शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 11:27 IST

Loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडतंय. त्याचवेळी संजय राऊतांनी राज ठाकरेंवर आक्रमक टीका केली आहे. 

मुंबई - Sanjay Raut on Raj Thackeray ( Marathi News ) राज ठाकरेंना भेटीगाठीचे छंद पहिल्यापासून जडले आहेत. त्यामुळे कोण कोणाला भेटते, कोण कोणाकडे चहापानाला जातंय यावर चर्चा कशाला करता, यानिमित्त मनसे नेत्यांना महत्त्व मिळतंय. ते मिळू द्या. आमच्या पोटात दुखण्याचं कारण नाही. पण ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावण्याचा निर्णय घेतलेला आहे. ज्यांनी महाराष्ट्र लुटला या पक्षाचे नेते राज यांना भेटतात. याची इतिहासात नोंद राहील. महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही अशी जहरी टीका उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. 

खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की,एकाबाजूला मुडदे पडलेत, दुसऱ्या बाजूला पंतप्रधान रोड शो करतात हे किती असंवेदनशील आहे. राज ठाकरे, नारायण राणे यांना आम्ही रस्त्यावर उतरवलं. राज ठाकरे यांनी स्वत:च्या पक्षासाठी इतकी मेहनत केली असती तर कदाचित त्यांच्या कार्यकर्त्यांना चांगले दिवस आले असते. भाजपाने अनेकांना भाड्याने घेतले आहे. त्यामुळे त्यांना रस्त्यावर उतरावं लागतंय. मोदी-शाह यांनी काय महान दिवे लावलेत, ज्या मोदी-शाहांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका असं आपण सांगत होता. त्यांच्या पखाल्या वाहताना आम्ही तुम्हाला पाहिलंय आम्हाला वाईट वाटलं. राज ठाकरे ज्यांना मतदान करणार तो डुप्लिकेट धनुष्यबाण आहे. तो बाळासाहेब ठाकरेंचा नाही. चोरीच्या मालावर ते हक्क सांगतायेत. चोरीच्या मालाचं चुंबन राज ठाकरे घेतायेत. ते नकली आहेत असं त्यांनी म्हटलं. 

त्याचसोबत आम्ही पंजावर मतदान करतो, हा पंजा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा आहे. ज्या काँग्रेसनं देशाच्या स्वातंत्र्यात सगळ्यात जास्त योगदान दिले आहे. ज्या कमळाबाईला आम्ही २५ वर्ष मतदान केले त्यांनी देशाची कशी वाट लावली, महाराष्ट्र कसा लुटला त्यामुळे आम्हाला महाविकास आघाडी म्हणून एकत्रित येऊन देश आणि संविधानासाठी हा निर्णय घ्यावा लागला. निशाणी कोणती हा प्रश्न नसून ही लढाई देश आणि संविधान वाचवण्याची आहे. उद्धव ठाकरे पंजाला मतदान करतायेत तसं काँग्रेसचे अनेक नेते मशाल, तुतारीवर मतदान करताना तुम्ही पाहाल असंही संजय राऊत यांनी सांगितले. 

दरम्यान, आम्हाला पराभवाची अजिबात भीती नाही. तुमच्या पायाखालची वाळू सरकली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी ३५ पेक्षा जास्त जागा जिंकताना तुम्ही पाहाल. ज्यांना पराभवाची भीती वाटते ते पैशाचा आणि यंत्रणेचा दुरुपयोग करतायेत. आमच्याकडे पैसेच नाहीत असं संजय राऊतांनी म्हटलं. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४