शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

संजय राऊतांचं प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर; "चर्चा माझ्याशी नव्हती तर मविआसोबत..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 17:41 IST

Loksabha Election 2024: संजय राऊतांनी पाठित खंजीर खुपसला असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला. त्यानंतर आज पुन्हा आंबेडकरांनी राऊतांवर निशाणा साधला. त्यानंतर आता संजय राऊतांनीही प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर दिले आहे. 

मुंबई - Sanjay Raut on Prakash Ambedkar ( Marathi News ) महाविकास आघाडीच्या चर्चेत स्वत: शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात असे प्रमुख लोक चर्चा करत होते. मी कुठेच नव्हतो. वंचित बहुजन आघाडीला पहिल्यापासून सन्मानानेच वागवले. वंचितला ४ जागांचा प्रस्ताव होता. बंद दाराआडच्या चर्चा आम्ही बाहेर करत नाही. अकोल्यासह ३ जागांचा प्रस्ताव होता. आमची विद्यमान रामटेकची जागाही द्यायला तयार होतो. काँग्रेसकडून चांगली जागा देण्याची तयारी होती. चर्चा माझी आणि प्रकाश आंबेडकरांची नव्हती. चर्चा महाविकास आघाडीशी होती असं प्रत्युत्तर संजय राऊतांनीप्रकाश आंबेडकर यांच्या टीकेवर दिले आहे.

संजय राऊत म्हणाले की, जे संविधान संपवण्याचा प्रयत्न करतायेत त्यांना अप्रत्यक्ष मदत होईल असं कुणी वागू नये या मताचे आम्ही आहोत. ४ जागांचा प्रस्ताव होता. चर्चा अत्यंत चांगल्या वातावरणात झाली. बाळासाहेब आंबेडकर आजही प्रिय आहेत. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत असायला हवी. यात खोटे काय आहे? किंबहुना वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेची युती आधीच झालेली आहे. त्यात उद्धव ठाकरेच होते असं त्यांनी सांगितले. 

तर बंद खोलीत ज्या चर्चा झाल्या त्या आमच्यात आहेत. रामटेकच्या जागेचाही प्रस्ताव होता. शिवसेना त्या जागेचा त्याग करायला तयार होती. प्रकाश आंबेडकर मोठे नेते, आमची खेळीमेळीत चर्चा झाली. प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत राहावेत यासाठी उद्धव ठाकरे-शरद पवार यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केलेत. दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनीही प्रयत्न केलेत. त्यामुळे महाविकास आघाडीतले कुणी खोटं बोलतंय हे वाटत नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं. 

दरम्यान, अकोल्याची जागा आमची नाहीच, मग त्यावर आम्ही कशाला चर्चा करू, जागावाटपावर कधीही स्वतंत्र चर्चा झाली नाही. सिल्व्हर ओक, मातोश्रीवर कधीही जागावाटपावर चर्चा झाली नाही. महाराष्ट्रातील समन्वयावर चर्चा झाली आहे. देशातील जनतेने ठरवलं आहे. लोकशाही आणि संविधान यांच्याविरोधात जी भूमिका घेतायेत त्यांच्या पाठिशी उभं राहायचं नाही. ३ एप्रिलला मविआची पत्रकार परिषद आहे. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यात मिळतील असंही संजय राऊत यांनी सांगितले. 

काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर?

महाविकास आघाडी वेगळी आहे आणि संजय राऊत वेगळे आहेत. ज्यांना आम्ही लक्ष्य केले ते संजय राऊत होते. संजय राऊत चुकीचे वक्तव्य करतात म्हणून आम्ही म्हणालो की, संजय हे आघाडीत बिघाडी करत आहेत. मविआकडून तीन जागांपलीकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही. आम्हाला मविआने तीन जागांचा प्रस्ताव दिला होता. त्यात एक अकोला आणि दुसऱ्या दोन जागा यापलीकडे आम्हाला कोणताही प्रस्ताव आलेला नाही असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं.  

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरMahavikas Aghadiमहाविकास आघाडीVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४