शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

२०१४ च्या निवडणुकीत युती आदित्य ठाकरेंमुळे तुटली; भाजपा नेते आशिष शेलारांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 16:05 IST

ज्यावेळी उद्धव ठाकरेंकडे बोलण्यासारखं नाही तेव्हा ते भावनात्मक भाषणं करतात अशी टीका आशिष शेलारांनी केली.

मुंबई - Ashish Shelar on Uddhav Thackeray ( Marathi News ) २०१४ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा युती ही आदित्य ठाकरेंमुळे तुटली. आदित्य ठाकरेंनी मिशन १५० ची घोषणा केली. कुठलीही चर्चा नाही, मग १५१ आले कुठून? त्यावेळी आम्ही वेगळे लढलो. त्यानंतर २०१७ महापालिका निवडणुकीतही अहंकारी पिता पुत्रांनी आम्ही युतीत सडलो असं विधान केले. त्यानंतर दोन्ही निवडणुकीत शिवसेना आमच्याशिवाय लढली तेव्हा जिंकू शकली नाही असा टोला भाजपा नेते आशिष शेलार यांनी लगावला आहे.

आशिष शेलार म्हणाले की, मुंबई महापालिकेतही शिवसेनेचा पराभव झाला, २०१४ मध्ये भाजपाचे १०० हून अधिक आमदार निवडून आले. महापालिकेतही ८४-८२ असे नगरसेवक आले. पण एकहाती सत्ता उद्धव ठाकरेंना घेता आली नाही. बोलायला जीएसटी लागत नाही. उद्धव ठाकरे-आदित्य ठाकरेंची भाषणे महाराष्ट्र हित, देशहिताची नाहीत. राज ठाकरेंनी जी भूमिका घेतली ती युवकांसाठी, शैक्षणिक भविष्यासाठी आहे तसं उद्धव ठाकरेंचं नाही असं त्यांनी म्हटलं. 

तसेच ज्यावेळी उद्धव ठाकरेंकडे बोलण्यासारखं नाही तेव्हा ते भावनात्मक भाषणं करतात. एकनाथ शिंदेंना उचित स्थान दिले असते तर शिवसेना फुटली नसती. मुख्यमंत्रिपदाच्या मोहात उद्धव ठाकरे अडकले त्यामुळे शिवसेना फुटली. आम्ही उद्धव ठाकरेंवर आंधळा विश्वास ठेवला. देवेंद्र फडणवीसांनी पूर्ण विश्वास ठेवला, मित्राने धोका दिला त्यापेक्षा आपलेच चुकले असं आम्ही म्हणू. बंद खोलीत कोण काय बोलले हे दोघेच सांगू शकतात. अमित शाह यांनी कुठलेही आश्वासन दिले नव्हते. त्याचसोबत प्रत्येक भाषणात देवेंद्र फडणवीसांचं सरकार पुन्हा येईल असं म्हणत होते. उद्धव ठाकरेंकडे कुठलाही पुरावा नाही असंही आशिष शेलार यांनी म्हटलं. एबीपीच्या मुलाखतीत ते बोलत होते. 

दरम्यान, आता उद्धव ठाकरेंसाठी आमचे दरवाजे बंद आहेत. ही परिस्थिती त्यांनी ओढावून घेतली आहे. शरद पवारांनी याआधी २ वेळा आमच्याशी चर्चा करून फसवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे यापुढे त्यांच्यावर भरवसा ठेवणं कठीण आहे. २०१७-१८ मध्ये स्वत: शरद पवार अमित शाहांना भेटले, शिवसेनेला सोडून माझ्यासोबत सरकार बनवा हा त्यांचा आग्रह होता. परंतु आम्ही उद्धव ठाकरेंवर विश्वास ठेवला. २०२१ मध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लावताना शरद पवारांनी पुढाकार घेतला होता. आता ते काहीही म्हणो असंही आशिष शेलारांनी सांगितले.  

राज ठाकरेसोबत आले त्याचा आनंद

मिशन ४५ प्लस हे महायुतीचं ध्येय आहे. अहंकारी आदित्य ठाकरेंसारखं एका पक्षानं घोषित केलेला निर्णय नाही. शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी आणि इतर मित्रपक्ष यांच्यासोबतीनं मिशन ४५ प्लस साकार करणार आहोत. मोदी परिवार वाढवताना राज ठाकरेंसारखा चांगला सहकारी मित्र मिळत असेल तर निश्चितच त्याचा आम्हाला आनंद आहे. राज ठाकरेंसोबत चर्चेत देवेंद्र फडणवीस आहेत. राज ठाकरेंच्या मनसेनं आमच्यासोबत निवडणूक लढली तर ते मला व्यक्तिगत आवडेल. पण सध्या मी चर्चेत नाही. राज ठाकरे प्रचारात दिसतील अशी अपेक्षा आहे असं शेलारांनी म्हटलं. 

उमेदवारी घोषित न होण्यामागे रणनीती 

उमेदवार घोषित न होण्यामागं आमच्या रणनीतीचा तो भाग आहे. माझ्यासहित कोअर कमिटीनं पूनम महाजन यांना तिकीट दिले पाहिजे असं मत मांडलं आहे. आता केंद्रीय नेतृत्व जो निर्णय करेल ते पाहू. मी विधानसभेत खुश आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत पक्षाला जिंकवणं हे मोठं चॅलेंज आहे. ते मी करेन. दक्षिण मुंबईच्या जागेबाबत जिंकण्यासाठी योग्य उमेदवार आणि पक्ष कोण याचं मूल्यमापन सुरू आहे. लोकशाहीत अशी चर्चा होते तेव्हा त्याचे स्वागत केले पाहिजे. प्रक्रियेत संवाद आहेत, वाद नाही. निर्णय करताना तो जिंकण्यासाठीचा असावा. त्यासाठी वेळ घातला जातोय. ही रणनीती आहे असं आशिष शेलारांनी सांगितले.  

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारUddhav Thackerayउद्धव ठाकरेAaditya Thackerayआदित्य ठाकरेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपाShiv Senaशिवसेना