शहरं
Join us  
Trending Stories
1
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
2
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
3
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
4
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
5
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
6
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
7
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
8
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
9
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
10
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
11
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
12
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
13
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
14
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
15
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
16
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
17
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
18
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
19
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
20
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल

दुष्काळग्रस्त मराठवाड्यात ५५ गावांचे 'नो वॉटर, नो वोट' धोरण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2019 2:08 PM

दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील पैठण तालुक्यातील ५५ पेक्षा जास्त गावांनी 'नो वॉटर,नो वोट' अशी भूमिका घेतली आहे. २३ वर्षांपासून रखडलेली ब्रह्मागव्हाण उपसा सिंचन योजना पूर्ण व्हावी म्हणून तालुक्यातील शेतकऱ्यांनी आजपर्यंत ४० पेक्षा अधिक आंदोलने केली आहेत.

मुंबई - लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता रंगात आला आहे. उमेदवार मतदारसंघ पिंजून काढताना दिसत आहे. स्थानिक पातळीवर वेगवेगळे आश्वासने मतदारांना मिळत आहे. तसेच मतदारसंघातील रखडलेल्या योजना पूर्ण करण्याचे दावे उमेदवार करत आहेत. विद्यमान खासदार आपण केलेल्या कामांचा पाढा वाचत आहे, तर विरोधक रखडलेली कामांचा हिशोब मागत आहेत.

दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील पैठण तालुक्यातील ५५ पेक्षा जास्त गावांनी 'नो वॉटर,नो वोट' अशी भूमिका घेतली आहे. २३ वर्षांपासून रखडलेली ब्रह्मागव्हाण उपसा सिंचन योजना पूर्ण व्हावी म्हणून तालुक्यातील शेतकऱ्यांनी आजपर्यंत ४० पेक्षा अधिक आंदोलने केली आहेत. मागील पाच वर्षांत सेना-भाजप यांच्या श्रेयवादात ही योजना पूर्ण होऊ शकली नसल्याचे जाणकार सांगतात.

जालना लोकसभा मतदारसंघातील पैठण तालुक्यात प्रत्येक निवडणुकीत केंद्रबिंदू म्हणून ब्रम्हागव्हाण उपसा सिंचन योजनाकडे बघितले जाते. पंचायत समिती निवडणुका असो की लोकसभा प्रत्येक वेळी योजना पूर्ण करण्याचे आश्वासन राजकीय पक्षांच्या वतीने दिले जाते. मात्र राजकीय श्रेयवादाचे ग्रहण या योजनेला लागलेले आहे.

ब्रम्हागव्हाण उपसा सिंचन योजना रखडली असल्याने लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. लोकसभा निवडणुका जाहीर होण्याआधी खासदार रावसाहेब दानवे यांनी योजना पूर्ण करू अशी आश्वासन दिले होते. मात्र अजूनही ही योजना पूर्ण झाली नसल्याने ५५ पेक्षा जास्त गावातील शेतकऱ्यांनी 'नो वॉटर,नो वोट' अशी भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांनी घेतलेल्या भुमिकेमुळे जालना लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांनी धसका घेतला आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९AurangabadऔरंगाबादBJPभाजपाdroughtदुष्काळMarathwadaमराठवाडा