शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

नाना पटोलेंनी तिकिट विकलं; माजी आमदारानं गंभीर आरोप करत भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 21:19 IST

उमरखेड मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराविरोधात पक्षातच बंडखोरी, माजी आमदाराने अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. 

यवतमाळ - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर तिकिट विकल्याचा आरोप करत माजी आमदार विजय खडसे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमरखेड मतदारसंघातून विजय खडसे इच्छुक होते. मात्र याठिकाणी काँग्रेसनं साहेबराव कांबळे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे माजी आमदार नाराज झाले आहेत. 

विजय खडसे यांनी म्हटलं की, मी पक्षाकडे तिकिट मागितले तेव्हा ज्याचं सर्व्हेत नाव येईल त्यांना उमेदवारी मिळेल असं नाना पटोलेंनी सांगितले, माझे नाव सर्व्हेत एक नंबरला असताना मला उमेदवारी नाकारण्यात आली. मला नाकारल्याचं दु:ख नाही परंतु या मतदारसंघात बाहेरचा उमेदवार पक्षाने दिला. स्थानिक उमेदवाराला डावलण्यात आले. जो उमेदवार पक्षाने दिला तो भ्रष्ट अधिकारी मोपलवार यांचा मानसपुत्र असलेल्या माणसाला दिली याची खंत आहे. बाहेरचा उमेदवार देण्यामागे काँग्रेसला संपवण्याचं षडयंत्र पटोलेंनी केलंय का अशी शंका आहे. २१ इच्छुकांनी उमेदवारी मागितली, परंतु स्थानिकांना डावलून मुंबईत राहणाऱ्या मोपलवारचं काम करणाऱ्या माणसाला ही उमेदवारी देण्यात आली असा आरोप त्यांनी केला.

तसेच  खऱ्या अर्थाने हा काँग्रेसवर फार मोठा अन्याय आहे. अमरावती विभागात ५ मतदारसंघापैकी २ उबाठा, २ राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला दिले. उमरखेड एकमेव मतदारसंघ असा काँग्रेसकडे होता जिथे १०० टक्के निवडून येण्याची संधी होती. परंतु स्थानिक इच्छुकांना डावलून बाहेर बाहेरच्या उमेदवारी दिली म्हणजे काँग्रेस विकली म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मी नाना पटोलेंना म्हणालो, सर्व्हेत मी नंबर एकला आहे. तरीही त्यांनी ऐकले नाही. जे सर्व्हेचे निकष लावले त्याचे पुढे झाले काय...? असा सवालही माजी आमदारांनी उपस्थित केला. 

दरम्यान, राहुल गांधी यांनी लोकांमध्ये फिरून १० हजार किमी चालून जागरुक दिली. गांधी नेहरू यांच्या विचारांना तिलांजली देण्याचं काम नाना पटोले करतायेत. अनेक ठिकाणच्या तक्रारी नानाभाऊंबद्दल आहे. काँग्रेस पक्षाशी प्रामाणिकपणे काम करणारे माझ्यासारखे लोक आहेत. हा अन्याय सहन करण्यापलीकडचा आहे. पक्षश्रेष्ठींनी याची दखल घ्यावी. माणिकराव ठाकरे यांचा हा मतदारसंघ ज्यांनी या राज्याचे नेतृत्व केले, संयमी, शांत माणुसकीचा माणूस. मात्र मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत असणाऱ्या या माणसाला बाहेर काढण्यासाठी द्वारवा मतदारसंघ उबाठा देण्याचे काम केले. उमरखेड मतदारसंघ उबाठाला देऊन द्वारवा मतदारसंघ माणिकराव ठाकरे यांना दिला असता तर ते निवडून आले असते. नाना पटोलेंनी सुपारी घेऊन काँग्रेस संपवतायेत असा आरोप त्यांनी केला.

कोण आहेत विजय खडसे?

विजय खडसे हे २००९ साली उमरखेड मतदारसंघातून विजयी झाले होते. २०१४ साली भाजपाच्या राजेंद्र नजरधने यांनी त्यांचा पराभव केला. २०१९ मध्ये पुन्हा एकदा विजय खडसेंना काँग्रेसने उमेदवारी दिली. परंतु ९२७८ मतांनी खडसेंचा पराभव झाला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४umarkhed-acउमरखेडvidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसNana Patoleनाना पटोलेUddhav Thackerayउद्धव ठाकरे