शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

भाजपासोबत जाण्याचा घटनाक्रम नेमका कसा होता?; सुनील तटकरेंनी २०१४ पासूनचं सगळं सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 12:09 IST

Loksabha Election - मविआ सरकारमधून बाहेर पडून उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जाण्याचा विचार करत होते, असा दावा सुनील तटकरेंनी केला आहे. 

मुंबई - Sunil tatkare on BJP ( Marathi News )  २०१९ मध्ये बिगर भाजपाची एकमेव जागा कोकणात माझी आली होती. २०१९ ला विधानसभा निकालानंतर भाजपा आणि शिवसेना दोघांसोबत राष्ट्रवादीची चर्चा सुरू होती. काँग्रेससोबतही चर्चा सुरू होती त्यातून महाविकास आघाडी आली, पहाटेचा शपथविधी नसून तो सकाळी ८ वाजता झालाय. दिल्लीत आमची चर्चा झाल्यानंतर मुंबईतील नेहरू सेंटरमध्ये काँग्रेस नेत्यांकडून शरद पवारांच्या विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. त्याठिकाणी सगळे नेते होते. त्यामुळे आमच्या सर्वांच्या मनाला वेदना झाल्या त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा शपथविधी पार पडला असं सुनील तटकरेंनी सांगितले.

सुनील तटकरे म्हणाले की, २०१४ साली विधानसभेचे पूर्ण निकाल यायचे होते, परंतु भाजपा ११५ पर्यंत जाईल हे लक्षात आले, त्यावेळी शरद पवारांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपाला बाहेरून पाठिंबा देण्याचं ठरलं, यानंतर विश्वासदर्शक ठरावावेळी आम्ही मदत केली. भाजपाने तेव्हा समर्थन मागितल्याचं ऐकलं नव्हते. त्यानंतर २०१६ मध्ये आम्हाला सांगण्यात आले, आपल्याला भाजपा सरकारमध्ये सहभागी व्हायचंय त्याप्रमाणे चर्चा सुरू झाली. या चर्चेत जागावाटपाचीही चर्चा झाली. पालकमंत्रिपद, खातेवाटप हेदेखील निश्चित झालं, २०१७ मध्ये सरकारमध्ये कधी बसायचं यासाठी दिल्लीत गेलो. शिवसेनेला काढलं जाईल असं शरद पवारांना अपेक्षित होते. परंतु अमित शाहांना त्यास विरोध केला. भाजपाने शिवसेनेला बाहेर काढण्यास नकार दिला. शिवसेना बाहेर गेली तर आम्ही आत येऊ अशी भूमिका शरद पवारांनी घेतली होती असं त्यांनी म्हटलं. 

त्याशिवाय राष्ट्रपती राजवट लागणं, दिल्लीत भाजपासोबत बैठक होणं याबाबत प्रफुल पटेल, अजित पवारांनी खुलासा केलाय. पण यातलं आणखी काही बोलू शकत नाही. काहीजण म्हणतात, अजितदादांना उपमुख्यमंत्रिपद केले ती चूक झाली, पण अजित पवारांना उपमुख्यमंत्री केले नसते तर मविआ सरकार पुढचे १५-२० दिवसही टिकले नसते. गुप्त मतदानात पहिल्याच दिवशी सरकार गेले असते असा दावाही तटकरेंनी केला आहे. एबीपी माझाच्या मुलाखतीत ते बोलत होते. 

पंतप्रधानांच्या 'त्या' भेटीनंतर उद्धव ठाकरे भाजपासोबत जाणार होते

दरम्यान, ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न घेऊन दिल्लीत भेटायला गेले. त्यानंतर ज्या घडामोडी झाल्या, ८ दिवसांत संजय राऊतांचा मला फोन आला, त्यांना अजितदादांची भेट माझ्यासमावेत हवी होती. संजय राऊतांनी किमान ५-६ वेळा फोन केला, अजित पवारांना ग्रँड हयातमध्ये बोलावलं होते. मी अजितदादांना घेऊन गेलो, तेव्हा एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर हेदेखील उपस्थित होते. सुनील तटकरे, अजित पवार, संजय राऊत, एकनाथ शिंदे-मिलिंद नार्वेकर यांची बैठक झाली. दिल्लीतून आल्यापासून उद्धव ठाकरेंच्या मनात पुर्नविचार सुरू होता, मविआ सरकारमधून बाहेर पडून त्यांना भाजपासोबत सरकार बनवायचं होते. उद्धव ठाकरेंना भाजपासोबत जाण्याचा विचार आला होता. पंतप्रधान भेटीनंतर उद्धव ठाकरेंना भाजपासोबत जायचं होते हे स्वत: संजय राऊतांनी मला आणि अजित पवारांना सांगितले होते असा गौप्यस्फोटही सुनील तटकरेंनी केला.  

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेAjit Pawarअजित पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Sharad Pawarशरद पवार