शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

जोपर्यंत बहुमत नाही तोपर्यंत शिवसेनेला सहन करणार - सुधीर मुनगंटीवार

By admin | Updated: October 15, 2015 17:33 IST

जोपर्यंत भाजपाला संपूर्ण बहुमत मिळत नाही तोपर्यंत शिवसेनेला सहन करणार असे स्पष्ट प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १५ - जोपर्यंत भाजपाला संपूर्ण बहुमत मिळत नाही तोपर्यंत शिवसेनेला सहन करणार असे स्पष्ट प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. जनतेने आम्हाला कौल दिला की तुम्ही एकटे सत्ता स्थापन करू शकत नाही, युती करावीच लागेल आणि जनतेचा हा कौल आम्ही प्रमाण मानून एकत्र सत्ता स्थापन केल्याचे ते म्हणाले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना आमचे ध्येय स्पष्ट असल्याचे शत प्रतिशत भाजपाचा उच्चार न करता सांगितले.
शिवसेनेनं एकदिलाने जनतेची कामं करण्यासाठी पुढे यायला हवं असं सांगताना तसं झालं तर पुढील काळातही एकत्र काम करू अन्यथा जनता जो कौल देईल तो मान्य करू असे सूचक उद्गारही त्यांनी काढले.
इंदू मिलच्या भूमीपूजनाला उद्धव ठाकरे यांना एक दिवस आधी निमंत्रण दिलं हा अपमान नसल्याचं मत त्यांनी मांडलं. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या थोर पुरुषाच्या सन्मानासाठी अशा छोट्या मोठ्या गोष्टी बाजुला ठेवायला हव्यात अशी भूमिका मुनगंटीवार यांनी मांडली. त्या कार्यक्रमाला खुद्द मला बोलावणं नव्हतं, रावसाहेब दानवेंना बोलावणं नव्हतं असं सांगत तरी आम्ही गेलोच ना असे ते म्हणाले.
कल्याण डोंबिवलीमध्ये महापालिका निवडणुकीमध्ये युती झालेली नाही, या पार्श्वभूमीवर बोलताना निवडणूक पार पडल्यानंतरच यासंदर्भात निर्णय घेऊ असे सांगत सध्यातरी स्वबलावर सत्ता आणण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सुधीरभाऊ म्हणाले.
 
मुनगंटीवार यांच्या मुलाखतीतले मुद्दे पुढीलप्रमाणे:
 
- राज्यातील शेतक-यांच्या ताटात घास पडावा म्हणून आम्ही पेट्रोल, दारू, सिगरेटवरील कर वाढवले, जर याला कोणी पाकिटमारी म्हणत असेल, तर शेतक-यांसाठी आम्ही ही पाकिटमारी केली त्याचा मला अभिमान, आणि अशी पाकिटमारी मी पुन्हा पुन्हा करेन.
- दुष्काळ जाहीर करण्यासाठी विशिष्ट कालमर्यादा व नियम असतात. दुष्काळ जाहीर केला नसला तरी ९५० कोटी रुपये खर्च करून १४ जिल्ह्यांमध्ये २ ते ३ रुपये किलो दराने धान्य दिले.
- विधानसभा निवडणुकीत आम्हाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही पण जनतेला वारंवार निवडणुकीला सामोरं जावं लागू नये म्हणून भाजपा-शिवसेनेने एकत्र येऊन जनतेची सेवा करण्याचा निर्णय घेतला.
- जनतेच्या हितासाठी आम्ही रोज एक निर्णय घेतो.
- बहुमत मिळेपर्यंत शिवसेनेला सहन करणार.
- आरक्षणासंदर्भात सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला.
- बिहार निवडणूक आणि आंबेडकर स्मारकाच्या भूमीपूजनाचा संबंध नाही.
- आमचा संसार मारून, मुटकून केलेला नाही.
- निमंत्रण कधी दिलं हा मान-अपमानाचा मुद्दा होऊच शकत नाही. एक दिवस आधी दिलं तर अपमान आणि आठ दिवस आधी दिलं तर सन्मान असं होत नाही.