शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

वांद्रे, वरळीत मतांचं गणित जुळवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी भिवंडी, मानखुर्द 'सपा'ला दिलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2024 15:43 IST

महाविकास आघाडीत समाजवादी पक्षाला जागा सोडल्याने भिवंडी येथे ठाकरे गटात असंतोष पसरला आहे. याठिकाणी माजी आमदाराने उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. 

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आता काहीच तास शिल्लक आहेत. त्यात बंडखोरांमुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. भिवंडी पूर्व या मतदारसंघात मविआने समाजवादी पक्षाचे रईस शेख यांना पाठिंबा दिला आहे. मात्र याठिकाणी इच्छुक उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. विशेष म्हणजे या उमेदवारीला काँग्रेसच्या माजी खासदारांनीही पाठिंबा दिला आहे.

भिवंडी पूर्व मतदारसंघात रईस शेख समाजवादी पक्षाकडून रिंगणात आहेत तर मानखुर्द शिवाजीनगर भागात अबु आझमी निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही ठिकाणी उद्धव ठाकरेंकडून समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यात आला आहे. मात्र उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेला त्यांच्या माजी आमदारासह कार्यकर्त्यांनी विरोध करत भिवंडी पूर्व इथं अपक्ष लढण्याची तयारी केली आहे. त्यात माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी म्हटलं की, भिवंडीच्या बाबतीत एकदा नव्हे तर वारंवार अन्याय झाला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला सांगितले आहे अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार असतो त्यामुळे आम्ही अन्याय सहन करणार नाही. अन्यायाविरोधात लढणार आहोत. लोकसभेला ४ वेळा पराभूत झालेल्या माणसासाठी आम्ही प्रचार केला, त्याला जिंकून आणलं. आता विधानसभेला आमच्यावर अन्याय होणार नाही असं वाटलं मात्र या अन्यायाविरोधात आम्ही लढत आहोत असं त्यांनी सांगितले.

तसेच ज्या ज्या मतदारसंघात समाजवादीची किंवा मुस्लीम मतांची आवश्यकता आहे ते वाचवण्यासाठी भिवंडीत माझ्यासारख्या कार्यकर्त्याला डावलण्यात आलंय हा माझा आरोप आहे. भिवंडीतील जनतेच्या भावनेशी निगडीत मी लढाई करतोय. ज्या लोकांचा माझ्यावर आशीर्वाद आहे. प्रतिष्ठीत मान्यवरांशी चर्चा करून मी निर्णय घेईन. अनेक दिवसांपासून निवडणुकीसाठी कार्यकर्ते तयारीला लागलेत. ही उमेदवारी मिळेल असं त्यांना वाटत होते. पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारी मागण्यासाठी गेलो. शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी दिली नाही असं माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी म्हटलं.

संजय राऊत काय म्हणाले?

काही जागा या मित्रपक्षांच्या विद्यमान आमदारांच्या होत्या, त्या जागांवर वारंवार चर्चा होऊनही तिढा सुटला नाही. जशा शिवसेनेच्या विद्यमान आमदारांच्या अनेक जागा आम्ही सोडल्या नाहीत. काँग्रेसच्या जागा ते सोडू शकले नाहीत. समाजवादी पार्टी कुणीही आपल्या जागा सोडायला तयार नव्हते हे सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी समजून घेतले पाहिजे. भिवंडीच्या जागेबाबत माजी आमदार रुपेश म्हात्रे सांगतात ती जागा आम्हाला मिळावी, या जागेसाठी आम्ही खूप प्रयत्न केले. पण तिथे समाजवादी पक्षाचा आमदार आहे. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत त्या जागेसाठी प्रयत्न केले पण समाजवादीने ती जागा सोडली नाही त्यामुळे आमच्यासमोर दुसरा पर्याय नव्हता असं संजय राऊतांनी म्हटलं.

काय आहे भिवंडीची स्थिती?

भिवंडीत २०१९ साली समाजवादी पक्षाचे रईस शेख यांनी बाजी मारली. त्यांनी शिवसेनेच्या रुपेश म्हात्रे यांचा १३०० मतांनी पराभव केला. मात्र यंदा राजकीय समीकरण बदलली आहे. त्यात शिवसेनेत २ गट पडलेत. त्यातील उद्धव ठाकरे गटाने रईस शेख यांना पाठिंबा दिला आहे. २०१४ च्या निवडणुकीत रुपेश म्हात्रे या मतदारसंघाचे आमदार होते. 

वरळी, वांद्रे मतदारसंघात फायदा?

वरळीत उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर आदित्य ठाकरेंचे मावस भाऊ वरूण सरदेसाई हे वांद्रे पूर्व मतदारसंघात निवडणूक लढवत आहे. यासह इतर मतदारसंघात मुस्लीम मते आपल्याकडे वळवण्यासाठी महाविकास आघाडीत ठाकरेंनी समाजवादी पक्षाला काही जागा सोडल्याचा आरोप रुपेश म्हात्रे यांनी केला. त्यामुळे मुस्लिम मतांचा फायदा वरळी, वांद्रे पूर्व मतदारसंघात होणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४bhiwandi-east-acभिवंडी पूर्वworli-acवरळीvandre-east-acवांद्रे पूर्वUddhav Thackerayउद्धव ठाकरेthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024mumbai regionमुंबई विधानसभा निवडणूकSamajwadi Partyसमाजवादी पार्टी