शहरं
Join us  
Trending Stories
1
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
2
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
3
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
4
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
5
अखेर BCCIने मान्य केली चूक, आता बदल होणार! पुढील ३१ दिवसांसाठी घेतला जाणार मोठा निर्णय
6
द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...”
7
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
8
अदला बदली! माझं घर तुझं, तुझं घर माझं, होम-स्वॅपिंगचा नवा ट्रेंड; मोफत राहण्यासाठी भन्नाट 'जुगाड'
9
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
10
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
11
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
12
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
13
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
14
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
15
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
16
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
17
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
18
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
19
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
20
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
Daily Top 2Weekly Top 5

२०१४ च्या निवडणुकीत युती आदित्य ठाकरेंमुळे तुटली; भाजपा नेते आशिष शेलारांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 16:05 IST

ज्यावेळी उद्धव ठाकरेंकडे बोलण्यासारखं नाही तेव्हा ते भावनात्मक भाषणं करतात अशी टीका आशिष शेलारांनी केली.

मुंबई - Ashish Shelar on Uddhav Thackeray ( Marathi News ) २०१४ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा युती ही आदित्य ठाकरेंमुळे तुटली. आदित्य ठाकरेंनी मिशन १५० ची घोषणा केली. कुठलीही चर्चा नाही, मग १५१ आले कुठून? त्यावेळी आम्ही वेगळे लढलो. त्यानंतर २०१७ महापालिका निवडणुकीतही अहंकारी पिता पुत्रांनी आम्ही युतीत सडलो असं विधान केले. त्यानंतर दोन्ही निवडणुकीत शिवसेना आमच्याशिवाय लढली तेव्हा जिंकू शकली नाही असा टोला भाजपा नेते आशिष शेलार यांनी लगावला आहे.

आशिष शेलार म्हणाले की, मुंबई महापालिकेतही शिवसेनेचा पराभव झाला, २०१४ मध्ये भाजपाचे १०० हून अधिक आमदार निवडून आले. महापालिकेतही ८४-८२ असे नगरसेवक आले. पण एकहाती सत्ता उद्धव ठाकरेंना घेता आली नाही. बोलायला जीएसटी लागत नाही. उद्धव ठाकरे-आदित्य ठाकरेंची भाषणे महाराष्ट्र हित, देशहिताची नाहीत. राज ठाकरेंनी जी भूमिका घेतली ती युवकांसाठी, शैक्षणिक भविष्यासाठी आहे तसं उद्धव ठाकरेंचं नाही असं त्यांनी म्हटलं. 

तसेच ज्यावेळी उद्धव ठाकरेंकडे बोलण्यासारखं नाही तेव्हा ते भावनात्मक भाषणं करतात. एकनाथ शिंदेंना उचित स्थान दिले असते तर शिवसेना फुटली नसती. मुख्यमंत्रिपदाच्या मोहात उद्धव ठाकरे अडकले त्यामुळे शिवसेना फुटली. आम्ही उद्धव ठाकरेंवर आंधळा विश्वास ठेवला. देवेंद्र फडणवीसांनी पूर्ण विश्वास ठेवला, मित्राने धोका दिला त्यापेक्षा आपलेच चुकले असं आम्ही म्हणू. बंद खोलीत कोण काय बोलले हे दोघेच सांगू शकतात. अमित शाह यांनी कुठलेही आश्वासन दिले नव्हते. त्याचसोबत प्रत्येक भाषणात देवेंद्र फडणवीसांचं सरकार पुन्हा येईल असं म्हणत होते. उद्धव ठाकरेंकडे कुठलाही पुरावा नाही असंही आशिष शेलार यांनी म्हटलं. एबीपीच्या मुलाखतीत ते बोलत होते. 

दरम्यान, आता उद्धव ठाकरेंसाठी आमचे दरवाजे बंद आहेत. ही परिस्थिती त्यांनी ओढावून घेतली आहे. शरद पवारांनी याआधी २ वेळा आमच्याशी चर्चा करून फसवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे यापुढे त्यांच्यावर भरवसा ठेवणं कठीण आहे. २०१७-१८ मध्ये स्वत: शरद पवार अमित शाहांना भेटले, शिवसेनेला सोडून माझ्यासोबत सरकार बनवा हा त्यांचा आग्रह होता. परंतु आम्ही उद्धव ठाकरेंवर विश्वास ठेवला. २०२१ मध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लावताना शरद पवारांनी पुढाकार घेतला होता. आता ते काहीही म्हणो असंही आशिष शेलारांनी सांगितले.  

राज ठाकरेसोबत आले त्याचा आनंद

मिशन ४५ प्लस हे महायुतीचं ध्येय आहे. अहंकारी आदित्य ठाकरेंसारखं एका पक्षानं घोषित केलेला निर्णय नाही. शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी आणि इतर मित्रपक्ष यांच्यासोबतीनं मिशन ४५ प्लस साकार करणार आहोत. मोदी परिवार वाढवताना राज ठाकरेंसारखा चांगला सहकारी मित्र मिळत असेल तर निश्चितच त्याचा आम्हाला आनंद आहे. राज ठाकरेंसोबत चर्चेत देवेंद्र फडणवीस आहेत. राज ठाकरेंच्या मनसेनं आमच्यासोबत निवडणूक लढली तर ते मला व्यक्तिगत आवडेल. पण सध्या मी चर्चेत नाही. राज ठाकरे प्रचारात दिसतील अशी अपेक्षा आहे असं शेलारांनी म्हटलं. 

उमेदवारी घोषित न होण्यामागे रणनीती 

उमेदवार घोषित न होण्यामागं आमच्या रणनीतीचा तो भाग आहे. माझ्यासहित कोअर कमिटीनं पूनम महाजन यांना तिकीट दिले पाहिजे असं मत मांडलं आहे. आता केंद्रीय नेतृत्व जो निर्णय करेल ते पाहू. मी विधानसभेत खुश आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत पक्षाला जिंकवणं हे मोठं चॅलेंज आहे. ते मी करेन. दक्षिण मुंबईच्या जागेबाबत जिंकण्यासाठी योग्य उमेदवार आणि पक्ष कोण याचं मूल्यमापन सुरू आहे. लोकशाहीत अशी चर्चा होते तेव्हा त्याचे स्वागत केले पाहिजे. प्रक्रियेत संवाद आहेत, वाद नाही. निर्णय करताना तो जिंकण्यासाठीचा असावा. त्यासाठी वेळ घातला जातोय. ही रणनीती आहे असं आशिष शेलारांनी सांगितले.  

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारUddhav Thackerayउद्धव ठाकरेAaditya Thackerayआदित्य ठाकरेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपाShiv Senaशिवसेना