शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

मविआला ३५ जागा मिळतील, उद्धव ठाकरे मॅन ऑफ द सिरिज ठरतील; उबाठा गटाच्या नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 12:31 IST

राज्यातील निवडणूक ही विकासावर नव्हे तर जातीच्या मुद्द्यावर लढली गेली. मराठाविरुद्ध ओबीसी असा वाद भाजपामुळे झाला असा आरोप ठाकरे गटाच्या नेत्याने केला. 

परभणी - राज्यात महायुतीला माहिती नाही पण मविआला ३० ते ३५ जागा मिळतील. त्यात उद्धव ठाकरे मॅन ऑफ द सिरिज ठरतील असं विधान परभणी लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव यांनी केले आहे. त्याचसोबत राज्यात मराठा ओबीसी वादाला भाजपाच जबाबदार असल्याचा आरोपही जाधवांनी केला. 

संजय जाधव म्हणाले की, राज्यातल्या सगळ्या लोकसभा मतदारसंघातील मी आढावा घेतला तेव्हा यावेळची लढाई ही उद्धव ठाकरेविरुद्दमहायुती अशी होती. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस नेते असतील यांनी ज्यारितीने महाविकास आघाडी म्हणून प्रचार केला. त्यामुळे उद्याच्या ४ तारखेला या निकालाचा मॅन ऑफ द सिरिज कोण असेल तर ते उद्धव ठाकरे आहेत. महायुतीच्या जागा किती असतील माहिती नाही. परंतु महाविकास आघाडी किमान ३५ जागा निवडून येईल हे मी आत्मविश्वासाने सांगतो असं त्यांनी म्हटलं. 

...तर वाईट वाटण्याचं कारण काय?

महादेव जानकर, प्रकाश शेंडगे, गोपीचंद पडळकर यांनी समाजासाठी लढा दिला. सगळ्या समाजाने प्रसंगी रस्त्यावर उतरून सरकारवर दबाव आणून त्यांना हवं ते पदरात पाडलं, मग मराठा समाजाने जर लढा दिला तर त्यात वाईट वाटण्याचं कारण काय? प्रत्येकाला नैतिक अधिकार आहे. जर काही गोष्टी हव्या असतील तर आंदोलन करावं लागेल, रस्त्यावर उतरावं लागेल. मराठ्यांनी हक्क मागू नये का? सगेसोयरे अंमलबजावणी का करत नाही? मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या ही मागणी चुकीची आहे का? मराठा समाजात आज चूल पेटायचे वांदे आहेत असं संजय जाधव यांनी सांगितले. 

जातीवर आरक्षण न देता आर्थिक निकषावर द्या अशी मागणी आमच्या पक्षाचे सर्वोच्च नेते बाळासाहेब ठाकरेंची होती ती आजची परिस्थिती आहे. आम्ही कुणाचं हिसकावून मागत नाही. परंतु मराठा समाजातील गरजू लोकांना आरक्षणाची गरज आहे. सुशिक्षित लोकांचे आरक्षणामुळे नुकसान झालं त्यामुळे त्यांच्या हक्कासाठी आम्ही मागणी करतोय असं त्यांनी म्हटलं. 

भाजपावर जातीवादाचा आरोप

ही पहिली निवडणूक होती, विकासाच्या मुद्द्यावर न लढता ओबीसीविरुद्ध मराठा अशी लढली गेली. जातीच्या आधारे वळणावर निवडणूक गेली. निवडणुकीचा प्रचार संपल्यावर हेवेदावे संपायला हवे होते. निवडणुकीमुळे कटुता आणि टोकाला जायची गरज नव्हती. ही लढाई वैचारिक असते. परंतु निवडणूक जातीवर गेली. भाजपाचे नेते, जे संवैधानिक पदावर आहेत त्यांच्यामुळे हे झाले. देशाचे पंतप्रधान म्हणतात, मी ओबीसीतून येतो. राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात, आमच्या पक्षाचा डिएनए ओबीसी आहे, त्यामुळे हे झाल्याचा आरोप संजय जाधव यांनी केला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Jadhavसंजय जाधवMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४