शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

संजय राऊतांचं प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर; "चर्चा माझ्याशी नव्हती तर मविआसोबत..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 17:41 IST

Loksabha Election 2024: संजय राऊतांनी पाठित खंजीर खुपसला असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला. त्यानंतर आज पुन्हा आंबेडकरांनी राऊतांवर निशाणा साधला. त्यानंतर आता संजय राऊतांनीही प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर दिले आहे. 

मुंबई - Sanjay Raut on Prakash Ambedkar ( Marathi News ) महाविकास आघाडीच्या चर्चेत स्वत: शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात असे प्रमुख लोक चर्चा करत होते. मी कुठेच नव्हतो. वंचित बहुजन आघाडीला पहिल्यापासून सन्मानानेच वागवले. वंचितला ४ जागांचा प्रस्ताव होता. बंद दाराआडच्या चर्चा आम्ही बाहेर करत नाही. अकोल्यासह ३ जागांचा प्रस्ताव होता. आमची विद्यमान रामटेकची जागाही द्यायला तयार होतो. काँग्रेसकडून चांगली जागा देण्याची तयारी होती. चर्चा माझी आणि प्रकाश आंबेडकरांची नव्हती. चर्चा महाविकास आघाडीशी होती असं प्रत्युत्तर संजय राऊतांनीप्रकाश आंबेडकर यांच्या टीकेवर दिले आहे.

संजय राऊत म्हणाले की, जे संविधान संपवण्याचा प्रयत्न करतायेत त्यांना अप्रत्यक्ष मदत होईल असं कुणी वागू नये या मताचे आम्ही आहोत. ४ जागांचा प्रस्ताव होता. चर्चा अत्यंत चांगल्या वातावरणात झाली. बाळासाहेब आंबेडकर आजही प्रिय आहेत. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत असायला हवी. यात खोटे काय आहे? किंबहुना वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेची युती आधीच झालेली आहे. त्यात उद्धव ठाकरेच होते असं त्यांनी सांगितले. 

तर बंद खोलीत ज्या चर्चा झाल्या त्या आमच्यात आहेत. रामटेकच्या जागेचाही प्रस्ताव होता. शिवसेना त्या जागेचा त्याग करायला तयार होती. प्रकाश आंबेडकर मोठे नेते, आमची खेळीमेळीत चर्चा झाली. प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत राहावेत यासाठी उद्धव ठाकरे-शरद पवार यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केलेत. दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनीही प्रयत्न केलेत. त्यामुळे महाविकास आघाडीतले कुणी खोटं बोलतंय हे वाटत नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं. 

दरम्यान, अकोल्याची जागा आमची नाहीच, मग त्यावर आम्ही कशाला चर्चा करू, जागावाटपावर कधीही स्वतंत्र चर्चा झाली नाही. सिल्व्हर ओक, मातोश्रीवर कधीही जागावाटपावर चर्चा झाली नाही. महाराष्ट्रातील समन्वयावर चर्चा झाली आहे. देशातील जनतेने ठरवलं आहे. लोकशाही आणि संविधान यांच्याविरोधात जी भूमिका घेतायेत त्यांच्या पाठिशी उभं राहायचं नाही. ३ एप्रिलला मविआची पत्रकार परिषद आहे. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यात मिळतील असंही संजय राऊत यांनी सांगितले. 

काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर?

महाविकास आघाडी वेगळी आहे आणि संजय राऊत वेगळे आहेत. ज्यांना आम्ही लक्ष्य केले ते संजय राऊत होते. संजय राऊत चुकीचे वक्तव्य करतात म्हणून आम्ही म्हणालो की, संजय हे आघाडीत बिघाडी करत आहेत. मविआकडून तीन जागांपलीकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही. आम्हाला मविआने तीन जागांचा प्रस्ताव दिला होता. त्यात एक अकोला आणि दुसऱ्या दोन जागा यापलीकडे आम्हाला कोणताही प्रस्ताव आलेला नाही असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं.  

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरMahavikas Aghadiमहाविकास आघाडीVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४