे गेलं, पण भारतीय जनता पक्ष वाले अजून 'बटेंगे तो कटेंगे' मध्ये अडकलेले आहेत. दुनिया खूप पुढे गेली आहे." 

जयंत पाटील पुढे म्हणाले, "अमित शहा आणि ते योगी आदित्यनाथ इथे येऊन असल्या घोषणा करतात. त्या योगींना माहीत नाही की, यांचा निम्मा उत्तर प्रदेश मुंबई आणि पुण्यात नोकरीला आलाय यांचा आणि आम्हाला येऊन शिकवताय की "बटेंगे तो कटेंगे". याचा अर्थ क्लिअर आहे. भारतीय जनता पक्षाच्या ५० पेक्षा जास्त जागा महाराष्ट्रात निवडून येणार नाहीत," असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटलील यांनी भाजपला लगावला आहे."

इंदिरा गांधी असत्या, तर... -बांगलादेशात सत्ता परिवर्तनानंतर हिंदूंवर झालेल्या अत्याचारांचा आणि मंदिरांवरील हल्ल्याचा उल्लेख करत जयंत पाटील म्हणाले, "अरे, तुमचा नेता विश्वगुरु झालाय ना? शेजारच्या बांगलादेसला दम देऊन हिंदूंवरचे अत्याचार थांबवता आले नाहीत? इंदिरा गांधी असत्या, तर त्या बांगलादेशवर हल्ला केला असता आणि तिथल्या हिंदूंचे संरक्षण केले असतं."

"निवडणूक जवळ आली की धर्मावर निवडणूक न्यावी, असे कधी वाटते भाजपला? ज्यावेळी लक्षात येते की, जमणे जरा अवघड आहे, इलेक्शन जरा अवघड झाले आहे, हे आता त्यांच्या लक्षात आले आहे, असा टोलाही जयंत पाटील यांनी यावेळी लगावला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Jayant Patilजयंत पाटीलyogi adityanathयोगी आदित्यनाथAmit Shahअमित शाहBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस