शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 11:30 IST

Loksabha Election - आदित्य ठाकरे यांनी मनसेनं भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला त्यावरून काही प्रश्न उभे केले होते. त्यावरून आता मनसेने जोरदार पलटवार केला आहे.

मुंबई - MNS Target Aaditya Thackeray ( Marathi News ) संपलेल्या पक्षावर बोलत नाही असं बोलणारे आदित्य ठाकरेमनसेवर बोलले, त्याबद्दल धन्यवाद, आता बोलायची गरज का पडली?, ईशान्य मुंबईत मराठी मते हवीत म्हणून तुम्ही गुजरातींवर बोलताय का? जिलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा ही घोषणा कुणी दिली? वरळीच्या निवडणुकीत केम छो वरळी हा बोर्ड याच आदित्य ठाकरेंनी लावला होता. आता निव्वळ मराठी माणसांची मते आपल्याला हवीत म्हणून आता गुजराती द्वेष जागा झाला का? असा पलटवार मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंवर केला आहे.

संदीप देशपांडे म्हणाले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या जन्मापासून मराठी माणसाच्या मुद्द्यावर लढतेय. आंदोलन करतेय, रेल्वेचे आंदोलन, मराठी पाट्या आंदोलन, मराठी मुलांच्या नोकऱ्यांसाठी आंदोलन करत होतो तेव्हा उद्धव ठाकरे शेपूट घालून घरी बसले होते हे आदित्य ठाकरेंनी विसरू नये. ईशान्य मुंबईतला उबाठाकडून खोटा प्रचार केला जातोय. जर मराठी माणूस म्हणून अडवलं असते तर शिवसैनिकांनी तिथल्या तिथे कानफाडात मारली असती. मनसेने तर मारलीच असती. जर मराठी म्हणून अडवले तर कानफाडात मारायला हवी होती. तक्रारी कसल्या करताय, हे लोक षंढ आहेत असा टोला त्यांनी लगावला.

तसेच मराठी नोकरीबाबत ही जाहिरात आली त्यावरही आम्ही भूमिका घेतली, हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. उबाठा गटाला मराठी माणूस सोडून सर्वांची मते हवी असतात. आम्ही मतांसाठी कधी प्रतारणा केली नाही. आम्ही असल्या प्रकाराला लाथा मारल्या आहेत. धारावीच्या मोर्चाचे पुढे काय झाले?, आदित्य ठाकरे, संजय राऊत म्हणजे मराठी नाही, हे दोघे म्हणजे महाराष्ट्र नाही. या लोकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मराठीबाबत मनसेला प्रश्न विचारण्याची नैतिकता आदित्य ठाकरेंना आहे का असा सवालही संदीप देशपांडे यांनी केला.

दरम्यान, देरासरसमोर आम्ही कोंबड्या नाचवल्या नव्हत्या. संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिला कुणी काय खायचे, त्यावेळी आम्ही आंदोलन केले. जर हे आंदोलन चुकीचे होते तर उबाठाने सांगावे. मराठी माणसाला रेल्वेत नोकरी नाकारली जात होती त्यावेळी मनसेनं आंदोलन केले, ते चुकीचे होते का याचे आदित्य ठाकरेंनी उत्तर द्यावे. मनसेनं मराठी माणसांसाठी केलेले आंदोलन चुकीचे होते असं असं आदित्य ठाकरेंना वाटत असेल तर ते स्पष्ट करावे. गेल्या २५ वर्षाच्या काळात किती मराठी कंत्राटदार आणले, मुंबईतला मराठी माणूस वसई-विरार, कल्याण डोंबिवलीला फेकला याची उत्तरे आदित्य ठाकरेंना द्यावी लागतील असा टोलाही मनसेने आदित्य ठाकरेंना लगावला. 

टॅग्स :MNSमनसेSandeep Deshpandeसंदीप देशपांडेAaditya Thackerayआदित्य ठाकरेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपा