शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

"…म्हणून इंडिया आघाडीने सरकार स्थापनेसाठी दावा केलाच पाहिजे’’, उद्धव ठाकरे यांनी सांगितलं महत्त्वाचं कारण  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 21:06 IST

Lok Sabha Election Result 2024:

लोकसभा निवडणुकीच्या निकालांमधून भाजपाचं बहुमत हुकल्यानंतर आता इंडिया आघाडीला सत्ता स्थापन करण्याची आशा दिसू लागली आहे. एकीकडे भाजपाचं बहुमत हुकलं असलं तरी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला बहुमताहून अधिकच्या जागा मिळाल्या आहेत. मात्र एनडीएमधील नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांसारखे नेते आपली भूमिका बदलू शकतात, असा दावा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मोठं आणि सूचक विधान केलं आहे. इंडिया आघाडीने सत्तास्थापनेसाठी दावा केलाच पाहिजे, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, इंडिया आघाडीची बैठक होण्याआधी निर्णय काय सांगणार. पण इंडिया आघाडीने सत्तास्थापनेसाठी दावा केलाच पाहिजे. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मी उद्या दुपारनंतर दिल्लीला जाईन. कारण आमचे जिंकलेले मुंबई बाहेरचे उमेदवार उद्या मुंबईत भेटायला येतील. त्यामुळे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी सुरुवातीला संजय राऊत आणि मुंबईतील खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत हे पुढे जातील.  तर दुपारनंतर संध्याकाळच्या वेळी मी दिल्लीला पोहोचेन, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, सरकार स्थापन करणं आणि पंतप्रधानपदाचा चेहरा याबाबत उद्या इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. तसेच एक गोष्ट मी पहिल्यापासून सांगत आहे की, यावेळेला आमच्यापैकी कुणीही आपण पंतप्रधानपदाबाबत इच्छूक आहे, या मताचा नाही. देशाची लोकशाही वाचवली पाहिजे. देशाचं संविधान वाचवलं पाहिजे. तसेच हुकूमशाहीपासून देशाला वाचवलं पाहिजे, ही आमची एकत्र येण्यामागची भावना होती. ही भावना आजही कायम आहे. उद्या सर्वांच्या मताने इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवला जाईल. तसेच आम्ही सर्व सोबत राहणार आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

एनडीएचं बहुमत आहे, असं दाखवलं जातंय, पण पण बिहारसारख्या राज्यांमध्ये मतमोजणी उशिरा सुरू झाली. त्याचे निकाल पूर्ण समोर यायचे आहेत. तसेच आणखी काही छोटे पक्ष आहेत. त्यांच्याशी संपर्क सुरू आहे. एकूणच काय या जुलूम जबरदस्तीला जे लोक कंटाळले आहेत. जिंकलेले पक्ष आहेत, अपक्ष आहेत. ते इंडिया आघाडीमध्ये एकवटतील आणि पुन्हा एकदा जुलूम जबरदस्तीचं सरकार येऊ देणार नाहीत, याची खात्री आहे. तसेच नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांच्याशीही काँग्रेस आणि इतर पक्षांकडून बोलणी सुरू आहे. चंद्राबाबू नायडू यांनाही भाजपाने काही कमी त्रास दिलेला नाही. नितीश कुमार यांनाही काही कमी त्रास दिलेला नाही. पुन्हा त्रास हवा का हा प्रश्न आहे. एकदा हे गेलेलं सरकार उंबरठ्यावर आहे ते बाहेर काढण्यासाठी सगळे पक्ष एकवटतील, याची मला खात्री आहे, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Uddhav Thackerayउद्धव ठाकरेINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी