शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

आधी आमचे तर ठरू द्या... मग तुमचे बघू...! 

By अतुल कुलकर्णी | Updated: May 19, 2025 13:44 IST

गेल्या दोन-अडीच वर्षांत पालिकेवर प्रशासक असल्यामुळे विरोधकांना सत्ताधाऱ्यांविषयी बोलण्यात मर्यादा येतील. सत्ताधारी वेळप्रसंगी प्रशासनावर ढकलून मोकळे होतील. त्यामुळे या निवडणुकीचा अजेंडा सगळ्यात आधी कोण सेट करणार? त्यावर पुढच्या गोष्टी अवलंबून असतील. 

अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई -स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यात नको, अशी भूमिका सरकारने घेतली आहे. त्यामुळे जर हे प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेले तर एक-दोन महिने निवडणुका लांबतील. सरकारने एकदा भूमिका घेतली की, कोणत्या प्रभागाचे कसे आरक्षण असेल हे महापालिका स्पष्ट करेल. आरक्षण निश्चित झाल्यावर मतदारयाद्या तयार होतील. ज्यांचे नाव विधानसभेच्या मतदार यादीत होते त्यांनाच महापालिकेच्या निवडणुकीत मतदानाची संधी असेल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. विधानसभा मतदारसंघाच्या यादीत गोंधळ झाल्याच्या अनेक तक्रारी होत्या. त्यामुळे यावरून गोंधळाची शक्यता नाकारता येत नाही. महापालिकेच्या निवडणुका स्थानिक विषयावर व्हायला हव्यात. मात्र, यात वेगळा रंग, वेगळ्या भावना आणण्याचा प्रयत्न झाला तर चित्र बदलू शकते. गेल्या दोन-अडीच वर्षांत पालिकेवर प्रशासक असल्यामुळे विरोधकांना सत्ताधाऱ्यांविषयी बोलण्यात मर्यादा येतील. सत्ताधारी वेळप्रसंगी प्रशासनावर ढकलून मोकळे होतील. त्यामुळे या निवडणुकीचा अजेंडा सगळ्यात आधी कोण सेट करणार? त्यावर पुढच्या गोष्टी अवलंबून असतील. 

पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना महापालिका निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी मुंबईत काँग्रेसला चांगली परिस्थिती होती. मात्र, एका मुलाखतीत चव्हाण यांनी, बाळासाहेब ठाकरे यांच्यावेळी असणारी शिवसेना आता उरलेली नाही, असे विधान केले. त्या एका विधानाने वातावरण बदलले. शिवसैनिकांनी खिशातले पैसे घालून महापालिकेवर भगवा फडकवला होता. आता शिवसेनेचे दोन गट झाले आहेत. बाळासाहेबांनाही दोन्ही शिवसेनेने वाटून घेतले आहे. ठाकरे गटासोबत का राहायचे हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. त्याचे उत्तर उद्धव ठाकरे यांनाच द्यावे लागेल. उरलेल्या शिवसैनिकांना पाठीवर हात टाकून त्यांच्यासोबत उभे राहावे लागेल. त्यावेळी जी तडफ शिवसैनिकांनी दाखवली तीच आता विभागली गेली आहे. सगळीकडे ‘गिव्ह अँड टेक’चा माहोल आहे.

राजकीय गप्पांमध्ये एक किस्सा आवर्जून सांगितला जातो, तो असा- मुख्यमंत्रिपदाच्या पहिल्या टर्ममध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने पडद्याआड हालचाली सुरू केल्या होत्या. त्यावेळी त्यांनी विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट दिल्लीवारी घडवून आणली होती. एकनाथ शिंदे अमुक आमदारांसोबत आपल्या पक्षात येतील. त्यांना उपमुख्यमंत्री करू आणि मी मुख्यमंत्री होतो, असा मुद्दा त्या नेत्याने दिल्लीत मांडला होता. मात्र, ही बाब शिंदे यांनीच मुंबईत परत आल्यावर फडणवीस यांच्या कानावर घातली. याची कुणकुण फडणवीस यांनाही लागली होतीच. त्यांनी जिद्दीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा झेंडा एकट्याने स्वतःच्या खांद्यावर घेतला. दिवस-रात्र महाराष्ट्र पिंजून काढला. पक्षाने चिन्हावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या. भाजपला चांगले यश मिळाले. त्यामुळे पक्षातल्या त्या नेत्याच्या स्वप्नांवर पाणी पडले. 

हा किस्सा खरा खोटा माहिती नाही. मात्र, तेच फडणवीस आता मुख्यमंत्री आहेत. राजकीय चित्र बदललेले आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघांपैकी कोण फडणवीसांच्या जास्त जवळ हे दाखवण्याचा हा काळ आहे. शिंदे आणि फडणवीस यांच्या मैत्रीविषयी मंत्रालयातल्या सहा मजल्यांमध्ये अनेक किस्से ऐकू येतात. या पार्श्वभूमीवर म्हटले तर विरोधकांना उत्तम संधी आहे. नाहीतर सगळे पीक फडणवीस नेतील असेही गमतीने सांगितले जाते. 

त्यामुळेच या निवडणुका कोणत्या मुद्द्यांवर आणि कशा पद्धतीने लढायच्या याची आखणी सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधकांना जास्त करावी लागणार आहे. अजून तरी काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यात कसल्याही बोलाचाली होताना दिसत नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटून आले. मात्र, या भेटीने लगेच चर्चेची दारे खुली होतील असे नाही. मुंबई काँग्रेसमध्ये कोणाचा कोणाशी ताळमेळ नाही. मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली लढेल असे स्पष्ट झाल्यामुळे अन्य माजी अध्यक्ष दूर गेले आहेत. उमेदवारांची चाचपणी नाही, एकत्र लढायचे तर कोणी किती जागा लढवायच्या याविषयी स्पष्टता नाही. मैत्रीपूर्ण लढायचे तर त्याचे नियोजन नाही. अशा अवस्थेत विरोधक निवडणुकीचा अजेंडा तरी काय सेट करणार..?

मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अस्तित्व नाही. काँग्रेसमध्ये एकवाक्यता नाही आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत बसून चर्चा कोणी करायची, हे स्पष्ट नाही. मुंबई भाजपमध्येही काही प्रमाणात काँग्रेससारखे वातावरण झाले आहे. एवढ्या लोकांना पक्षप्रवेश देऊन ठेवले आहेत की मूळ भाजपवासी केविलवाण्या अवस्थेत दिसत आहेत. शिंदेसेनेनेही मोठ्या प्रमाणावर भरती केंद्र सुरू केले आहे. हल्ली माजी नगरसेवक भेटला की कुठल्या पक्षात आहे, असे विचारावे लागते की, भरती प्रक्रिया वेगाने सुरू आहे. राज ठाकरे यांची भूमिका अद्याप जाहीर झाली नसली तरी शिंदे गटाच्या नेत्यांनी त्यांच्याकडे चकरा मारणे सुरू केले आहे. 

या सगळ्या राजकीय उठाठेवीत रस्ते, खड्डे, पाणी, कचरा, आरोग्य, शिक्षण अशा विषयांवर बोलायला आणि भूमिका घ्यायला सध्या तरी कोणाकडेही वेळ नाही. आधी आमचे तर ठरू द्या, मग तुमच्याविषयी बोलू असाच भाव सगळीकडे आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणElectionनिवडणूक 2024