शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

मविआला ३५ जागा मिळतील, उद्धव ठाकरे मॅन ऑफ द सिरिज ठरतील; उबाठा गटाच्या नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 12:31 IST

राज्यातील निवडणूक ही विकासावर नव्हे तर जातीच्या मुद्द्यावर लढली गेली. मराठाविरुद्ध ओबीसी असा वाद भाजपामुळे झाला असा आरोप ठाकरे गटाच्या नेत्याने केला. 

परभणी - राज्यात महायुतीला माहिती नाही पण मविआला ३० ते ३५ जागा मिळतील. त्यात उद्धव ठाकरे मॅन ऑफ द सिरिज ठरतील असं विधान परभणी लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव यांनी केले आहे. त्याचसोबत राज्यात मराठा ओबीसी वादाला भाजपाच जबाबदार असल्याचा आरोपही जाधवांनी केला. 

संजय जाधव म्हणाले की, राज्यातल्या सगळ्या लोकसभा मतदारसंघातील मी आढावा घेतला तेव्हा यावेळची लढाई ही उद्धव ठाकरेविरुद्दमहायुती अशी होती. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस नेते असतील यांनी ज्यारितीने महाविकास आघाडी म्हणून प्रचार केला. त्यामुळे उद्याच्या ४ तारखेला या निकालाचा मॅन ऑफ द सिरिज कोण असेल तर ते उद्धव ठाकरे आहेत. महायुतीच्या जागा किती असतील माहिती नाही. परंतु महाविकास आघाडी किमान ३५ जागा निवडून येईल हे मी आत्मविश्वासाने सांगतो असं त्यांनी म्हटलं. 

...तर वाईट वाटण्याचं कारण काय?

महादेव जानकर, प्रकाश शेंडगे, गोपीचंद पडळकर यांनी समाजासाठी लढा दिला. सगळ्या समाजाने प्रसंगी रस्त्यावर उतरून सरकारवर दबाव आणून त्यांना हवं ते पदरात पाडलं, मग मराठा समाजाने जर लढा दिला तर त्यात वाईट वाटण्याचं कारण काय? प्रत्येकाला नैतिक अधिकार आहे. जर काही गोष्टी हव्या असतील तर आंदोलन करावं लागेल, रस्त्यावर उतरावं लागेल. मराठ्यांनी हक्क मागू नये का? सगेसोयरे अंमलबजावणी का करत नाही? मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या ही मागणी चुकीची आहे का? मराठा समाजात आज चूल पेटायचे वांदे आहेत असं संजय जाधव यांनी सांगितले. 

जातीवर आरक्षण न देता आर्थिक निकषावर द्या अशी मागणी आमच्या पक्षाचे सर्वोच्च नेते बाळासाहेब ठाकरेंची होती ती आजची परिस्थिती आहे. आम्ही कुणाचं हिसकावून मागत नाही. परंतु मराठा समाजातील गरजू लोकांना आरक्षणाची गरज आहे. सुशिक्षित लोकांचे आरक्षणामुळे नुकसान झालं त्यामुळे त्यांच्या हक्कासाठी आम्ही मागणी करतोय असं त्यांनी म्हटलं. 

भाजपावर जातीवादाचा आरोप

ही पहिली निवडणूक होती, विकासाच्या मुद्द्यावर न लढता ओबीसीविरुद्ध मराठा अशी लढली गेली. जातीच्या आधारे वळणावर निवडणूक गेली. निवडणुकीचा प्रचार संपल्यावर हेवेदावे संपायला हवे होते. निवडणुकीमुळे कटुता आणि टोकाला जायची गरज नव्हती. ही लढाई वैचारिक असते. परंतु निवडणूक जातीवर गेली. भाजपाचे नेते, जे संवैधानिक पदावर आहेत त्यांच्यामुळे हे झाले. देशाचे पंतप्रधान म्हणतात, मी ओबीसीतून येतो. राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात, आमच्या पक्षाचा डिएनए ओबीसी आहे, त्यामुळे हे झाल्याचा आरोप संजय जाधव यांनी केला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Jadhavसंजय जाधवMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४